शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘शेती’साठी दिल्लीला धडक गरजेची, आर्थिक धोरणामुळे शेती उद्ध्वस्त- पी. साईनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:52 IST

कोल्हापूर : गेल्या २५ वर्षांमधील आर्थिक धोरणांमुळे शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. शेती व्यवस्थेवरील सध्याचे अरिष्ट टाळण्यासाठी आता देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीला धडक दे

ठळक मुद्देसंतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टचे व्याख्यान

कोल्हापूर : गेल्या २५ वर्षांमधील आर्थिक धोरणांमुळे शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. शेती व्यवस्थेवरील सध्याचे अरिष्ट टाळण्यासाठी आता देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीला धडक देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी बुधवारी येथे केले.

येथील संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवनातील मिनी हॉलमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. ‘भारतीय शेती व्यवस्थेचे अरिष्ट’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ म्हणाले, शेतीसह असमानता हे देशासमोरील मोठे संकट आहे. हे संकट गेल्या २५ वर्षांत सरकारने राबविलेल्या आर्थिक धोरणांनी निर्माण झाले आहे.

त्यामुळे शेतकरी, मजुरांचे जीवनासह शेतीव्यवस्था उद्ध्वस्त झाली. मात्र, कार्पोरेट क्षेत्राची भरभराट झाली असून, ती वर्षागणिक वाढत आहे. अशा स्थितीत शेती व्यवस्थेला उभारी देण्यासाठी आता देशातील राज्या-राज्यांमधील शेतकºयांनी संघटितपणे दिल्लीला धडक देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी संसदे सभोवती ठिय्या मारून वीस दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे.

त्यामध्ये पहिले तीन दिवस शेती व्यवस्थेवरील संकट आणि वास्तवाबाबत शेतकºयांनी बोलावे. यानंतर स्वामीनाथन आयोगातील शिफारशी, पाणी संकट, महिला शेतकºयांचे हक्क, कर्जमाफी यावर चर्चा होऊन धोरण निश्चित होण्याची गरज आहे.

या कार्यक्रमात बँक एम्प्लॉईज युनियनतर्फे ‘स्वामीनाथन अहवाल शिफारशी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. शंभरीमध्ये पदार्पण केल्याबद्दल गणपत पाटील यांचा सत्कार झाला.कार्यक्रमास माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील, प्रकाश जाधव, पापालाल नायकवडी, आनंदराव पाटील, दिलीप लोखंडे, सुवर्णा तळेकर, डॉ. मेघा पानसरे, शिवाजीराव परूळेकर, आदी उपस्थित होते.पी. साईनाथ म्हणाले,हमीभाव देणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या आश्वासनाचा केंद्र सरकारला विसर.सरकारी शाळा बंद झाल्यास शेतकरी, कष्टकºयांच्या मुलांचे शिक्षण संपणार.किती शेतकºयांनी आत्महत्या केल्या, किती उत्पन्न घटले यापेक्षा माणुसकी किती घसरली, याचे मोजमाप व्हावे.गेल्या दोन वर्षांत नॅशनल क्राईम रेकॉर्डने शेतकरी आत्महत्येची आकडेवारीच प्रसिद्ध केली नाही.शेतकºयांसाठीची ‘रिलिफ पॅकेज’ म्हणजे भंपकपणा आहे.कोल्हापुरात बुधवारी संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी अजित पाटील, पापालाल नायकवडी, आनंदराव पाटील, दिलीप लोखंडे उपस्थित होते.