शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

स्थानिक पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या प्रश्नांना मिळणार गती

By admin | Updated: December 27, 2014 00:48 IST

चंद्रकांत पाटील चौथे : चांगल्या समन्वयाचा फायदा शक्य, दादांची खरी कसोटी लागणार टोलच्या प्रश्नातच

विश्वास पाटील -कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची शासनाने आज, शुक्रवारी रीतसर घोषणा केली. तेच पालकमंत्री होणार असे वृत्त विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्याच दिवशी ‘लोकमत’ने दिले होते. जिल्ह्णातीलच मंत्री पालकमंत्री म्हणून लाभल्याने कोल्हापूरच्या प्रश्नांची तड लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे; परंतु दादांची खरी कसोटी टोलच्या प्रश्नात लागणार आहे. मंत्री,पालकमंत्री व जिल्ह्णाचे नेते म्हणून त्यांची राजकीय कारकिर्दही या प्रश्नाशी आता जोडली गेली आहे.स्थानिक मंत्री हाच पालकमंत्री असेल तर तो भेदभाव करतो; म्हणून यापूर्वीच्या काळात पंधरा वर्षे पालकमंत्रिपद स्थानिक मंत्र्यांना दिले जात नव्हते. त्यात दोन्ही काँग्रेसमध्ये कोटा ठरल्यानुसार कोणत्या जिल्ह्णाचे पालकमंत्रिपद कोणत्या पक्षाकडे अशीही वाटणी झाली होती. कोल्हापूरचे पालकमंत्रिपद काँग्रेसकडे होते. त्यामुळे सुमारे दहा-अकरा वर्षे हर्षवर्धन पाटील यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यांची सुरुवातीची काही वर्षे बरी होती; परंतु नंतर फक्त जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीपुरतेच ते दौऱ्यावर येत व त्यावेळीही अनेकदा जुनीच माहिती पुन:पुन्हा देण्याचेच काम त्यांनी केले. जिल्ह्णाच्या राजकारणात सुरुवातीला सदाशिवराव मंडलिक यांच्याशी त्यांचे चांगले सूत जुळले; परंतु हमीदवाडा कारखान्याच्या वाढीव सभासदांना मंजुरी देण्याच्या प्रकरणात त्यांनी मदत केली नसल्याचा मंडलिक यांना राग होता व त्यातून त्यांनी ‘पालकमंत्री हे पर्यटनमंत्री’ असल्याची टीका करून राळ उडवून दिली. त्यानंतर माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनीही जोरदार आरोप केले. मंडलिक विरोध करतात म्हटल्यावर तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांशी जुळवून घेतले. ते इतके जुळवून घेतले की पालकमंत्र्यांवर कुणीही आरोप केले तर त्याचे उत्तर स्वत: मुश्रीफच देत होते. पालकमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी लक्ष घातले आणि प्रश्न सुटला, असे अभावानेही घडले नाही. त्यामुळे प्रश्नांची जंत्री वाढली आहे. त्याहून जास्त लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत व त्यांना आता नव्या पालकमंत्र्यांना सामोरे जायचे आहे.पालकमंत्रिपद हे जिल्ह्णाच्या राजकारणात व प्रशासनातही महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे. आता तर चंद्रकांत पाटील हेच ‘वन मॅन शो...’ अशा भूमिकेत असतील; कारण कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री अशी दुहेरी ताकद त्यांच्याकडे आहे. प्रशासनात पालकमंत्र्यांचा शब्द हा अंतिम असतो. जिल्हा नियोजन मंडळामध्ये निधीवाटपामध्येही त्यांना अधिक अधिकार असतात. किमान पंधरा अशासकीय सदस्य नियुक्त करताना त्यांची शिफारस हीच अंतिम असते. त्यामुळे भाजपच्या सत्तेपासून वंचित असलेल्या कार्यकर्त्यांना आता ही संधी मिळू शकते. शिवसेनेचे सहा आमदार आहेत. जिल्हा परिषदेत काँग्रेसची, तर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. नगरपालिकांसह इतर संस्थांही दोन्ही काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे अनेकवेळा पालकमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.चळवळीतून पुढे आल्यामुळे कोल्हापुरातील सर्व प्रश्न माहिती आहेत. त्यामध्ये लक्ष घालून आगामी काळात ते सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरसाठी आणखी खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. निश्चित त्या दृष्टीने प्रयत्न करू. जिल्हा नियोजन समितीसंदर्भात सोमवारी (दि. २९) जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. - चंद्रकांतदादा पाटील, सहकार व पालकमंत्रीकोल्हापूरचे मूळचे पालकमंत्रीदिवंगत नेते रत्नाप्पाण्णा कुंभार ४दिवंगत नेते श्रीपतराव बोंद्रे माजी खासदार सदाशिवराव मंडलिकजिल्हा नियोजन मंडळाचा निधीसर्वसाधारण योजना २८० कोटीविशेष घटक योजना १६५ कोटीआदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लोकसंख्येच्या विकासासाठी :१ कोटी ७५ लाख ४सदस्यसंख्या : ५०