शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

जुलैमध्ये निवडणुकीचा धडाका

By admin | Updated: June 8, 2015 00:48 IST

हातकणंगले तालुका : २१ ग्रामपंचायतींच्या राजकीय घडामोडींना वेग

दत्ता बिडकर- हातकणंगले -हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जुलै महिन्यात होण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेने व्यक्त केली आहे. प्रभाग रचना आणि सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे तालुक्यातील चंदूर, कबनूर, माणगाव, तिळवणी, जंगमवाडी, माणगाववाडी, रुई, किणी, मनपाडळे, पाडळी, वाठार तर्फ वडगाव, खोची, लाटवडे, तासगाव, वाठार तर्फ उदगाव, मिणचे, हालोंडी, कुंभोज, नेज, दुर्गेवाडी, बिरदेववाडी या ग्रामपंचायतींच्या मुदती जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संपत आहेत. दरम्यान, पावसाळा सुरू होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. यापूर्वी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि पोलीस बंदोबस्ताचे कारण निवडणूक आयोगाने देत यापूर्वी जाहीर झालेला कार्यक्रम रद्द केला होता.तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या ९४ प्रभागांमधून २६१ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. याकरिता एक लाख १६ हजार ७५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण आणि सरपंच आरक्षण जाहीर केल्यामुळे गावा-गावांमध्ये निवडणूक चर्चेला उधाण आले आहे. ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक गट-तट रणनिती आखण्यात व्यस्त आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या भूमिका घेणारे नेते ग्रामपंचायतीसाठी स्थानिक आघाड्यांचे राजकारण करून सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याची समीकरणेही बदलली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे उट्टे काढणारे ग्रामपंचायतीसाठी एकत्र येताना यापूर्वीचे राजकारण विसरून आपल्या गटाची सत्ता कशी येईल, याकरिता कट्टर विरोधकांशी हातमिळवणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय, आदींसह इतर गावपातळीवरील आघाड्या आपलीच सत्ता यावी यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे राजकीय चर्चा आणि ग्रामीण भागातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्यातील सत्तातरानंतर निवडणुकाराज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार जाऊन भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आले आहे. या घडामोडीनंतर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणुका होत आहेत. यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.