शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

चारा टंचाईमुळे उभ्या पिकांवर विळा

By admin | Updated: April 27, 2016 00:58 IST

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत : शिरोळ तालुक्यात ओल्या चाऱ्याचा दुष्काळ

संतोष बामणे -- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्यातील ऊस गळीत हंगाम संपल्यामुळे ओल्या वैरणीचे संकट ओढावले आहे़ शेतातील वैरणीसाठी लागण केलेली पिके पाणी नसल्यामुळे संकटात आली आहेत़ त्यामुळे शेतकरी उभ्या पिकांवर विळा लावून आपली जनावरे जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ सध्या बाजारात ओल्या चाऱ्याचा दर कडाडलेला असून, वाळलेल्या वैरणीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे़ तर कडाडले पशुखाद्य त्यामुळे शिरोळ तालुक्यातील हजारो शेतकरी मेटाकुटीला आहेत़ शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा या चार नदीकाठांवरील शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गवत, हत्ती गवत व वैरणीची लागवड केली आहे़ मात्र, धरण क्षेत्रातील पाणी कमी असल्यामुळे सध्या उपसाबंदी लागू झाली आहे़ त्यामुळे माणसाच्या पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्याही वैरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ सध्या शेतीच्या मशागतीला मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तणनाशकांचा वापर करीत असल्यामुळे शेतामध्ये येणारे तण अनेक प्रजातीचे गवत कायमच नष्ट होत चालले आहे़ त्यामुळे जनावरांना सकस चाऱ्यापासून वंचित राहावे लागत आहे़ तर दुष्काळामुळे चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे पशुपालनही धोक्यात आले आहे़ शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय आघाडीवर आहे़ मात्र, हा दूध व्यवसाय दुष्काळामुळे संकटात सापडला आहे़ शिरोळ तालुक्यातील निमशिरगांव, तमदलगे, जैनापूर, चिपरी, कोंडिग्रे, आदी गावांत पाणी संकट ओढावल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आपली जनावरे चाऱ्याअभावी विकली आहेत़ सध्या आहेत ती जनावरे जगविण्यासाठी वाळलेले गवत, कडब्याची आवक पंढरपूर भागातून करीत आहेत़ मात्र, याचाही दर न परवडणारा आहे़, अशा विविध संकटांमुळे दूध उत्पादकांना फटका बसत आहे़