शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

डोणेवाडीत विकासाची पहाट उगवणार तरी कधी?

By admin | Updated: December 17, 2014 23:11 IST

मूलभूत सुविधांचीही वानवा : होडीनेच करावा लागतो प्रवास; गावात अजूनही एस.टी. पोहोचलेलीच नाही

रवींद्र हिडदुगी- नेसरी -गडहिंग्लज तालुक्यातील डोणेवाडी हे घटप्रभा नदीकाठावर वसलेले छोटेसे गाव. स्वातंत्र्याची ६७ वर्षे उलटूनही डोणेवाडी गाव अनेक सेवा-सुविधांपासून वंचित आहे. गावात अद्याप साधी एस. टी.बसही पोहोचलेली नाही. अंतर्गत रस्त्यांबरोबरच गावाला जोडणारा हडलगे-डोणेवाडी रस्ताही खराब झाला आहे. सुधारित नळपाणी पुरवठा अर्धवट आहे. सौरऊर्जेचे बहुतांश दिवे बंद असून, गावातील विकासकामांचे कित्येकवेळा नारळ फुटले; मात्र विकासकामांचा पत्ताच नाही.नेसरी ते डोणेवाडी हे अंतर केवळ दीड-दोन कि.मी. असताना केवळ शासन आणि आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे घटप्रभा नदीवर साकव अथवा पूल झालेला नाही. आतापर्यंतच्या पिढीने होडीनेच प्रवास करीत व पायवाटा तुडवत दिवस काढले; मात्र आता नव्या पिढीला हे मान्य नाही. त्यांना त्यांचा अधिकार, हक्क व सेवा-सुविधा हव्या आहेत. केवळ दीड-दोन कि.मी.च्या अंतरासाठी त्यांना हडलगे किंवा सांबरे मार्गे वाहनाने नेसरीला पोहोचायचे झाल्यास १० ते १५ कि.मी.चा प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांना उन्हाळा-पावसाळा पायीच प्रवास करून नेसरी गाठावी लागते. ऐन पावसाळ्यात होडी बंद होत असल्याने त्यांना हडलगे मार्गे यावे लागते. शिवाय होडीतून दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो तो वेगळाच. नदीवर घाट बांधला नसल्याने महिलांचीही धुणे धुण्यासाठी गैरसोय होत आहे. या गावाला स्मशानशेडही नाही. सुधारित न.पा.पु. योजना अर्धवट आहे. शाळा-इमारती पक्क्या नाहीत. या व अशा अनेक प्रश्नांची मालिका खंडित कधी होणार, असा शासनासह सर्वच लोकप्रतिनिधी, गावपुढारी व नेत्यांना नागरिकांचा सवाल आहे.नदीच्या अलीकडे व पलीकडे डोणेवाडी व नेसरीतील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यांना शेतजमीन कसण्यासाठी व तालुक्याचे ठिकाण गाठण्यासाठी नावेचाच आधार आहे. भर पावसाळ्यात नाव बंद होत असल्याने सर्वांचेच मोठे हाल होतात. तेव्हा काशिलिंग मंदिराजवळील किनाऱ्याजवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्यास वाहतुकी-बरोबरच पाणी साठल्याने शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही.ग्रामपंचायतीकडून प्राथमिक शाळा ते सांबरे फाटा रस्त्याचे दोन्ही बाजूंकडून झालेले अतिक्रमण हटविण्याबाबत निवेदन मिळाले आहे. गावात एस.टी. पोहोचणे महत्त्वाचे असून, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना सूचना देऊन अतिक्रमण हटविले जाईल.- हनुमंत पाटील, तहसीलदार गडहिंग्लज