शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

रस्त्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला वीस कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाºयांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.या विभागातील ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाºयांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.या विभागातील रस्त्यांच्या स्थितीचा यावेळी पाटील यांनी आढावा घेऊन दर्जेदार कामाचेही अधिकाºयांना आवाहन केले. यावेळी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता पी. एम. पिडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव आर. डी. जोशी, अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, एन. एम. वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमध्ये उच्च दर्जाचे रस्ते झाले नाहीत. शासनाने रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षांत तीन हजार कोटींपासून सात हजार कोटींपर्यंतचा निधी वाढवत नेला आहे. पुढील दोन वर्षांत राज्यांत ४० हजार किलोमीटरचे रस्ते होतील. २२ हजार किलोमीटरचे चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकामकडील १० हजार किलोमीटरचे तीन पदरी रस्ते आणि ‘भारतमाला’मधून ६ हजार ५०० किलोमीटरचे सहा पदरी रस्त्यांची कामे होणार आहेत. पाटील म्हणाले गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने २ हजार जणांना पदोन्नती दिली आहे. आणखी १०० जणांना देण्यात येणार आहे; पण २०० जणांना निलंबितही करण्यात आले आहे.‘दादां’चा वडीलकीचा सल्लादिवसातील अर्धा तास तरी स्वत:साठी जगा. आपल्या आवडीचे छंद जोपासा. कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. आपआपल्या जीवनसाथीचे म्हणणे नीट समजून घ्या, ऐकून घ्या. सामाजिक उत्तरदायित्व जाणीवपूर्वक जोपासा. संयमाने ऐकण्याची स्वत:ला सवय लावा, समोरच्याचे व्यवस्थित ऐकून घेतल्याने ९० टक्के प्रश्न सुटतात. यातून कार्यालयीन संस्कृतीत विश्वास, जिव्हाळा, एकोपा वाढतो. अशा चांगल्या कार्यसंस्कृतीची आज देशाला गरज आहे, असा वडीलकीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.