शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पोषक वातावरणामुळे आजऱ्यातील काजूबागा मोहोरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:23 IST

आजरा तालुक्यात गेल्यावर्षी ढगाळ वातावरण व धुक्यामुळे काजूचा मोहोर गळाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या ...

आजरा तालुक्यात गेल्यावर्षी ढगाळ वातावरण व धुक्यामुळे काजूचा मोहोर गळाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थचक्रावर झाला होता. त्यातच कोरोनामुळे लाॅकडाऊनमुळे रोजगाराअभावी कर्जबाजारी होण्याची वेळ आली, तर काजूबियांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना टांझानिया व बेनीनच्या काजूवर अवलंबून राहावे लागले. आजऱ्याच्या काजूगराला महाराष्ट्रासह गोवा, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेशात मागणी आहे. उत्पादित होणारा माल मोठ्या प्रमाणात बेकरी व्यवसायासाठी वापरला जातो.

गेल्या आठ ते दहा वर्षांत काजूचा वाढलेला दर, जंगली प्राण्यांकडून होणारे ऊस, भात, नाचणा पिकांचे नुकसान यामुळे काजूचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. चालू वर्षी काजूच्या उत्पादन वाढीसाठी झालेला चांगला पाऊस, उष्ण व दमट हवामान, ढगाळ व धुके नाही. त्यामुळे काजूबागा मोहराने फुलून गेल्या आहेत.

तीन वर्षांपासून काजू बी चा दर १०० रुपयांच्या पुढे गेला आहे. अन्य पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना हा दर परवडणारा आहे. तर काजूगराला गेल्यावर्षी ६०० ते १००० रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे.

काजूप्रक्रिया उद्योगांची संख्याही वाढली

दहा वर्षांपूर्वी १० ते १५ काजूप्रक्रिया उद्योग तालुक्यात होते. काजूगराला मिळणारा दर व वर्षभर मिळणारा रोजगार यामुळे सध्या १२० ते १३० काजूप्रक्रिया उद्योग तालुक्यात सुरू आहेत. तर १० ते १२ हजार महिलांना रोजगार मिळाला आहे.

काजूच्या ४ हजार मे. टन उत्पादनाची शक्यता

खराब हवामानामुळे गेल्यावर्षी १६०० ते १८०० मे. टन काजूबिया तालुक्यातून मिळाल्या होत्या. चालू वर्षी पोषक वातावरणामुळे त्यामध्ये वाढ होऊन ४००० ते ४२०० मे. टन उत्पादन होईल, अशी माहिती सेवानिवृत्त कृषी अधिकारी मनोहर पाटील यांनी दिली.

फोटो कॅप्शन - आजरा तालुक्यात मोहोराने बहरलेली काजूची झाडे.

१३ आजरा काजूबाग