शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाचट अभियानाला दोनच वर्षांत ग्रहण

By admin | Updated: December 14, 2014 23:54 IST

शासकीय पातळीवरही उदासीनता : गैरसमजातून शेतकऱ्यांकडून उसाच्या पाचटाला आग

प्रकाश पाटील -कोपार्डे --उसाची तोड झाल्यानंतर त्यातून शिल्लक राहिलेला पाला (पाचट) शेतकरी पेटवून देऊन विल्हेवाट लावत असत. यातून निर्माण होणारी उष्णता व कार्बन हा प्रदूषणाला बळ देत असल्याने आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने यात सातत्याने वाढ होत गेल्याने शासन पातळीवर ‘पाचट राखा, पाचट कुजवा’ हा मंत्र घेऊन कृषी विभागाच्यावतीने २०१२ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात तत्कालीन कृषी अधीक्षक उमेश पाटील यांनी पाचट अभियान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवले.२०१२ मध्ये कृषी अधीक्षक उमेश पाटील यांनी उसाचे पाचट मोठ्या प्रमाणात जाळले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हेच पाचट तसेच शेतात एक सरी आड एक गाडल्यास मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती करता येऊ शकते व प्रदूषणालाही आळा बसू शकतो. हा संदेश घेऊन सर्वच तालुका कृषी अधिकाऱ्यांना कामाला लावले. त्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करून प्रबोधनासाठी जाहिरातीवर भर दिला. एवढेच नाही तर जे शेतकरी पाचट अभियानात भाग घेतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हवाईसफर घडवून आणण्यासाठी योजना राबवली. यातून मोठे प्रबोधन होऊन २०१२ व २०१३ या दोन वर्षांत पाचट अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. २०१२ मध्ये प्रत्येक तालुक्यातून पाचट अभियानातून भाग घेणाऱ्या दोन शेतकऱ्यांची निवड ड्रॉ पद्धतीने करून सफरही घडवून आणली.मात्र, यानंतर कृषी विभागाने हे अभियान दुर्लक्षित केल्याने अक्षरश: याला उतरती कळा लागली आहे. त्यातच पाचट शेतातच राखल्याने हुमणी उंदीर व किडीचा प्रादुर्भाव होत असल्याचा गैरसमज निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाचट जाळण्याचे प्रमाण ९५ ते ९९ टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्हा अधीक्षक उमेश पाटील यांची बदली झाल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी समजून त्याचे प्रबोधन सुरू ठेवणे गरजेचे होते. मात्र, नेमके इथेच कृषी विभाग कमी पडला असल्याने पाचट अभियान जळून खाक होताना दिसत आहे.पाचट शेतातच टाकल्याने जीवाणू, नत्र, स्फुरद, चांगल्या प्रकारे जमिनीला नैसर्गिकच मिळत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत होता. सध्या जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र एक लाख ४६ हजार हेक्टरवर पोहोचला आहे. जर पाचट अभियान जोमात सुरू राहिले असते तर पाण्याची, विजेची व पर्यायाने खताची बचत झाली असती; पण शासकीय यंत्रणाच ढिम्म असल्याने शेतीचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञान बांधावर कोण पोहोचणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.पाचट अभियानाची शेतकऱ्यांबरोबर शासनालाही नैसर्गिक गरज आहे. काही प्रमाणात शेतकऱ्यांत गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन पाचट अभियानाची पुन्हा व्याप्ती वाढविणार आहे.- मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधीक्षक