शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

राजकारणामुळेच सहकार डबघाईला

By admin | Updated: February 23, 2015 00:15 IST

पाटील यांची टीका : सहकारी चळवळ व ग्रामीण विकास राष्ट्रीय कार्यशाळा

कोल्हापूर : सहकारी क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव होऊन संस्थांमध्ये आपल्या जवळच्यांची सोय लावण्याच्या वृत्तीमुळे ‘कामापेक्षा माणसंच जास्त’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सहकार डबघाईला आला आहे, अशी टीका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी केली.न्यू कॉलेजतर्फे सहकारी चळवळ व ग्रामीण विकास राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे होते.जे. एफ. पाटील म्हणाले, सहकारक्षेत्र १९८० पर्यंत सुरळीत होते. त्यानंतरच घोटाळ्यांना सुरुवात झाली. या क्षेत्रातील बदनामी ही अर्थकारणामुळे नाही तर ते चालविणाऱ्या लोकांचे बेजबाबदार व्यवस्थापन व भ्रष्टाचारामुळे झाली. अशा लोकांना निर्लज्ज, नालायक अशी कुठलीही उपमा दिली तर ती कमीच आहे. अशा वृत्तीमुळेच सर्वसामान्यांचा सहकारावरील विश्वास उडाला आहे. साखर कारखाने आतबट्ट्यात येण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिथली गेस्ट हाऊस. या ठिकाणी संचालकांकडून जेवणावळींवर होणारा वारेमाप खर्च अगणिक असतो तसेच साखर धंदा अडचणीत येण्याचे दुसरे कारण म्हणजे खुली अर्थव्यवस्था आहे. सध्या सहकारी कारखाने अडचणीत व खासगी फायद्यात अशी स्थिती आहे. हे कशामुळे झाले याचाही विचार होणे गरजेचे आहे. सहकाराचा ऱ्हास टाळण्यासाठी आपल्या उत्पादनाची स्पर्धात्मकता वाढली पाहिजे. परदेशातील अत्याधुनिक शेतीपुढे आपण कुठे ? असा प्रश्न निर्माण होतो. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी विचार करायला हवा. सहकार म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाचे माध्यम नव्हे, ती जबाबदारी सरकारची आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरेंचा खून म्हणजे चारित्र्य, संस्कार व विचारांचा खून झाला आहे. त्याचा कडवट शब्दांत निषेध झाला पाहिजे.डॉ. एन. व्ही. नलवडे म्हणाले, कोणतीही व्यवस्था वाईट नसते ती राबविणारी प्रवृत्ती वाईट असते. शेतकरी सहकारी संघाच्या हिरव्या रंगाचा वापर करून अनेकांनी आपली दुकाने चालविली. ती चांगली चालली परंतु सर्वसामान्यांना विश्वासार्ह वाटणारा हा संघ मात्र बंद पडला. आता सहकारातून स्वाहाकार होत असल्याचे चित्र दिसत आहे. साखर कारखान्यांमधील पैसे राजकारणात वापरण्याच्या पद्धतीमुळे कारखाने मोडकळीस येत आहेत. दिवसभरातील विविध सत्रांत प्राचार्य डॉ. पी. बी. कुलकर्णी (इस्लामपूर), मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय (सांगली)चे प्रा. सुभाष दगडे यांचे व्याख्यान झाले. समारोप प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. बी. ककडे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. एस. के. कोरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कार्यशाळा संयोजक डॉ. डी. जी चौगुले, उपप्राचार्य डॉ. एस. ए. बोजगार, प्रा. ए. के. सकटे, डॉ. ए. जी. सूर्यवंशी, डॉ. ए. जी. सूर्यवंशी, प्रा. डी. एस. माश्रणकर, प्रा. डॉ. डी. एम. कांबळे, प्रा. टी. के. सरगर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)