शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

इदरगंज फुलले

By admin | Updated: September 18, 2015 23:34 IST

प्रवेशास बंदी : रंगीबेरंगी फुलांचा गालिचा

संजय पारकर --राधानगरी येथील अभयारण्यातील इदरगंज पठार विविध प्रजातींच्या व रंगांच्या फुलांनी बहरले आहे; मात्र पर्यटकांना प्रवेशास बंदी असल्याने हे पुष्पसौंदर्य नजरेआड दडून राहत आहे. वन्यजीव विभागाचा येथील काही भाग टुरिझम क्षेत्र करण्याचा प्रस्ताव कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.दूधगंगा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे आठ ते दहा किलोमीटर आत हे पठार आहे. एका बाजूस काळम्मावाडी धरण व दुसऱ्या बाजूला पाटपन्हाळा, बनाचीवाडी परिसर असलेल्या डोंगरावर सुमारे दहा किलोमीटर हे पठार आहे. पावसाळा सुरू झाला की, या पठारावर असंख्य प्रकारच्या लहान वनस्पती, गवत उगवते. सप्टेंबरमध्ये पाऊस कमी झाला की, या वनस्पतींना वेगवेगळ््या रंगांची, आकर्षक फुले येतात. त्यामुळे संपूर्ण पठारावर जणू रंगबेरंगी गालिचा अंथरल्याचा भासच होतो. कास पठाराच्या तोडीस तोड असे येथील पुष्पसौंदर्य आहे. अभयारण्याच्या अतिसंवेदनशील भागात हे क्षेत्र असल्याने येथे मानवी वावराला बंदी आहे. वन्यजीव विभागाने येथे सात किलोमीटरचा जंगलभ्रमंती मार्ग तयार केला आहे. तसेच काही पाऊलवाटाही विकसित केल्या आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी काही काटेकोर बंधने पाळून पावसाळ््यात जुलै ते आॅक्टोबर या काळात निसर्गप्रेमी पर्यटकांना या परिसरात पायवाटेने भ्रमंतीसाठी मुभा द्यावी, असा प्रस्ताव वन्यजीव विभागाने दोन वर्षांपूर्वी पाठविला आहे. त्यानुसार येथे पाहणीही झाली. मात्र, याच पाहणी दरम्यान येथे बांबू पिटवायझ जातीच्या अतिजहाल विषारी व दुर्मीळ सापांचे अस्तित्व जाणवले होते. त्यामुळे या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नाही. याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास या दुर्मीळ पुष्पसौंदर्याचा आनंद निसर्गप्रेमींना मिळणार आहे.