शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

रस्त्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला वीस कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाºयांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.या विभागातील ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाºयांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.या विभागातील रस्त्यांच्या स्थितीचा यावेळी पाटील यांनी आढावा घेऊन दर्जेदार कामाचेही अधिकाºयांना आवाहन केले. यावेळी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता पी. एम. पिडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव आर. डी. जोशी, अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, एन. एम. वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमध्ये उच्च दर्जाचे रस्ते झाले नाहीत. शासनाने रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षांत तीन हजार कोटींपासून सात हजार कोटींपर्यंतचा निधी वाढवत नेला आहे. पुढील दोन वर्षांत राज्यांत ४० हजार किलोमीटरचे रस्ते होतील. २२ हजार किलोमीटरचे चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकामकडील १० हजार किलोमीटरचे तीन पदरी रस्ते आणि ‘भारतमाला’मधून ६ हजार ५०० किलोमीटरचे सहा पदरी रस्त्यांची कामे होणार आहेत. पाटील म्हणाले गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने २ हजार जणांना पदोन्नती दिली आहे. आणखी १०० जणांना देण्यात येणार आहे; पण २०० जणांना निलंबितही करण्यात आले आहे.‘दादां’चा वडीलकीचा सल्लादिवसातील अर्धा तास तरी स्वत:साठी जगा. आपल्या आवडीचे छंद जोपासा. कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. आपआपल्या जीवनसाथीचे म्हणणे नीट समजून घ्या, ऐकून घ्या. सामाजिक उत्तरदायित्व जाणीवपूर्वक जोपासा. संयमाने ऐकण्याची स्वत:ला सवय लावा, समोरच्याचे व्यवस्थित ऐकून घेतल्याने ९० टक्के प्रश्न सुटतात. यातून कार्यालयीन संस्कृतीत विश्वास, जिव्हाळा, एकोपा वाढतो. अशा चांगल्या कार्यसंस्कृतीची आज देशाला गरज आहे, असा वडीलकीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.