शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मैत्रीपूर्ण निवडणुकीचा प्रभावी ‘आणूर पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:13 IST

म्हाकवे : कागल तालुक्यात सध्या ५३ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावात टोकाची ईर्षा, हाडवैर पाहायला मिळत आहे. ...

म्हाकवे :

कागल तालुक्यात सध्या ५३ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावात टोकाची ईर्षा, हाडवैर पाहायला मिळत आहे. मात्र, इतर गावांप्रमाणेच ईर्षेने आणि अटीतटीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या आणूर (ता. कागल) येथील समजूतदारपणाही वाखणण्यायोग्य आहे.येथील मतदान संपले की, उमेदवारांसह नेतेमंडळी हातात हात घालून मतदान केंद्रावरून घरी परतात. या गावाचा मैत्रीपूर्ण निवडणूक पॅटर्न अनेक वर्षांपासून परिसरात चर्चेचा विषय असला तरी, अनुकरण मात्र होताना दिसत नाही.

वेदगंगा नदीच्या उत्तर तिरावर वसलेले हे गाव शाश्वत पाण्यामुळे शेतीच्या आणि दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनले आहे. येथे मंडलिक, मुश्रिफ, संजय घाटगे, राजे यांसह संभाजी ब्रिगेड, लाल बावटा पक्षांचे अस्तित्व आहे. सर्वच निवडणुकांसह येथील ग्रामपंचायत, सेवा संस्था, दूध संस्थेच्या निवडणुकाही अटीतटीने होतात. मात्र,निवडणुकीचा फाॅर्म भरल्यापासून मतदान होईपर्यंतच ईर्षा असते. मतदान संपताच सायंकाळी ५.३० वाजता मतदान केंद्रावरून बाहेर पडताना मैत्रीपूर्ण चर्चा करत सर्वजण बाहेर पडत असतात.

विशेष म्हणजे आजतागायत कोणताही राजकीय वाद-विवाद झालेला नाही.तसेच येथेही भावकीतच परस्परविरोधी उमेदवारी दिली जाते. परंतु, हा वाद उंबऱ्याच्या बाहेर ठेवून घरगुती कार्यक्रमाला पुन्हा एकसंध होतात. त्यामुळे येथील मैत्रीपूर्ण राजकीय निवडणुकीचा पॅटर्न इतर गावांनीही अवलंबल्यास प्रशासनावरील ताण कमी होईल.

दूरदृष्टी असणारे नेतृत्व...

मारुतीराव सावडकर यांनी १९८० मध्ये नदीत उभारलेले जॅकवेल आजही सुस्थितीत आहे. त्यामुळे गावाला कायमस्वरूपी स्वच्छ पाणी मिळते. तसेच गावाच्या उत्तरेला स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही रस्त्याची (बायपास) गरज लक्षात घेऊन तो केला. त्यामुळे त्यांना एकदा सत्ता गमवावी लागली. मात्र, सर्वांची सोय झाली. तसेच शिवाजीराव चौगुले यांनी केलेल्या पाणी योजनेमुळे शेतीचे नंदनवन झाले आहे.