शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चलन टंचाईमुळे रस्त्यावरचा संसार अडकला दुहेरी संकटात !

By admin | Updated: December 23, 2016 00:17 IST

व्यवसायावर विपरीत परिणाम : शेतकऱ्यांसाठी औजारांच्या गरजा पूर्ण करताना पैशांमुळे अडचणी, औजारांची मागणी घटली

विक्रम पाटील --- करंजफेण --रस्त्यावरचं जगणं आमचं जशी तव्यावर करपते भाकरी। टिचभर खळगी भरण्यासाठी करतो मरणापर्यंत चाकरी।। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गॅस सिलिंडर, मायक्रो ओव्हनचा सगळीकडे वापर होत असला तरी भात्यावर जेवण बनवून खाणाऱ्या घिसाडी कुटुंबातील लोकांची परवड अजून संपलेलीदिसत नाही. मिळेल त्या ठिकाणी थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता बस्थान मांडून उघड्यावर संसार मांडलेले दृश्य पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये दृष्टिक्षेपात पडत आहे.शासन निरनिराळ्या योजना राबवून नागरिकांना समान पातळीवर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना दुष्काळ व अपुऱ्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील आर्थिक संकटात सापडलेल्या घिसाडी समाजातील लोकांना गावोगावी भटकंती करून शेतकऱ्यांना आवश्यक असणारी शेती औजारे बनवून देऊन आपल्या पोटाची खळगी भरावी लागत आहेत. गवत कापणी व उसाचा हंगाम लक्षात घेऊन या कुटुंबांचे पाय कोल्हापूर जिल्ह्याकडे वळतात. शेतकऱ्यांना विळा, कुऱ्हाड, कोयता, नांगर इ. औजारे बनवून दिल्यास त्या मोबल्यात त्यांना रोख पैसे अगर धान्याच्या रूपात मोबदला मिळतो. त्यामुळे पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये या समाजातील अनेक कुटुंबे दिसत आहेत. ही कुटुंबे शेती औजारे बनवून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करीत असले तरी, सद्य:स्थितीला चलन तुटवड्याचा त्यांच्या व्यवसायावर विपरुीत परिणाम झाल्याचे दिसत आहे. ही कुटुंबे शेती औजारे बनवून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करीत असले तरी गावाकडील दुष्काळ व चलन टंचाईमुळे त्यांचा व्यवसाय दुहेरी संकटात सापडला आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक शेती औजारांना मागणी कमी होऊ लागल्यामुळे या व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याचे दिसत आहे.या लोकांच्या नियमितच्या भटकंतीमुळे त्यांच्या लहान मुलांना शाळेतील धडे गिरविणे म्हणजे एक स्वप्नच बनून राहते. राहत्या गावी कोणी जवळचा नातेवाईक असेल, तर तेथे राहून ती मुले जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतात. हे शिक्षण म्हणजे त्यांचे ग्रॅज्युएटच म्हणावे लागेल. अन्यथा या समाजातील मुले आपल्या वाडवडिलार्जित पारंपरिक व्यवसायात रमतात.तरी अशा कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. गावाकडे पाऊस कमी होत असल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न भेडसावतो. त्यामुळे मुलांना घेऊनच विंचवाच्या संसारासारखं फिरावं लागतं. त्यामुळे आमची मुले अडाणी राहू लागली आहेत, तरी शासनाने आमच्या मुलांना सरकारी वसतिगृहात शिक्षणासाठी सामील करून घ्यावे व आर्थिक मदत करावी.- अमोल सोळंके , घिसाडी व्यावसायिक