शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

राजकीय पक्षांकडून निवडणुका ‘प्रतिष्ठे’च्या--सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:42 IST

जयसिंगपूर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ नावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून,

ठळक मुद्देशिरोळ तालुक्यामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभगावातील वजनदार व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पॅनेल तयार करण्यासाठी सोयीचे इच्छुक उमेदवार निवडले जात आहेत

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ नावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून, विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या १६ आॅक्टोबरला सार्वत्रिक निवडणुका होत असून, सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुका प्रतिष्ठेच्या असल्याने सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग आला आहे.शिरोळ तालुक्यात १७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुका कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या, तरी थेट सरपंचपदामुळे ग्रामपंचायतीचा कारभार हाकणारा प्रतिनिधी आपल्याच पक्षाचा असावा आणि ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे, यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. उद्या, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. सध्या गावागावांत राजकीय पक्षांचे नेते चाचपणी करीत आहेत. गावातील वजनदार व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आघाड्या, पॅनेल तयार करण्यासाठी सोयीचे इच्छुक उमेदवार निवडले जात आहेत. परिणामी, राजकीय वातावरण तापू लागल्याने उमेदवार निश्चित झाले नसले तरी इच्छुकांनी मात्र तयारी सुरू केली आहे.‘सरपंच’ निवडीत राजकारण होणार?सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जनतेतून थेट सरपंच निवडीचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सरपंचपदासाठी उमेदवाराची चाचपणीही केली जात आहे. सरपंचपदासाठी नवखा व अभ्यासू उमेदवार देण्यासाठी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शिवसेना यांसारख्या पक्षांनी उडी घेतली असून, थेट सरपंच निवड असल्याने गावाचा विचार करून उमेदवार देण्याबाबत विचार केला जात आहे. काही आघाड्यांकडून सरपंचपदाची नावे घोषित केली जात आहेत.संभाजीपूरची निवडणूक महत्त्वपूर्ण : तालुक्यातील ५३ वे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया संभाजीपूर ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. जयसिंगपूर शहरालगत असलेली ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राजकीय मंडळींनी जोरदार तयारी चालविली आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. गेल्या पाच वर्षांत सरपंचपदावरून झालेल्या घडामोडी लक्षात घेता, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.निवडणूक रणधुमाळीऔरवाड, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, अब्दुललाट, लाटवाडी, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड, खिद्रापूर या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.