शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

जिल्ह्यातील  संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:01 IST

राज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो. यासाठी सोमवारी राज्य सरकारने मुदत संपलेल्या संस्थांच्या संचालक मंडळास निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देराज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो.

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २५०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून, ‘गोकुळ’, जिल्हा मध्यवर्ती बॅँक, शिक्षक बॅँकेसह ‘राजाराम’, ‘वारणा’ साखर कारखान्यांचा समावेश आहे. ‘कोरोना’चे संकट, पावसाळा या सगळ्यांचा विचार करता या संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होणार हे निश्चित आहे.

सहकारी संस्थांबाबत ९७वी घटना दुरूस्ती झाल्यानंतर निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर एकदमच निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाल्याने सहकार विभागावर ताण आला. त्यातून आता कोठे निवडणुका नियमित सुरू झाल्या. तोपर्यंत राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीन महिने निवडणुका लांबणीवर टाकल्या. त्याची मुदत १८ जूनपर्यंत आहे. राज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो. यासाठी सोमवारी राज्य सरकारने मुदत संपलेल्या संस्थांच्या संचालक मंडळास निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.‘कुंभी’ची निवडणूक वेळेतच होणार!कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २८ डिसेंबर २०२० रोजी संपत आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाऊन २७ डिसेंबरला मतदान होईल, असे साखर सहसंचालक कार्यालयाने नियोजन केले असल्याने निवडणूक वेळेतच होण्याची शक्यता आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर?जिल्ह्यातील तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होत आहेत. ‘कोरोना’चे संकट आणखी किती काळ राहणार, याचा अंदाज नसल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका विहीत वेळेत होण्याची शक्यता धूसर आहे. 

‘कुंभी’ची निवडणूक वेळेतच होणार!कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २८ डिसेंबर २०२० रोजी संपत आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाऊन २७ डिसेंबरला मतदान होईल, असे साखर सहसंचालक कार्यालयाने नियोजन केले असल्याने निवडणूक वेळेतच होण्याची शक्यता आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर?जिल्ह्यातील तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होत आहेत. ‘कोरोना’चे संकट आणखी किती काळ राहणार, याचा अंदाज नसल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका विहीत वेळेत होण्याची शक्यता धूसर आहे.या प्रमुख संस्थांच्या निवडणुका लटकल्या-संस्था मुदत कधी संपली‘गोकुळ’ मार्च २०२०जिल्हा बॅँक मे २०२०शिक्षक बॅँक एप्रिल २०२०‘कोजिमाशि’ एप्रिल २०२०‘शरद’ साखर मार्च २०२०डी. वाय. पाटील साखर मार्च २०२०राजाराम साखर एप्रिल २०२०वारणा साखर मे २०२०कुंभी साखर डिसेंबर २०२०कोल्हापूर बाजार समिती आॅगस्ट २०२०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक