शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पावसामुळे कोल्हापूरातील फळबाजार गारठला

By admin | Updated: July 2, 2017 18:06 IST

‘जी.एस.टी.’मुळे धान्यबाजारात संभ्रमावस्था : भाजीपाल्यात चढउतार कायम

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0२ : गेले चार-पाच दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने फळबाजार एकदम गारठला आहे. मालाची आवक व उठाव कमी झाला असून बाजारपेठेत शांतता आहे. केंद्र सरकारने जी. एस. टी. लागू केला असला तरी अद्याप त्याबाबतची स्पष्टता व परिणामांबाबत धान्यबाजारात संभ्रमावस्था पसरली आहे. त्याचा परिणाम उलाढालीवरही झाला असून भाजीपाला दरात मात्र चढउतार कायम राहिला आहे. जुलै महिन्यात फळांची आवक व उठाव कमीच असतो. त्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने फळबाजार एकदमच गांगरला आहे. डाळिंब वगळता अन्य फळांची आवक मंदावली असून मागणी नसल्याने दरावर परिणाम दिसत नाही. महिनाभर ही मंदी राहणार असून, त्यानंतर सीताफळ व नवीन सफरचंदांची आवक सुरू होणार आहे. सध्या आंध्रप्रदेशाहून मोसंबींची आवक सुरू आहे. पांढऱ्या पेशीसाठी पोषक असणारे ‘किव्ही’, तर पित्तनाशक ‘पल्म’ ही दोन फळे सध्या बाजारात आली आहेत. ‘किव्ही’ घाऊक बाजारात ११०० रुपये प्रतिबॉक्स असून, ‘पल्म’च्या बॉक्सची किंमत ३५० रुपये आहे. धान्यबाजार तसा पावसाळ्यात स्थिर राहतो; पण ‘जी. एस. टी.’मुळे व्यापारी गोंधळात पडले आहेत. आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत साखर दीड रुपया, तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची घसरण झाली आहे. सरकी तेल किरकोळ बाजारात ७० रुपयांवर आहे. आषाढी एकादशी मंगळवारी असल्याने शाबूदाणा व ‘वरी’ची मागणी थोडी वाढली आहे. मागणी वाढली तरी दरात फारसा फरक दिसत नसून किरकोळ बाजारात शाबू व वरी ७० रुपये किलोचा दर राहिला आहे. सर्वत्र पाऊस सुरू असल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. स्थानिक भाजीपालाही कमी झाल्याने काही भाज्यांच्या दरांत वाढ, तर काही भाज्या घसरल्या आहेत. वांगी, टोमॅटो, ओली मिरची, दोडक्याच्या दरांत वाढ झाली आहे. कोबी, ढबू मिरची, गवार, भेंडी, वरण्याच्या दरांत मात्र घसरण झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीच्या पेंढीचे दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात सरासरी १४ रुपये पेंढीचा दर आहे.

तोतापुरीची आवक मंदावली

पावसाळ्यात साधारणत: जूनपासून पुढे दोन महिने तोतापुरी आंब्यांची आवक चांगली असते; पण यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यातच आवक मंदावल्याने बाजारात ‘तोतापुरी’ फारसा दिसत नाही.

कांदा-बटाटा स्थिर

गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा, बटाट्यांची आवक निम्म्याने खाली आली आहे. तरीही दरांत फारसा चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा ९, बटाटा ११, तर लसूण ५० रुपये प्रतिकिलोचा दर आहे.