शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

उत्खननामुळे शेतकरी, वीट व्यावसायिकांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:06 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड माती उत्खनन प्रकरणामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या सात-बारापत्रकी साडेबारा कोटींचा बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतात असलेल्या वीट भट्ट्यांवरील एकही वीट उचलू देऊ नका, असा आदेश शेतकºयांना प्रांताधिकारी यांनी दिला आहे.त्यामुळे आपल्या सात-बारापत्रकी चढलेला बोजा कमी करण्यासाठी शेतकºयांची घाई सुरू झाली आहे, ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड माती उत्खनन प्रकरणामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या सात-बारापत्रकी साडेबारा कोटींचा बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतात असलेल्या वीट भट्ट्यांवरील एकही वीट उचलू देऊ नका, असा आदेश शेतकºयांना प्रांताधिकारी यांनी दिला आहे.त्यामुळे आपल्या सात-बारापत्रकी चढलेला बोजा कमी करण्यासाठी शेतकºयांची घाई सुरू झाली आहे, तर दुसरीकडे वीट भट्टीवरील वीट उचलू न देण्याच्या आदेशाने वीट व्यावसायिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.माती उत्खननप्रश्नी उदगाव-चिंचवाडच्या ७६ शेतकºयांच्या सात-बारावर सुमारे साडेबारा कोटींचा दंड चढविण्यात आला आहे, तर गेल्या तीन महिन्यांपासून उदगाव-चिंचवाडमधील असलेल्या वीट भट्ट्यांवरून विटाची विक्री होत होती, तर बुधवारी शिरोळ येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी एकही वीट व्यावसायिकांना उचलू देऊ नका अशा आदेशाने खळबळ उडाली आहे.तर शुक्रवारी उदगाव-चिंचवाडच्या सर्व शेतकºयांनी एकत्रित येऊन सर्व वीटभट्ट्यांच्या समोरील रस्त्यात जेसीबीच्या साहाय्याने चर काढून रस्ता बंद केला आहे. उदगाव व चिंचवाड परिसरात सुमारे दीडशेहून अधिक वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्ट्यावर कोट्यवधी रुपयांचा विटाचा मुद्देमाल आहे. सर्व शेतकºयांनी एकत्रित येऊन वीट वाहतूक बंद केल्याने वीट व्यावसायिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. शेतकरी आपली बाजू सोडविण्यासाठी आता कोणत्याही स्तरावर जाण्याच्या तयारीत आहेत. माती उत्खनन व वीटभट्ट्यांमुळे निसर्गरम्य वातावरण पूर्णत: गायब झाले आहे. या कारवाईचे निसर्गप्रेमींकडून स्वागत होत आहे. उदगाव-चिंचवाड माती उत्खनन करण्यासाठी रितसर रॉयल्टी भरलेल्या शेतकºयांनाही पाच ते सहापट दंड झाला आहे. हा दंड कमी करण्यासाठी तहसीलदारांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. तसेच रितसर आदेशानुसार कारवाई केली आहे. त्यामुळे रॉयल्टी भरलेल्या शेतकºयांचा कळीचा मुद्दा बनला असून आता जिल्हाधिकाºयांच्या निर्णयावरच पुढील निर्णय अवलंबून आहे.