शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

दोन्ही उमेदवारांकडून एकगठ्ठा मतदान मिळविण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:01 IST

अतुल आंबी । लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील एकगठ्ठा मतदान असलेला इचलकरंजी मतदारसंघ आहे. याठिकाणी भाजप-शिवसेनेला ...

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील एकगठ्ठा मतदान असलेला इचलकरंजी मतदारसंघ आहे. याठिकाणी भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी म्हणून कॉँग्रेस व राष्टÑवादीसह महाआघाडीने खासदार राजू शेट्टी यांना पाठबळ देत त्यांच्या विजयासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. परिणामी, सुरुवातीला शहरात पूर्णत: शेट्टीविरोधी असणाऱ्या वातावरणात थोडा-फार फरक पडला आहे. तसेच धैर्यशील माने यांना सोप्या वाटणाऱ्या या मतदारसंघात त्यांनाही आमदार सुरेश हाळवणकर यांचे बोट धरून कंबर कसावी लागणार आहे.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख ९१ हजार ३२७ मतदार संख्या आहे. त्यातील ग्रामीण भागाच्या पाच गावांचे मिळून ७१ हजार मतदार आहेत. उर्वरित सुमारे दोन लाख २० हजार मतदार हे इचलकरंजी शहरातील आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातील अन्य मतदारसंघाच्या तुलनेत गावे, वाडी-वस्त्या व शहरांच्या मानाने इचलकरंजी मतदारसंघात एकगठ्ठा मतदान आहे.या मतदारसंघात वारणा पाणी योजनेवरून राजकारण सुरू आहे. त्यामध्ये इचलकरंजी शहराला पाणी मिळण्यासाठी खासदार शेट्टी यांनी म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत, असा मतप्रवाह बनला आहे. शेट्टी यांनी प्रयत्न करत सर्वांना एकत्रित करून सामंजस्य तोडगा काढावा, अशी लोकभावना होती. त्यावर शेट्टी यांनी प्रयत्न केला असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच त्यामध्ये राजकारण करून हाळवणकर यांनीच निवडणुकीसाठी हा मुद्दा प्रलंबित ठेवला असल्याचा आरोपही कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. याबरोबरच शेट्टी यांना विरोध होणारा दुसरा मुद्दा वस्रोद्योगाचा आहे. त्यावरही शेट्टी यांच्याकडून वस्रोद्योगासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा निधी आणला असून, वस्रोद्योगाच्या विविध प्रश्नांसाठी वेळोवेळी केंद्रीय मंत्र्यांकडे फेºया मारल्याचेही सांगितले जात आहे. तसेच या प्रयत्नाला केंद्रीय वस्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही शेट्टी यांनी जाहीर सभेत केला आहे.सुरुवातीपासून विरोधकांनी या दोन्ही मुद्द्यांवर शेट्टींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर शेट्टींच्या बाजूने असणाºया कॉँग्रेस, राष्टÑवादी, कम्युनिस्ट पक्ष, जनता दल यांनी हे दोन्ही मुद्दे खोडून काढत वारणा योजनेतील राजकारणाचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे. परिणाम, निवडणुकीच्या सुरुवातीला पूर्णत: शेट्टीविरोधी निर्माण झालेले वातावरण काही प्रमाणात बदलण्यास यश मिळेल, असे दिसत आहे.इतर मतदारसंघांपेक्षा इचलकरंजी मतदारसंघात आपणास मोठे लीड मिळू शकते, या भावनेने या मतदारसंघाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करणाºया धैर्यशील माने यांना शेट्टीविरोधी वातावरण कायम ठेवण्यासाठी व त्याचा फायदा स्वत:ला करून घेण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. माने यांना आमदार हाळवणकर यांची साथ मिळत असल्याने त्यांच्यासोबत शिवसेनेची सांगड घालून प्रचाराची यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखली असून, कॉर्नर सभा व मोठ्या प्रचार सभा यांचेही नियोजन केले आहे.हाळवणकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीत त्यांनी आपला संपूर्ण गट व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बुथलेवल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तर शेट्टी यांना पाठबळ देत प्रकाश आवाडे यांनी आपल्या गटासह महाआघाडीतील नेत्यांना एकत्रित करून ग्राऊंड लेवल प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी नियोजन केले आहे.जांभळे गटाचा शेट्टींना पाठिंबाजांभळे गटाचे प्रमुख असलेले अशोकराव जांभळे यांना माजी खासदार बाळासाहेब माने यांनी आमदार केले होते. त्यामुळे ते सरुवातीपासून माने गटाशी एकनिष्ठ आहेत. मात्र, राष्टÑवादी कॉँग्रेस गटातून ते पवार यांच्याशीही जोडले गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते सुरुवातीला कोणाच्या बाजूने पूर्ण क्षमतेने उतरले नव्हते. तसेच माने यांनी पक्ष बदलताना आपणास विचारात घेतले नसल्याची सलही त्यांच्या मनात आहे. त्यामुळे जांभळे यांच्यासह त्यांच्या गटाने शेट्टी यांना पाठिंबा देत प्रचार सुरू केला आहे.