शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शिक्षण विभागाचा निर्णय : २६ जूनअखेर विशेष अभियान; प्रवेश क्रमांकाशी जोडणार

By admin | Updated: April 23, 2015 00:29 IST

प्रत्येक बालकाचे आधार कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना आधार कार्डशी जोडण्यात येतील.

भीमगोंडा देसाई -कोल्हापूरशासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास आधार कार्ड देण्यासाठी २७ एप्रिल ते २६ जूनअखेर विशेष अभियान राबविण्याचा आदेश मंगळवारी अप्पर सचिव बी. आर. माळी यांनी काढला आहे. प्रवेश क्रमांकाशी जोडून शाळाबाह्य मुलांचा नेमकेपणाने शोध घेण्यासाठी आधार कार्डची मदत घेतली जाणार आहे. विशेष बैठक बोलावून ८ मे रोजी गावातील शंभर टक्के बालकांचे आधार कार्ड तयार करण्याचा संकल्प करून ग्रामस्थांना प्रतिज्ञा दिली जाईलसमाजातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचे धडे घेतल्याशिवाय शिक्षण हक्क कायद्याचा मुख्य हेतू सफल होणार नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापूर्वी शिक्षण प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले. मात्र,नेमकेपणाने शाळाबाह्य मुलांची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाने आता शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रवेश क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आधार कार्ड देण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी यांनी शाळानिहाय किती विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीत, त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याची सूचना दिली आहे. ज्या दिवशी शाळेत, वॉर्डात, गावात आधार कार्डसाठी आवश्यक व्यवस्था केली आहे, त्याच्या आदल्या दिवशी संबंधित विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकास माहिती देण्याची जबाबदारी शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सोशल मीडिया, वृत्तपत्र, दवंडी, प्रचारपत्रके, या माध्यमातून व्यापक जागृती होणार आहे. २७ एप्रिलपासून अभियानाला प्रारंभ होईल. २ मे अखेर गटशिक्षणाधिकारी यांनी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची नावे देणे, ३ ते ४ मे अखेर गावनिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देणे, ५ रोजी जिल्हास्तरावर, तर ६ रोजी बैठक घेऊन नियोजन करणे, ७ रोजी गावपातळीवर आधार कार्डचे नियोजन जाहीर करणे, ८ रोजी गावातून फेरी काढून जागृती करणे, अशी अंमलबजावणी केली जाणार आहे. २६ जूनपर्यंत आधार कार्ड देऊन प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. प्रतिज्ञा अशीप्रत्येक बालकाचे आधार कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना आधार कार्डशी जोडण्यात येतील. त्याचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घेता येईल, याची आम्हाला जाणीव आहे. आधार कार्डाच्या क्रमांकाशी शाळेतील प्रगती यंत्रणा जोडल्यामुळे कोणता विद्यार्थी काय, किती शिकत आहे, याचीही माहिती होईल. आधार कार्डमुळे विद्यार्थी संलग्न झाल्याने शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी शाळेशी जोडलेला राहील. शाळाबाह्य होणार नाही.