शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

प्रतिवर्षी पाच हजार जणांना कर्ज देणार

By admin | Updated: October 17, 2016 01:07 IST

अण्णासाहेब पाटील महामंडळ : सरकार भरणार व्याज

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत प्रतिवर्षी पाच हजार युवकांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे. त्याचे व्याजही सरकार भरेल. तसेच या कर्जप्रकरणासाठी असलेली किचकट कागदपत्रांची प्रक्रियाही सुलभ करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने १३ आणि १४ आॅक्टोबरच्या अंकामध्ये या महामंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालयातील कारभाराची वस्तुस्थिती दोन भागांमध्ये मांडली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कार्यालयांचाही कारभार सुधारण्याबाबत तातडीने निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या महामंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालय २२०२/२००३ पासून सुरू झाले. गेल्या चौदा वर्षांत या मंडळाकडून केवळ चौघांना व्यवसायासाठी बीज भांडवल मंजूर झाले. या प्रकरणांसाठी एवढी कागदपत्रे जोडावी लागतात की, ती यादी पाहूनच कर्ज घेणारा इच्छुक घामाघूम होतो, हे वास्तव ‘लोकमत’ने सविस्तरपणे मांडले होते. तसेच इथल्या कर्मचाऱ्यांचीही मानसिकता उदासीनतेची राहिली आहे. कर्जाची विचारणा करणाऱ्याला बसायला सांगण्याचे सौजन्य तर नाहीच; परंतु आलेल्यांना एक माहितीपत्रक देऊन त्यांची इथे बोळवण केली जाते. हे सर्व वास्तव ‘लोकमत’ने दोन भागांमध्ये मांडले होते. याबद्दल ग्रामीण युवकांच्या प्रतिक्रियाही नोंदविण्यात आल्या होत्या. याची दखल घेत पालकमंत्री पाटील म्हणाले की, सरकारी कारभार म्हणून या महामंडळाच्या बाबतीत जे शैथिल्य आले आहे, ते तर दूर करणारच आहोत. कागदपत्रांमध्येही सुलभता आणली जाईल. तसेच या मंडळाला जो २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्यातून प्रतिवर्षी पाच हजार तरुण-तरुणींना व्यवसायासाठी बीजभांडवल दिले जाईल व त्याचे व्याज सरकार भरणार आहे.