शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात ६० हजार नागरिकांना दिले ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:48 IST

लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांपासून ते महत्त्वाच्या कारणांसाठी बाहेरगावी जावे लागणाऱ्या नागरिकांपर्यंत अशा ६० हजार लोकांनी गेल्या दीड महिन्यात ई-पासचा लाभ घेतला आहे; तर कागदपत्रांची योग्य पूर्तता न केलेल्या अथवा तांत्रिक कारणांमुळे ९७ हजार १६० अर्ज नाकारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची तत्परता ९७ हजार जणांचे पासचे अर्ज नामंजूर, १३ हजार अर्ज प्रलंबित

इंदुमती गणेशकोल्हापूर : लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांपासून ते महत्त्वाच्या कारणांसाठी बाहेरगावी जावे लागणाऱ्या नागरिकांपर्यंत अशा ६० हजार लोकांनी गेल्या दीड महिन्यात ई-पासचा लाभ घेतला आहे; तर कागदपत्रांची योग्य पूर्तता न केलेल्या अथवा तांत्रिक कारणांमुळे ९७ हजार १६० अर्ज नाकारण्यात आले आहेत.सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनमुळे हजारो नागरिक कोल्हापुरात अडकून पडले होते. लॉकडाऊन ३ पासून सरकारने नागरिकांना ई-पास घेऊन आपापल्या गावी जाण्याची परवानगी दिली. सुरुवातीला ही यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे होती. नंतर मे महिन्यात ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झाली, तेव्हापासून कार्यालयातील १० ते १५ जणांचा स्टाफ या कामात गुंतला होता.

या काळात रेल्वे, बसने गावी गेलेल्या मजुरांपासून ते कोल्हापुरात अडकलेले परस्थ नागरिक, वैद्यकीय कारणांसाठी परगावी जावे लागणारे रुग्ण-नातेवाईक, नातेवाइकाचा मृत्यू अशा सगळ्या अडल्या-नडलेल्या नागरिकांना ई पासद्वारे प्रवासाची परवानगी देण्यात आली. आजवर ६० हजार १४६ नागरिकांनी या ई-पासचा लाभ घेतला. त्यांपैकी ५६ हजार ७५२ नागरिकांच्या पासची वैधता संपली आहे. त्यांचा पासचा कालावधी पूर्ण झाला आहे.प्रवासासाठी दिलेले कारण योग्य नसेल, मेडिकल सर्टिफिकेट जोडलेले नसेल अथवा अर्ज व्यवस्थित भरलेला नसेल असे ९७ हजार १६० अर्ज नाकारण्यात आले आहेत; तर १३ हजार ९१४ अर्ज प्रलंबित आहेत.मृत्यू आणि वैद्यकीय कारणासाठी सूटसध्या नागरिकांना केवळ कोल्हापुरातून बाहेरगावी जाण्यासाठी ई-पास दिला जातो. व्यक्ती एका दिवसात जाऊन येणार असेल तर वन-डे पास दिला जातो. कोणालाही जाताना व येतानाचा पास दिला जात नाही. मात्र या नियमाला नातेवाइकाचे निधन व अत्यावश्यक वैद्यकीय सेवेला वगळण्यात आले आहे. या दोन्ही कारणांमध्ये व्यक्तीला जाण्यासाठी व परत येण्यासाठी ई-पास दिला जातो.कामाचा ताण झाला कमीमहसूल विभागाने आपले मूळ काम बाजूला ठेवून ई-पाससाठी सगळी यंत्रणा लावली आहे. जयसिंगपूरमध्ये पैसे घेऊन ई-पास देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. नोकरी व्यवसाय व उद्योगानिमित्त सांगली-साताऱ्याला जाण्यासाठी दैनंदिन पास देण्याची जबाबदारी जिल्हा उद्योग केंद्र, तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावरील ताण आता कमी झाला आहे. ई-पासचा १० जणांचा स्टाफ वगळता अन्य विभागांतील कर्मचारी आपापली जबाबदारी सांभाळत आहेत.ई-पासची सेवा सुरू झाल्यापासून प्रशासनाकडे दिवसाला कमीत कमी १५००, तर जास्तीत जास्त पाच हजार इतके अर्ज आले आहेत. आता दैनंदिन पासची जबाबदारी विभागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अर्जांचे प्रमाण कमी झाले आहे. नोकरी, व्यवसायाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी ज्यांना परगावी जायचे आहे, त्यांना येथे पास मिळतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर