शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांब धोकादायक

By admin | Updated: July 18, 2014 23:25 IST

जयसिंगपूरच्या शाहूनगरमधील स्थिती : भररस्त्यात अडथळे, अपघातास निमंत्रण

संदीप बावचे -जयसिंगपूर लोकसंख्या वाढली, वाहनं वाढली, पण रस्ते तेवढेच राहिल्याने रस्त्याचा श्वास घुसमटला. यातच आणखी एक विचित्र अडथळा शहरातील शाहूनगर भागामध्ये समोर येत आहे. विजेचे तब्बल बारा खांब रस्त्याच्या मधेच उभे आहेत. हे खांब काढून भूमिगत वीजवाहिनी टाकण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, ती रखडली असून विजेचे हे खांब एका बाजूस हलविण्याशिवाय कोणताही पर्याय सध्या नसल्याची बाब पुढे आली आहे. मात्र, हे खांब धोकादायक ठरत आहेत. शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून मुख्य दोन रस्त्याचे जोडरस्ते अधिक प्रमाणात उपयोगात आले आहेत. मात्र, शाहूनगर परिसरातील पटेल चौकातून जाणारा रस्ता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाले; परंतु जुन्या खांबांनी आपली जागा सोडली नाही. रस्त्याची रुंदी अपुरी आहे. पटेल चौक ते नऊ नंबर शाळेकडे जाणाऱ्या या रस्त्यावर तब्बल बारा विजेचे खांब आहेत. अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर विद्युत खांबाला डंपरने धडक दिल्यामुळे खांब कोसळण्याच्या घटना अनकेवेळा घडल्या असून काही खांब काहीसे वाकलेदेखील आहेत. रस्त्यात अडथळा ठरणारे हे खांब काढून ‘भूमिगत वीज प्रकल्प’ यामध्ये या रस्त्यावरील वीज खांबांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, ठेका मिळालेल्या कंपनीकडून या मार्गावरील वीजवाहिनी हलविण्याबाबतची प्रक्रिया वगळण्यात आल्याचे समजते. रात्रीच्या वेळी फसगत होऊन अपघातास निमंत्रण देणारे हे खांब काढण्याबाबत येथील नागरिकांची मानसिकता दिसत नाही. रस्त्याच्या मधोमध असणारे हे खांब एका बाजूला करण्याबाबत वीज कंपनी विभागाकडून येथील नागरिकांना सांगण्यात आले आहे. मात्र, हे खांब आपल्या बाजूला नकोतश, अशीही मानसिकता नागरिकांची आहे. एकूणच अपघातास निमंत्रण देणारे हे विद्युत खांब हलविण्याची गरज आहे. या प्रश्नी महावितरणशी संपर्क साधला असता शाहूनगर परिसरातील विद्युत खांब हलविण्यासाठी महावितरण विभाग तयार आहे. येथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन खांब हलविण्याबाबत नागरिकांशी चर्चा करावी. महावितरणकडून कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वीज वितरणचे अधिकारी विजय आडके यांनी दिली. खांब हलविण्याची गरज सध्या अस्तित्वात असणारे हे खांब अत्यंत धोकादायक बनले आहेत. वाढती लोकसंख्या याचा विचार आणि खासकरून या भागात डंपर व्यावसायिक वास्तव्यास आहेत. अपघातास धोकादायक असलेले विद्युत खांब वातुकीस अडथळा ठरत असल्याने एका बाजूला खांब घेण्याशिवाय पर्याय नाही. - अस्लम फरास, नगरसेवक जयसिंगपूर