शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू, भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आयुक्तांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:54 IST

कोल्हापूर शहर आणि उपनगरात डेंग्यू आणि भटक्या कुत्र्यांंच्या त्रासामुळे कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर विशेष पथक नेमून प्रबोधनाचे कार्य करावे, तसेच डेंग्यू आजार पसरविण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांना कडक सूचना द्याव्यात याबाबत शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

ठळक मुद्देडेंग्यू, भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आयुक्तांना साकडेशिवसेनेचे आंदोलन : कार्यवाही न केल्यास लढा उभारण्याचा इशारा

कोल्हापूर : शहर आणि उपनगरात डेंग्यू आणि भटक्या कुत्र्यांंच्या त्रासामुळे कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर विशेष पथक नेमून प्रबोधनाचे कार्य करावे, तसेच डेंग्यू आजार पसरविण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांना कडक सूचना द्याव्यात याबाबत शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, डेग्यू आणि भटक्या कुत्र्यांमुळे लोकांचे प्राण गेले आहेत. फक्त वर्तमानपत्रातून प्रबोधनाच्या जाहिराती न देता जे घटक कारणीभूत आहेत त्यांच्यावर कायदेशीररीत्या कडक कारवाई करावी. यासाठी विशेष पथक नेमून युद्धपातळीवर जनजागृती करणे आवश्यक आहे.

क्रिडाईच्या सदस्यांना बोलवून जिथे बांधकामे सुरू आहेत, तेथे पाणी न साचविण्याच्या योग्य त्या सूचना द्याव्यात. अन्यथा शिवसेना लढा उभा करेल, असा इशाराही देण्यात आला. शहरातील स्वच्छता मोहिमेबाबत आयुक्त डॉ. कलशेट्टी यांचा शिवसेनेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी, डेंग्यूबाबत घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे, याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या शिष्ठमंडळात, शहराध्यक्ष शिवाजीराव जाधव, सुजित चव्हाण, अवधूत साळोखे, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, शरद पाटील, धनंजय सावंत, शशी बिडकर, दिलीप देसाई, रणजित आयरेकर, संजय जाधव, नरेश तुळशीकर, दिनेश परमार, धनंजय यादव, विराज ओतारी, शुभांगी पोवार, मेघना पेडणेकर, सुमन शिंदे, आदींचा सहभाग होता.रात्रीच्या मासांहारी भोजन वाहनांचे परवाने तपासाशहरात व उपनगर परिसरात रात्रीच्यावेळी मांसाहार भोजन विक्रीच्या गाड्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांचे सर्वेक्षण करून त्याचे परवाने तपासावेत. या गाड्यावरील शिल्लक राहिलेल्या अन्नाची विल्हेवाट कशा पद्धतीने लावतात याची माहिती घ्यावी. भटक्या कुत्र्यांचे थवे अशा गाड्यामुळेच वाढत आहेत ते भविष्यात घातक ठरू शकतात, असा आरोप संजय पवार यांनी केला.

 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर