शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जिल्ह्यातील  संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:01 IST

राज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो. यासाठी सोमवारी राज्य सरकारने मुदत संपलेल्या संस्थांच्या संचालक मंडळास निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देराज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो.

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २५०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून, ‘गोकुळ’, जिल्हा मध्यवर्ती बॅँक, शिक्षक बॅँकेसह ‘राजाराम’, ‘वारणा’ साखर कारखान्यांचा समावेश आहे. ‘कोरोना’चे संकट, पावसाळा या सगळ्यांचा विचार करता या संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होणार हे निश्चित आहे.

सहकारी संस्थांबाबत ९७वी घटना दुरूस्ती झाल्यानंतर निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर एकदमच निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाल्याने सहकार विभागावर ताण आला. त्यातून आता कोठे निवडणुका नियमित सुरू झाल्या. तोपर्यंत राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीन महिने निवडणुका लांबणीवर टाकल्या. त्याची मुदत १८ जूनपर्यंत आहे. राज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो. यासाठी सोमवारी राज्य सरकारने मुदत संपलेल्या संस्थांच्या संचालक मंडळास निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.‘कुंभी’ची निवडणूक वेळेतच होणार!कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २८ डिसेंबर २०२० रोजी संपत आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाऊन २७ डिसेंबरला मतदान होईल, असे साखर सहसंचालक कार्यालयाने नियोजन केले असल्याने निवडणूक वेळेतच होण्याची शक्यता आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर?जिल्ह्यातील तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होत आहेत. ‘कोरोना’चे संकट आणखी किती काळ राहणार, याचा अंदाज नसल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका विहीत वेळेत होण्याची शक्यता धूसर आहे. 

‘कुंभी’ची निवडणूक वेळेतच होणार!कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २८ डिसेंबर २०२० रोजी संपत आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाऊन २७ डिसेंबरला मतदान होईल, असे साखर सहसंचालक कार्यालयाने नियोजन केले असल्याने निवडणूक वेळेतच होण्याची शक्यता आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर?जिल्ह्यातील तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होत आहेत. ‘कोरोना’चे संकट आणखी किती काळ राहणार, याचा अंदाज नसल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका विहीत वेळेत होण्याची शक्यता धूसर आहे.या प्रमुख संस्थांच्या निवडणुका लटकल्या-संस्था मुदत कधी संपली‘गोकुळ’ मार्च २०२०जिल्हा बॅँक मे २०२०शिक्षक बॅँक एप्रिल २०२०‘कोजिमाशि’ एप्रिल २०२०‘शरद’ साखर मार्च २०२०डी. वाय. पाटील साखर मार्च २०२०राजाराम साखर एप्रिल २०२०वारणा साखर मे २०२०कुंभी साखर डिसेंबर २०२०कोल्हापूर बाजार समिती आॅगस्ट २०२०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक