संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ नावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून, विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या १६ आॅक्टोबरला सार्वत्रिक निवडणुका होत असून, सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुका प्रतिष्ठेच्या असल्याने सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग आला आहे.शिरोळ तालुक्यात १७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुका कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या, तरी थेट सरपंचपदामुळे ग्रामपंचायतीचा कारभार हाकणारा प्रतिनिधी आपल्याच पक्षाचा असावा आणि ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे, यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. उद्या, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. सध्या गावागावांत राजकीय पक्षांचे नेते चाचपणी करीत आहेत. गावातील वजनदार व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आघाड्या, पॅनेल तयार करण्यासाठी सोयीचे इच्छुक उमेदवार निवडले जात आहेत. परिणामी, राजकीय वातावरण तापू लागल्याने उमेदवार निश्चित झाले नसले तरी इच्छुकांनी मात्र तयारी सुरू केली आहे.‘सरपंच’ निवडीत राजकारण होणार?सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जनतेतून थेट सरपंच निवडीचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सरपंचपदासाठी उमेदवाराची चाचपणीही केली जात आहे. सरपंचपदासाठी नवखा व अभ्यासू उमेदवार देण्यासाठी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शिवसेना यांसारख्या पक्षांनी उडी घेतली असून, थेट सरपंच निवड असल्याने गावाचा विचार करून उमेदवार देण्याबाबत विचार केला जात आहे. काही आघाड्यांकडून सरपंचपदाची नावे घोषित केली जात आहेत.संभाजीपूरची निवडणूक महत्त्वपूर्ण : तालुक्यातील ५३ वे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया संभाजीपूर ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. जयसिंगपूर शहरालगत असलेली ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राजकीय मंडळींनी जोरदार तयारी चालविली आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. गेल्या पाच वर्षांत सरपंचपदावरून झालेल्या घडामोडी लक्षात घेता, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.निवडणूक रणधुमाळीऔरवाड, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, अब्दुललाट, लाटवाडी, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड, खिद्रापूर या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.
राजकीय पक्षांकडून निवडणुका ‘प्रतिष्ठे’च्या--सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:42 IST
जयसिंगपूर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ नावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून,
राजकीय पक्षांकडून निवडणुका ‘प्रतिष्ठे’च्या--सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग
ठळक मुद्देशिरोळ तालुक्यामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभगावातील वजनदार व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पॅनेल तयार करण्यासाठी सोयीचे इच्छुक उमेदवार निवडले जात आहेत