शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

शिक्षण विभागाचा निर्णय : २६ जूनअखेर विशेष अभियान; प्रवेश क्रमांकाशी जोडणार

By admin | Updated: April 23, 2015 00:29 IST

प्रत्येक बालकाचे आधार कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना आधार कार्डशी जोडण्यात येतील.

भीमगोंडा देसाई -कोल्हापूरशासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास आधार कार्ड देण्यासाठी २७ एप्रिल ते २६ जूनअखेर विशेष अभियान राबविण्याचा आदेश मंगळवारी अप्पर सचिव बी. आर. माळी यांनी काढला आहे. प्रवेश क्रमांकाशी जोडून शाळाबाह्य मुलांचा नेमकेपणाने शोध घेण्यासाठी आधार कार्डची मदत घेतली जाणार आहे. विशेष बैठक बोलावून ८ मे रोजी गावातील शंभर टक्के बालकांचे आधार कार्ड तयार करण्याचा संकल्प करून ग्रामस्थांना प्रतिज्ञा दिली जाईलसमाजातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचे धडे घेतल्याशिवाय शिक्षण हक्क कायद्याचा मुख्य हेतू सफल होणार नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापूर्वी शिक्षण प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले. मात्र,नेमकेपणाने शाळाबाह्य मुलांची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाने आता शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रवेश क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आधार कार्ड देण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी यांनी शाळानिहाय किती विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीत, त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याची सूचना दिली आहे. ज्या दिवशी शाळेत, वॉर्डात, गावात आधार कार्डसाठी आवश्यक व्यवस्था केली आहे, त्याच्या आदल्या दिवशी संबंधित विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकास माहिती देण्याची जबाबदारी शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सोशल मीडिया, वृत्तपत्र, दवंडी, प्रचारपत्रके, या माध्यमातून व्यापक जागृती होणार आहे. २७ एप्रिलपासून अभियानाला प्रारंभ होईल. २ मे अखेर गटशिक्षणाधिकारी यांनी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची नावे देणे, ३ ते ४ मे अखेर गावनिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देणे, ५ रोजी जिल्हास्तरावर, तर ६ रोजी बैठक घेऊन नियोजन करणे, ७ रोजी गावपातळीवर आधार कार्डचे नियोजन जाहीर करणे, ८ रोजी गावातून फेरी काढून जागृती करणे, अशी अंमलबजावणी केली जाणार आहे. २६ जूनपर्यंत आधार कार्ड देऊन प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. प्रतिज्ञा अशीप्रत्येक बालकाचे आधार कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना आधार कार्डशी जोडण्यात येतील. त्याचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घेता येईल, याची आम्हाला जाणीव आहे. आधार कार्डाच्या क्रमांकाशी शाळेतील प्रगती यंत्रणा जोडल्यामुळे कोणता विद्यार्थी काय, किती शिकत आहे, याचीही माहिती होईल. आधार कार्डमुळे विद्यार्थी संलग्न झाल्याने शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी शाळेशी जोडलेला राहील. शाळाबाह्य होणार नाही.