शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

शिक्षण विभागाचा निर्णय : २६ जूनअखेर विशेष अभियान; प्रवेश क्रमांकाशी जोडणार

By admin | Updated: April 23, 2015 00:29 IST

प्रत्येक बालकाचे आधार कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना आधार कार्डशी जोडण्यात येतील.

भीमगोंडा देसाई -कोल्हापूरशासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास आधार कार्ड देण्यासाठी २७ एप्रिल ते २६ जूनअखेर विशेष अभियान राबविण्याचा आदेश मंगळवारी अप्पर सचिव बी. आर. माळी यांनी काढला आहे. प्रवेश क्रमांकाशी जोडून शाळाबाह्य मुलांचा नेमकेपणाने शोध घेण्यासाठी आधार कार्डची मदत घेतली जाणार आहे. विशेष बैठक बोलावून ८ मे रोजी गावातील शंभर टक्के बालकांचे आधार कार्ड तयार करण्याचा संकल्प करून ग्रामस्थांना प्रतिज्ञा दिली जाईलसमाजातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचे धडे घेतल्याशिवाय शिक्षण हक्क कायद्याचा मुख्य हेतू सफल होणार नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापूर्वी शिक्षण प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले. मात्र,नेमकेपणाने शाळाबाह्य मुलांची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाने आता शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रवेश क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आधार कार्ड देण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी यांनी शाळानिहाय किती विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीत, त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याची सूचना दिली आहे. ज्या दिवशी शाळेत, वॉर्डात, गावात आधार कार्डसाठी आवश्यक व्यवस्था केली आहे, त्याच्या आदल्या दिवशी संबंधित विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकास माहिती देण्याची जबाबदारी शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सोशल मीडिया, वृत्तपत्र, दवंडी, प्रचारपत्रके, या माध्यमातून व्यापक जागृती होणार आहे. २७ एप्रिलपासून अभियानाला प्रारंभ होईल. २ मे अखेर गटशिक्षणाधिकारी यांनी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची नावे देणे, ३ ते ४ मे अखेर गावनिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देणे, ५ रोजी जिल्हास्तरावर, तर ६ रोजी बैठक घेऊन नियोजन करणे, ७ रोजी गावपातळीवर आधार कार्डचे नियोजन जाहीर करणे, ८ रोजी गावातून फेरी काढून जागृती करणे, अशी अंमलबजावणी केली जाणार आहे. २६ जूनपर्यंत आधार कार्ड देऊन प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. प्रतिज्ञा अशीप्रत्येक बालकाचे आधार कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना आधार कार्डशी जोडण्यात येतील. त्याचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घेता येईल, याची आम्हाला जाणीव आहे. आधार कार्डाच्या क्रमांकाशी शाळेतील प्रगती यंत्रणा जोडल्यामुळे कोणता विद्यार्थी काय, किती शिकत आहे, याचीही माहिती होईल. आधार कार्डमुळे विद्यार्थी संलग्न झाल्याने शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी शाळेशी जोडलेला राहील. शाळाबाह्य होणार नाही.