शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

प्रताप चव्हाणांमुळेच जिल्हा बॅँक सक्षम

By admin | Updated: June 20, 2017 01:14 IST

हसन मुश्रीफ : नाबार्ड तपासणीनंतर अनुकंपा, रोजंदारी मागण्यांबाबत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा बॅँकेचे कर्मचारी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण यांच्या दरम्यान काही मतभेद आहेत. आगामी काळात संघटना प्रतिनिधी व चव्हाण यांची बैठक घेऊन एकमेकांच्या मनातील क्लिमिष काढले जाईल. पण, जिल्हा बॅँकेला अडचणीतून बाहेर काढण्यात प्रताप चव्हाण यांचे योगदान मोठे असून, ते कोणीही नाकारू शकत नाही, अशा शब्दांत बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी निर्वाळा दिला. अनुकंपाची भरती व रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाबार्ड तपासणीनंतर निश्चित मार्गी लावला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तीन-चार बैठका झाल्या. यामध्ये बॅँकेची वस्तुस्थिती सांगितली. तरीही मोर्चा काढल्याने आपण व्यथित झालो. रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार २ टक्केपेक्षा कमी व्यवस्थापन खर्च ठेवणे व मार्च २०१७ अखेर ९ टक्के सीआरएआर राखणे बंधनकारक होते. अधिकारी व संचालकांच्या सहकार्याने ७४ कोटी संचित तोटा कमी होऊन बॅँक नफ्यात आली. नाबार्डची तपासणी जुलै-आॅगस्टमध्ये आहे, बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या ताळेबंदावर नाबार्डने शिक्कामोर्तब केला. अनुकंपा व रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल. प्रताप चव्हाण यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी कर्मचाऱ्यांची असली तरी मोर्चा काढून एखाद्याला बदनाम करणे योग्य नाही. यामुळे बॅँकेचे मोठे नुकसान झाले असून, येथून पुढे असा प्रकार टाळला पाहिजे, यासाठी संघटना व चव्हाण यांना सोबत घेऊन एकमेकांच्या मनातील क्लिमिष काढले जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. त्यांना राज्य बॅँकेतून हाकललेले नाही, अशा प्रकारची बदनामी करणे, योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.संचालक मंडळ मॉरिशस दौऱ्यावरजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक संचित तोट्यातून बाहेर येऊन नफ्यात आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ संचालक मंडळ परदेश दौऱ्यावर निघाले आहे. ४ जुलैला मॉरिशस व दुबईसाठी रवाना होणार आहे. अपुरे तारण व चुकीच्या कर्जवाटपामुळे बँकेवर १३ नोव्हेंबर २००९ ला प्रशासकीय मंडळ आले. सहा वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर मे २०१५ मध्ये संचालक मंडळाच्या ताब्यात पुन्हा कारभार आला. संचालक मंडळ कार्यरत झाले तरी बॅँकेचा पावणेदोनशे कोटीचा संचित तोटा होता. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅँकेच्या निर्देशानुसार मार्च २०१६ पर्यंत ७ टक्के, तर मार्च २०१७ पर्यंत ९ टक्के सीआरएआर राखणे बंधनकारक होते. संचालक मंडळाने मार्च २०१७ अखेर १०.५० टक्के सीआरएआर राखण्यात यश मिळाले. थकीत बड्या कर्जदारांच्या दारात जाऊन ढोल-ताशांच्या गजरात वसुली मोहीम राबविली. त्यामुळेच बॅँकेला १२ कोटींचा निव्वळ नफा होऊ शकला. यासाठी संचालक मंडळ परदेश सहलीवर जात आहेत. सहलीवर प्रतापसिंह चव्हाण जाणार नसल्याचे समजते. व्यवस्थापक ठरविण्याचा अधिकार संचालकांचाबॅँकेचा व्यवस्थापक कोण असावा, हे ठरविण्याचा अधिकार संचालकांचा आहे. युनियन हे ठरवू शकत नाही. बॅँकेचे हित सर्वांपेक्षा मोठे असते, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी युनियनच्या ‘चव्हाण हटाव’ मागणीला उत्तर दिले. बहुतांशी कारखान्यांना कर्जपुरवठादोन साखर कारखाने वगळता जिल्ह्यातील इतर कारखान्यांना जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. त्यामुळे युनियनने केलेला आरोप चुकीचा असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.