शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Kolhapur News: मधमाशी चावल्याने रंगकाम कामगाराचा मृत्यू

By उद्धव गोडसे | Updated: March 28, 2023 19:13 IST

धडधाकट असलेल्या कांबळे यांचा मृत्यू झाल्याने हळहळ आणि आश्चर्य व्यक्त होत आहे

कोल्हापूर : रंगकाम आटोपून घराकडे परत जाताना मधमाशी चावल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या कामगाराचा सोमवारी (दि. २७) मध्यरात्री सीपीआरमध्ये मृत्यू झाला. संतोष राजाराम कांबळे (वय ३५, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. मधमाशी चावल्याची घटना २१ मार्चला शिरोली एमआयडीसी येथे नागाव फाट्याजवळ घडली होती.सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कांबळे हे रंगकाम करण्यासाठी शिरोली एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत जात होते. २१ मार्चला सायंकाळी सहाच्या सुमारास काम आटोपून घरी परत जाताना नागाव फाट्याजवळ त्यांना मधमाशीने डंख मारला. त्यानंतर ते उपचारासाठी स्वत: शिरोली येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी सोमवारी (दि. २७) त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र मध्यरात्रीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फक्त एक मधमाशी चावल्याने धडधाकट असलेल्या कांबळे यांचा मृत्यू झाल्याने हळहळ आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. कांबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर