शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वृद्ध आई-वडिलांसाठी मुलगीच बनली श्रावणबाळ

By admin | Updated: December 19, 2014 00:30 IST

संसारावर तुळशीपत्र ठेवून सुरू आहे सेवा : समाजातील दानशूरांकडून अश्विनीला हवाय मदतीचा हात

अनिल पाटील - मुरगूड -‘म्हातारपण नको गा देवा’ असा सूर सर्वत्र पाहावयास मिळतो. कारण उतरत्या वयात वृद्ध पती-पत्नीला एकमेकांचाच आधार बनावा लागतो, तर काहींना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागतो; पण याला अपवाद आहे मुरगूडमधील घटना. लग्न होऊन आपल्या पती, मुलांबरोबर आनंदात राहण्याचे सोडून गेल्या तीन वर्षांपासून अश्विनी आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा-शुश्रूषा करत आहे. संधिवाताने दोन्हीही पायाने अधू झालेल्या आपल्या आईला स्वत:च्या पायावर उभा करूनच आपल्या संसाराकडे परतणार, या अश्विनीच्या निश्चयामुळे वंशाला दिवाच पाहिजे, अशा मानसिकतेमध्ये अडकलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे. वृद्ध आई-वडिलांची सेवा करून आधुनिक काळातील ‘श्रावणबाळ’ ठरलेल्या अश्विनीला मात्र आईच्या शस्त्रक्रियेसाठी समाजाचे पाठबळ हवे आहे.कोगनोळी (ता. चिकोडी) येथील आप्पासाहेब कदम हे व्यवसायाने डॉक्टर. अत्यल्प फीमध्ये लोकांवर उपचार करणारे म्हणून त्यांची ओळख. त्यांच्या पत्नी उर्मिला यांना संधिवाताचा त्रास सुरू झाला. अगदी थोडा थोडा वाटणारा त्रास हा पुढे इतका वाढला की, त्यांना चालता, उठता येईना. त्यांना पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च झाला. खर्चापोटी कदम यांनी आपली शेती, जमीन आणि घरही विकले. शस्त्रक्रिया झाली; तरीसुद्धा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. दैवाला दोष देत कदम कुटुंब मुरगूडमध्ये वास्तव्याला आले. पाच वर्षांपूर्वी दिंगणघाट (ता. वर्धा) येथील सधन कुटुंबातील मुलाबरोबर अश्विनीचे लग्न झाले. अश्विनी आपल्या संसारात सुखी होती; पण तीचे मन मात्र आई -वडिलांकडेच धावत होते. शेवटी ती एक वर्षांच्या छोट्या मुलासह मुरगूडमध्ये दाखल झाली आणि आपल्या आईची सेवा सुरू केली; पण नियतीने पुन्हा एकदा प्रताप दाखवला. वडिलांच्या हृदयामध्ये अडथळा निर्माण झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले.