शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीपूर्ण निवडणुकीचा प्रभावी ‘आणूर पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:13 IST

म्हाकवे : कागल तालुक्यात सध्या ५३ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावात टोकाची ईर्षा, हाडवैर पाहायला मिळत आहे. ...

म्हाकवे :

कागल तालुक्यात सध्या ५३ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावात टोकाची ईर्षा, हाडवैर पाहायला मिळत आहे. मात्र, इतर गावांप्रमाणेच ईर्षेने आणि अटीतटीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या आणूर (ता. कागल) येथील समजूतदारपणाही वाखणण्यायोग्य आहे.येथील मतदान संपले की, उमेदवारांसह नेतेमंडळी हातात हात घालून मतदान केंद्रावरून घरी परतात. या गावाचा मैत्रीपूर्ण निवडणूक पॅटर्न अनेक वर्षांपासून परिसरात चर्चेचा विषय असला तरी, अनुकरण मात्र होताना दिसत नाही.

वेदगंगा नदीच्या उत्तर तिरावर वसलेले हे गाव शाश्वत पाण्यामुळे शेतीच्या आणि दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनले आहे. येथे मंडलिक, मुश्रिफ, संजय घाटगे, राजे यांसह संभाजी ब्रिगेड, लाल बावटा पक्षांचे अस्तित्व आहे. सर्वच निवडणुकांसह येथील ग्रामपंचायत, सेवा संस्था, दूध संस्थेच्या निवडणुकाही अटीतटीने होतात. मात्र,निवडणुकीचा फाॅर्म भरल्यापासून मतदान होईपर्यंतच ईर्षा असते. मतदान संपताच सायंकाळी ५.३० वाजता मतदान केंद्रावरून बाहेर पडताना मैत्रीपूर्ण चर्चा करत सर्वजण बाहेर पडत असतात.

विशेष म्हणजे आजतागायत कोणताही राजकीय वाद-विवाद झालेला नाही.तसेच येथेही भावकीतच परस्परविरोधी उमेदवारी दिली जाते. परंतु, हा वाद उंबऱ्याच्या बाहेर ठेवून घरगुती कार्यक्रमाला पुन्हा एकसंध होतात. त्यामुळे येथील मैत्रीपूर्ण राजकीय निवडणुकीचा पॅटर्न इतर गावांनीही अवलंबल्यास प्रशासनावरील ताण कमी होईल.

दूरदृष्टी असणारे नेतृत्व...

मारुतीराव सावडकर यांनी १९८० मध्ये नदीत उभारलेले जॅकवेल आजही सुस्थितीत आहे. त्यामुळे गावाला कायमस्वरूपी स्वच्छ पाणी मिळते. तसेच गावाच्या उत्तरेला स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही रस्त्याची (बायपास) गरज लक्षात घेऊन तो केला. त्यामुळे त्यांना एकदा सत्ता गमवावी लागली. मात्र, सर्वांची सोय झाली. तसेच शिवाजीराव चौगुले यांनी केलेल्या पाणी योजनेमुळे शेतीचे नंदनवन झाले आहे.