शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कडाक्याच्या उन्हामुळे शीतपेये, बर्फाला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 15:19 IST

कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडू लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिकांचा ओढा शीतपेये व बर्फखरेदीकडे वाढला आहे. विशेषत: शीतपेये थंड राहण्यासाठी व सरबतांकरिता सुमारे दहा टन बर्फ, तर सुमारे ५७ कोटी लिटर शीतपेये जिल्ह्यात खपत आहेत.

ठळक मुद्देकडाक्याच्या उन्हामुळे शीतपेये, बर्फाला मागणी वाढलीपारा ३९ अंशांवर; आज पारा ४२ अंशांवर जाण्याची शक्यता

कोल्हापूर : कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडू लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिकांचा ओढा शीतपेये व बर्फखरेदीकडे वाढला आहे. विशेषत: शीतपेये थंड राहण्यासाठी व सरबतांकरिता सुमारे दहा टन बर्फ, तर सुमारे ५७ कोटी लिटर शीतपेये जिल्ह्यात खपत आहेत.नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, अन्न व औषध प्रशासनाच्या मानांकनानुसार मिनरल वॉटरमधील बर्फ तयार करण्याच्या सूचना उत्पादकांना गेल्या वर्षीपासून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरातील बर्फ उत्पादकांकडून मिनरल वॉटरमधील बर्फ तयार केला जात आहे.

वाढत्या उन्हाचा तडाखा सुसह्य करण्यासाठी व तहान भागविण्यासाठी नागरिक कोल्हापुरात थंडगार उसाच्या रसाचा आधार घेत आहेत. (छाया : दीपक जाधव)

या खाण्यायोग्य बर्फाचा दर ३० किलोेंच्या लादीला ५५० रुपये आहे. कोल्हापूरकरांकरिता दिवसाला सरासरी दीड टन बर्फ नियमित वापराकरिता लागत आहे. जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागतो तशी बर्फाची मागणी वाढते. त्यामुळे दिवसाकाठी जिल्ह्यात सुमारे १० टन बर्फ लागत आहे. विशेषत: गारेगार, मेवाड आइस्क्रीम, सोलकढी, ताक, सरबत विक्रेते, लग्नसमारंभ, विविध कार्यक्रमांच्या जेवणावळीकरिता बर्फाची गरज लागत आहे. त्यामुळे बर्फाच्या खपात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला तशी बर्फालाही मागणी वाढू लागली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)वाढत्या उन्हाच्या तडाख्यात तहान भागविण्यासाठी नागरिकांकडून विविध कंपन्यांची शीतपेये रिचविली जात आहेत. त्यामुळे विविध कंपन्यांच्या १२५० मि.लि., ६०० मि.लि., २५० मि.लि. बाटल्यांना मागणी वाढली आहे. विशेषत: कृत्रिम पेयांपेक्षा आंबा, लिंबूवर्गीय शीतपेयांना अधिक मागणी आहे.

जसा उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे तशी या कंपन्यांच्या शीतपेयांचीही मागणी वाढू लागली आहे. जिल्ह्यात अशा कंपन्यांची सुमारे ५७ कोटी लिटर शीतपेये खपत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून उन्हाळा सुसह्य करण्यासाठी तयार शीतपेयांसह सरबत, कोकम, ताक, उसाचा रस, कलिंगडे, आदींची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही शीतपेये पिण्यासाठी जागोजागी दुपारी गर्दी होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने पाराही चढू लागला आहे. गुरुवारी ३९ अंश सेल्सिअस, तर आज, शुक्रवारी तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. गुरुवारी रात्री किमान तपमान २९ अंश सेल्सिअस होते; तर गुरुवारी दिवसभर हवेत उष्मा अधिक असल्याने शहरवासीयांना जणू उष्णतेच्या लाटेचा अनुभव आला.

उन्हाचा तडाखा वाढेल तशी बर्फाला मागणी वाढते. त्यामुळे दिवसाकाठी दीड टन बर्फ शहरात लागतो. उन्हामुळे मागणी पाच टनांच्या पुढे जात आहे. विशेषत: मिनरल वॉटरमधील बर्फाला मागणी अधिक आहे.- धवल भोसले-पाटील, बर्फ उत्पादक

उन्हाचा तडाखा वाढेल तसे विविध कंपन्यांच्या शीतपेयांची मागणी वाढते. विशेषत: अंबा, लिंबूवर्गीय शीतपेयांना अधिक मागणी आहे. जिल्हाभरात सुमारे कोट्यवधी लिटर शीतपेये विकली जातात.- जमीर शेख, विक्री प्रतिनिधी, घाऊक शीतपेय डीलर 

 

 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर