शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

पोषक वातावरणामुळे आजऱ्यातील काजूबागा मोहोरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:23 IST

आजरा तालुक्यात गेल्यावर्षी ढगाळ वातावरण व धुक्यामुळे काजूचा मोहोर गळाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या ...

आजरा तालुक्यात गेल्यावर्षी ढगाळ वातावरण व धुक्यामुळे काजूचा मोहोर गळाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थचक्रावर झाला होता. त्यातच कोरोनामुळे लाॅकडाऊनमुळे रोजगाराअभावी कर्जबाजारी होण्याची वेळ आली, तर काजूबियांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना टांझानिया व बेनीनच्या काजूवर अवलंबून राहावे लागले. आजऱ्याच्या काजूगराला महाराष्ट्रासह गोवा, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेशात मागणी आहे. उत्पादित होणारा माल मोठ्या प्रमाणात बेकरी व्यवसायासाठी वापरला जातो.

गेल्या आठ ते दहा वर्षांत काजूचा वाढलेला दर, जंगली प्राण्यांकडून होणारे ऊस, भात, नाचणा पिकांचे नुकसान यामुळे काजूचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. चालू वर्षी काजूच्या उत्पादन वाढीसाठी झालेला चांगला पाऊस, उष्ण व दमट हवामान, ढगाळ व धुके नाही. त्यामुळे काजूबागा मोहराने फुलून गेल्या आहेत.

तीन वर्षांपासून काजू बी चा दर १०० रुपयांच्या पुढे गेला आहे. अन्य पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना हा दर परवडणारा आहे. तर काजूगराला गेल्यावर्षी ६०० ते १००० रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे.

काजूप्रक्रिया उद्योगांची संख्याही वाढली

दहा वर्षांपूर्वी १० ते १५ काजूप्रक्रिया उद्योग तालुक्यात होते. काजूगराला मिळणारा दर व वर्षभर मिळणारा रोजगार यामुळे सध्या १२० ते १३० काजूप्रक्रिया उद्योग तालुक्यात सुरू आहेत. तर १० ते १२ हजार महिलांना रोजगार मिळाला आहे.

काजूच्या ४ हजार मे. टन उत्पादनाची शक्यता

खराब हवामानामुळे गेल्यावर्षी १६०० ते १८०० मे. टन काजूबिया तालुक्यातून मिळाल्या होत्या. चालू वर्षी पोषक वातावरणामुळे त्यामध्ये वाढ होऊन ४००० ते ४२०० मे. टन उत्पादन होईल, अशी माहिती सेवानिवृत्त कृषी अधिकारी मनोहर पाटील यांनी दिली.

फोटो कॅप्शन - आजरा तालुक्यात मोहोराने बहरलेली काजूची झाडे.

१३ आजरा काजूबाग