शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

राजकीय पक्षांकडून निवडणुका ‘प्रतिष्ठे’च्या--सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:42 IST

जयसिंगपूर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ नावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून,

ठळक मुद्देशिरोळ तालुक्यामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभगावातील वजनदार व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पॅनेल तयार करण्यासाठी सोयीचे इच्छुक उमेदवार निवडले जात आहेत

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ नावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून, विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या १६ आॅक्टोबरला सार्वत्रिक निवडणुका होत असून, सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुका प्रतिष्ठेच्या असल्याने सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग आला आहे.शिरोळ तालुक्यात १७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुका कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या, तरी थेट सरपंचपदामुळे ग्रामपंचायतीचा कारभार हाकणारा प्रतिनिधी आपल्याच पक्षाचा असावा आणि ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे, यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. उद्या, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. सध्या गावागावांत राजकीय पक्षांचे नेते चाचपणी करीत आहेत. गावातील वजनदार व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आघाड्या, पॅनेल तयार करण्यासाठी सोयीचे इच्छुक उमेदवार निवडले जात आहेत. परिणामी, राजकीय वातावरण तापू लागल्याने उमेदवार निश्चित झाले नसले तरी इच्छुकांनी मात्र तयारी सुरू केली आहे.‘सरपंच’ निवडीत राजकारण होणार?सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जनतेतून थेट सरपंच निवडीचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सरपंचपदासाठी उमेदवाराची चाचपणीही केली जात आहे. सरपंचपदासाठी नवखा व अभ्यासू उमेदवार देण्यासाठी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शिवसेना यांसारख्या पक्षांनी उडी घेतली असून, थेट सरपंच निवड असल्याने गावाचा विचार करून उमेदवार देण्याबाबत विचार केला जात आहे. काही आघाड्यांकडून सरपंचपदाची नावे घोषित केली जात आहेत.संभाजीपूरची निवडणूक महत्त्वपूर्ण : तालुक्यातील ५३ वे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया संभाजीपूर ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. जयसिंगपूर शहरालगत असलेली ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राजकीय मंडळींनी जोरदार तयारी चालविली आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. गेल्या पाच वर्षांत सरपंचपदावरून झालेल्या घडामोडी लक्षात घेता, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.निवडणूक रणधुमाळीऔरवाड, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, अब्दुललाट, लाटवाडी, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड, खिद्रापूर या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.