शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

मैत्रीपूर्ण निवडणुकीचा प्रभावी ‘आणूर पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:13 IST

म्हाकवे : कागल तालुक्यात सध्या ५३ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावात टोकाची ईर्षा, हाडवैर पाहायला मिळत आहे. ...

म्हाकवे :

कागल तालुक्यात सध्या ५३ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावात टोकाची ईर्षा, हाडवैर पाहायला मिळत आहे. मात्र, इतर गावांप्रमाणेच ईर्षेने आणि अटीतटीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या आणूर (ता. कागल) येथील समजूतदारपणाही वाखणण्यायोग्य आहे.येथील मतदान संपले की, उमेदवारांसह नेतेमंडळी हातात हात घालून मतदान केंद्रावरून घरी परतात. या गावाचा मैत्रीपूर्ण निवडणूक पॅटर्न अनेक वर्षांपासून परिसरात चर्चेचा विषय असला तरी, अनुकरण मात्र होताना दिसत नाही.

वेदगंगा नदीच्या उत्तर तिरावर वसलेले हे गाव शाश्वत पाण्यामुळे शेतीच्या आणि दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनले आहे. येथे मंडलिक, मुश्रिफ, संजय घाटगे, राजे यांसह संभाजी ब्रिगेड, लाल बावटा पक्षांचे अस्तित्व आहे. सर्वच निवडणुकांसह येथील ग्रामपंचायत, सेवा संस्था, दूध संस्थेच्या निवडणुकाही अटीतटीने होतात. मात्र,निवडणुकीचा फाॅर्म भरल्यापासून मतदान होईपर्यंतच ईर्षा असते. मतदान संपताच सायंकाळी ५.३० वाजता मतदान केंद्रावरून बाहेर पडताना मैत्रीपूर्ण चर्चा करत सर्वजण बाहेर पडत असतात.

विशेष म्हणजे आजतागायत कोणताही राजकीय वाद-विवाद झालेला नाही.तसेच येथेही भावकीतच परस्परविरोधी उमेदवारी दिली जाते. परंतु, हा वाद उंबऱ्याच्या बाहेर ठेवून घरगुती कार्यक्रमाला पुन्हा एकसंध होतात. त्यामुळे येथील मैत्रीपूर्ण राजकीय निवडणुकीचा पॅटर्न इतर गावांनीही अवलंबल्यास प्रशासनावरील ताण कमी होईल.

दूरदृष्टी असणारे नेतृत्व...

मारुतीराव सावडकर यांनी १९८० मध्ये नदीत उभारलेले जॅकवेल आजही सुस्थितीत आहे. त्यामुळे गावाला कायमस्वरूपी स्वच्छ पाणी मिळते. तसेच गावाच्या उत्तरेला स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही रस्त्याची (बायपास) गरज लक्षात घेऊन तो केला. त्यामुळे त्यांना एकदा सत्ता गमवावी लागली. मात्र, सर्वांची सोय झाली. तसेच शिवाजीराव चौगुले यांनी केलेल्या पाणी योजनेमुळे शेतीचे नंदनवन झाले आहे.