शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ‘एफआरपी’ देतानाच होणार दमछाक

By admin | Updated: September 30, 2014 01:05 IST

धुराडी डिसेंबरलाच पेटणार : निवडणुका, दिवाळीचा परिणाम; ऊसदर नियामक मंडळ हवेतच

कोल्हापूर : राज्य सरकारने यंदाचा साखर हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली असली तरी किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी कारखान्यांची धुराडी पेटण्यास १ डिसेंबरच उजाडणार आहे. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूरची ऊस परिषद यंदा १ नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतरच पहिल्या उचलीचा तिढा सुटणार असल्याने हंगाम गतवर्षी प्रमाणेच लांबणार आहे. आताच बाजारातील साखरेचा दर २७५० रुपयांपर्यंत खाली आल्याने यंदा किमान व वाजवी किंमत (एफआरपी) देतानाही कारखान्यांची दमछाक होणार आहे. राज्यातील साखर हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे; परंतु त्याचदिवशी राज्यात विधानसभेचे मतदान आहे. १९ ला मतमोजणी व त्यानंतर लगेच २३ पासून दिवाळी आहे. त्यामुळे दिवाळी झाल्याशिवाय ऊसतोड मजूरही येणार नाहीत. खासदार राजू शेट्टी यांनी १ नोव्हेंबरला जयसिंगपूरला ऊस परिषद घेऊन पहिल्या उचलीची मागणी करण्याचे जाहीर केले आहे. ऊसदर प्रश्नात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने ऊसदर नियामक मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली; परंतु त्याचा आदेशच निघाला नसल्याने नवे सरकार आल्यावर नवे मंडळ नेमणार का? याबद्दल गोंधळ आहे. तसेच २७५० रुपये आजचा साखरेचा दर असताना राज्यासाठी सरासरी एफआरपी २२०० रुपये बसू शकेल. पश्चिम महाराष्ट्रासाठी ही एफआरपी २६०० रुपयांपर्यंत जाऊ शकते, कारण उतारा जास्त असतो. बाजारातील साखर दराच्या ८५ टक्के रक्कम राज्य बँक उपलब्ध करून देते. त्यातून कारखान्याचा व्यवस्थापन खर्च व बँकेच्या कर्जाचे हप्ते याचा विचार केल्यास कसेबसे १७०० ते १८०० रुपयेच कारखान्यांच्या हातात राहतील, अशी स्थिती आहे. गतवर्षीही अशीच परिस्थिती होती; परंतु माजी कृषिमंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकारामुळे केंद्र शासनाने अबकारी कर्ज उपलब्ध करून दिल्याने किमान एफआरपीएवढी रक्कम देणे कारखान्यांना शक्य झाले.