शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
2
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
3
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
4
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
5
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
6
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
8
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
9
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
10
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
11
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
12
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
13
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
14
Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
15
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
16
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
17
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
18
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
19
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी भाजपमुळे ग्रामीण अर्थकारण ढासळले

By admin | Updated: December 31, 2016 23:13 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : येळावीत विकास कामांचे उद्घाटन, नोटाबंदीचा फायद्यापेक्षा शेतकऱ्यांना तोटाच अधिक

येळावी : सत्तेच्या अति लोभामुळे सध्याचे सरकार यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या सत्तेच्या विकेंद्रीकरणावर घाला घालून संस्थाच नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागावर याचा विपरित परिणाम होऊन संपूर्ण अर्थकारण यामुळे ढासळणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी येळावी (ता. तासगाव) येथे केले. येथे जिल्हा परिषद व आमदार फंड व इतर विविध योजनांतून मंजूर झालेल्या विकास कामांचा प्रारंभ व लोकार्पण सोहळा व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी मंत्री आ. जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, स्मिता पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, बांधकाम सभापती भाऊसाहेब पाटील, पंचायत समितीच्या सभापती मेघा झांबरे, उपसभापती शिवाजी पाटील, हर्षला पाटील, हणमंतराव देसाई, अविनाश पाटील, ताजुद्दीन तांबोळी, विश्वासतात्या पाटील, राजाराम पाटील, सुनील पाटील, दिनकर पाटील, पितांबर पाटील, जगन्नाथ मस्के, शंकर पाटील व अमोल पाटील आदी उपस्थित होते.नाईक-निंबाळकर म्हणाले की, राज्यात सर्व भागात दुष्काळ सारखाच असून, येथील शेतकरी आत्महत्या न करता इतर व्यवसायांतून परिस्थितीवर मात करत आहेत. सुविधांचा अनुशेष गरजेचा नसून, विचारांचा अनुशेष गरजेचा आहे, परंतु विदर्भातील मंडळी घटनेचा आधार घेऊन अखंड महाराष्ट्रावर घाला घालण्याचे काम करीत आहेत. आ. जयंत पाटील म्हणाले की, सध्याचे सरकार सत्तेवर आल्यापासून फक्त घोषणा देत आहे. यांची आता घोषणांची श्वेतपत्रिका काढणार असून, कायम पश्चिम महाराष्ट्राचा दुजाभाव करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आर. आर. पाटील यांनी पाठपुरावा केलेल्या योजनांचे उद्घाटन करण्यास येतात, याची खंत वाटते. वाढती बेरोजगारी, शेतमालांचे ढासळलेले दर,अपूर्ण पाणी योजना, मंदी, गुन्हेगारी अशा सर्व बाबींवरुन लक्ष विचलित करून फक्त भूलभुलय्या दाखवत आहे. नोटाबंदीचा फायद्यापेक्षा तोटाच होत असल्याचेही सांगितले. यावेळी विकास कामांच्या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आमदार सुमनताई पाटील, दिलीप पाटील, डी. के. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विलास माने, बापू माळी, प्रदीप माने, शांताराम गावडे, सर्जेराव सूर्यवंशी, सुरेश माने, नारायण सुर्वे, गणेश पाटील, मौला शिकलगार, राजेंद्र यादव, पा. सा. पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)दिलीपतात्यांची टिप्पणीजिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी माझा वाटा मोठा होता, परंतु त्यानंतर दरवेळी मला डावलण्याचा प्रयत्न होताना दिसतो, याचा प्रत्यय याही ठिकाणी आल्यासारखे दिसते. या मिश्किल टिपणीला सर्वांनीच हसून दाद दिली.