शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

चलन टंचाईमुळे रस्त्यावरचा संसार अडकला दुहेरी संकटात !

By admin | Updated: December 23, 2016 00:17 IST

व्यवसायावर विपरीत परिणाम : शेतकऱ्यांसाठी औजारांच्या गरजा पूर्ण करताना पैशांमुळे अडचणी, औजारांची मागणी घटली

विक्रम पाटील --- करंजफेण --रस्त्यावरचं जगणं आमचं जशी तव्यावर करपते भाकरी। टिचभर खळगी भरण्यासाठी करतो मरणापर्यंत चाकरी।। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गॅस सिलिंडर, मायक्रो ओव्हनचा सगळीकडे वापर होत असला तरी भात्यावर जेवण बनवून खाणाऱ्या घिसाडी कुटुंबातील लोकांची परवड अजून संपलेलीदिसत नाही. मिळेल त्या ठिकाणी थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता बस्थान मांडून उघड्यावर संसार मांडलेले दृश्य पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये दृष्टिक्षेपात पडत आहे.शासन निरनिराळ्या योजना राबवून नागरिकांना समान पातळीवर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना दुष्काळ व अपुऱ्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील आर्थिक संकटात सापडलेल्या घिसाडी समाजातील लोकांना गावोगावी भटकंती करून शेतकऱ्यांना आवश्यक असणारी शेती औजारे बनवून देऊन आपल्या पोटाची खळगी भरावी लागत आहेत. गवत कापणी व उसाचा हंगाम लक्षात घेऊन या कुटुंबांचे पाय कोल्हापूर जिल्ह्याकडे वळतात. शेतकऱ्यांना विळा, कुऱ्हाड, कोयता, नांगर इ. औजारे बनवून दिल्यास त्या मोबल्यात त्यांना रोख पैसे अगर धान्याच्या रूपात मोबदला मिळतो. त्यामुळे पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये या समाजातील अनेक कुटुंबे दिसत आहेत. ही कुटुंबे शेती औजारे बनवून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करीत असले तरी, सद्य:स्थितीला चलन तुटवड्याचा त्यांच्या व्यवसायावर विपरुीत परिणाम झाल्याचे दिसत आहे. ही कुटुंबे शेती औजारे बनवून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करीत असले तरी गावाकडील दुष्काळ व चलन टंचाईमुळे त्यांचा व्यवसाय दुहेरी संकटात सापडला आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक शेती औजारांना मागणी कमी होऊ लागल्यामुळे या व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याचे दिसत आहे.या लोकांच्या नियमितच्या भटकंतीमुळे त्यांच्या लहान मुलांना शाळेतील धडे गिरविणे म्हणजे एक स्वप्नच बनून राहते. राहत्या गावी कोणी जवळचा नातेवाईक असेल, तर तेथे राहून ती मुले जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतात. हे शिक्षण म्हणजे त्यांचे ग्रॅज्युएटच म्हणावे लागेल. अन्यथा या समाजातील मुले आपल्या वाडवडिलार्जित पारंपरिक व्यवसायात रमतात.तरी अशा कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. गावाकडे पाऊस कमी होत असल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न भेडसावतो. त्यामुळे मुलांना घेऊनच विंचवाच्या संसारासारखं फिरावं लागतं. त्यामुळे आमची मुले अडाणी राहू लागली आहेत, तरी शासनाने आमच्या मुलांना सरकारी वसतिगृहात शिक्षणासाठी सामील करून घ्यावे व आर्थिक मदत करावी.- अमोल सोळंके , घिसाडी व्यावसायिक