शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

चलन टंचाईमुळे रस्त्यावरचा संसार अडकला दुहेरी संकटात !

By admin | Updated: December 23, 2016 00:17 IST

व्यवसायावर विपरीत परिणाम : शेतकऱ्यांसाठी औजारांच्या गरजा पूर्ण करताना पैशांमुळे अडचणी, औजारांची मागणी घटली

विक्रम पाटील --- करंजफेण --रस्त्यावरचं जगणं आमचं जशी तव्यावर करपते भाकरी। टिचभर खळगी भरण्यासाठी करतो मरणापर्यंत चाकरी।। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गॅस सिलिंडर, मायक्रो ओव्हनचा सगळीकडे वापर होत असला तरी भात्यावर जेवण बनवून खाणाऱ्या घिसाडी कुटुंबातील लोकांची परवड अजून संपलेलीदिसत नाही. मिळेल त्या ठिकाणी थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता बस्थान मांडून उघड्यावर संसार मांडलेले दृश्य पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये दृष्टिक्षेपात पडत आहे.शासन निरनिराळ्या योजना राबवून नागरिकांना समान पातळीवर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना दुष्काळ व अपुऱ्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील आर्थिक संकटात सापडलेल्या घिसाडी समाजातील लोकांना गावोगावी भटकंती करून शेतकऱ्यांना आवश्यक असणारी शेती औजारे बनवून देऊन आपल्या पोटाची खळगी भरावी लागत आहेत. गवत कापणी व उसाचा हंगाम लक्षात घेऊन या कुटुंबांचे पाय कोल्हापूर जिल्ह्याकडे वळतात. शेतकऱ्यांना विळा, कुऱ्हाड, कोयता, नांगर इ. औजारे बनवून दिल्यास त्या मोबल्यात त्यांना रोख पैसे अगर धान्याच्या रूपात मोबदला मिळतो. त्यामुळे पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये या समाजातील अनेक कुटुंबे दिसत आहेत. ही कुटुंबे शेती औजारे बनवून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करीत असले तरी, सद्य:स्थितीला चलन तुटवड्याचा त्यांच्या व्यवसायावर विपरुीत परिणाम झाल्याचे दिसत आहे. ही कुटुंबे शेती औजारे बनवून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करीत असले तरी गावाकडील दुष्काळ व चलन टंचाईमुळे त्यांचा व्यवसाय दुहेरी संकटात सापडला आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक शेती औजारांना मागणी कमी होऊ लागल्यामुळे या व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याचे दिसत आहे.या लोकांच्या नियमितच्या भटकंतीमुळे त्यांच्या लहान मुलांना शाळेतील धडे गिरविणे म्हणजे एक स्वप्नच बनून राहते. राहत्या गावी कोणी जवळचा नातेवाईक असेल, तर तेथे राहून ती मुले जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतात. हे शिक्षण म्हणजे त्यांचे ग्रॅज्युएटच म्हणावे लागेल. अन्यथा या समाजातील मुले आपल्या वाडवडिलार्जित पारंपरिक व्यवसायात रमतात.तरी अशा कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. गावाकडे पाऊस कमी होत असल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न भेडसावतो. त्यामुळे मुलांना घेऊनच विंचवाच्या संसारासारखं फिरावं लागतं. त्यामुळे आमची मुले अडाणी राहू लागली आहेत, तरी शासनाने आमच्या मुलांना सरकारी वसतिगृहात शिक्षणासाठी सामील करून घ्यावे व आर्थिक मदत करावी.- अमोल सोळंके , घिसाडी व्यावसायिक