शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

यंदा ‘एफआरपी’ देतानाच होणार दमछाक

By admin | Updated: September 30, 2014 01:05 IST

धुराडी डिसेंबरलाच पेटणार : निवडणुका, दिवाळीचा परिणाम; ऊसदर नियामक मंडळ हवेतच

कोल्हापूर : राज्य सरकारने यंदाचा साखर हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली असली तरी किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी कारखान्यांची धुराडी पेटण्यास १ डिसेंबरच उजाडणार आहे. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूरची ऊस परिषद यंदा १ नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतरच पहिल्या उचलीचा तिढा सुटणार असल्याने हंगाम गतवर्षी प्रमाणेच लांबणार आहे. आताच बाजारातील साखरेचा दर २७५० रुपयांपर्यंत खाली आल्याने यंदा किमान व वाजवी किंमत (एफआरपी) देतानाही कारखान्यांची दमछाक होणार आहे. राज्यातील साखर हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे; परंतु त्याचदिवशी राज्यात विधानसभेचे मतदान आहे. १९ ला मतमोजणी व त्यानंतर लगेच २३ पासून दिवाळी आहे. त्यामुळे दिवाळी झाल्याशिवाय ऊसतोड मजूरही येणार नाहीत. खासदार राजू शेट्टी यांनी १ नोव्हेंबरला जयसिंगपूरला ऊस परिषद घेऊन पहिल्या उचलीची मागणी करण्याचे जाहीर केले आहे. ऊसदर प्रश्नात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने ऊसदर नियामक मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली; परंतु त्याचा आदेशच निघाला नसल्याने नवे सरकार आल्यावर नवे मंडळ नेमणार का? याबद्दल गोंधळ आहे. तसेच २७५० रुपये आजचा साखरेचा दर असताना राज्यासाठी सरासरी एफआरपी २२०० रुपये बसू शकेल. पश्चिम महाराष्ट्रासाठी ही एफआरपी २६०० रुपयांपर्यंत जाऊ शकते, कारण उतारा जास्त असतो. बाजारातील साखर दराच्या ८५ टक्के रक्कम राज्य बँक उपलब्ध करून देते. त्यातून कारखान्याचा व्यवस्थापन खर्च व बँकेच्या कर्जाचे हप्ते याचा विचार केल्यास कसेबसे १७०० ते १८०० रुपयेच कारखान्यांच्या हातात राहतील, अशी स्थिती आहे. गतवर्षीही अशीच परिस्थिती होती; परंतु माजी कृषिमंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकारामुळे केंद्र शासनाने अबकारी कर्ज उपलब्ध करून दिल्याने किमान एफआरपीएवढी रक्कम देणे कारखान्यांना शक्य झाले.