शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

वनविभागाच्या हद्दीमुळे दोन तालुके जोडण्यामध्ये अडसर-राधानगरी-गगनबावडा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:52 IST

राधानगरी : राधानगरी व गगनबावडा या दोन तालुक्यांच्या मुख्यालयाला जोडणारा रस्ता बारमाही होण्यास वन विभागाच्या केवळ दीड किलोमीटरच्या हद्दीने खोडा घातला

ठळक मुद्दे : मुख्यमंत्री सडक योजनेतून काम सुरू; दीड किलोमीटरचा खोडा

राधानगरी : राधानगरी व गगनबावडा या दोन तालुक्यांच्या मुख्यालयाला जोडणारा रस्ता बारमाही होण्यास वन विभागाच्या केवळ दीड किलोमीटरच्या हद्दीने खोडा घातला आहे. दुर्गम भागातील अनेक गावांना लाभदायक असलेल्या या रस्त्याचे बावेली जवळील काम मुख्यमंत्री सडक योजनेतून सुरु आहे. उर्वरित रस्ता या पूर्वीच पक्का झाला आहे. पुढील वर्षापासून तो सुरु होईल यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हे तालुके आणखी जवळ येतील.

या दोन ठिकाणातील अंतर फक्त ३४ किलोमीटर आहे.मात्र पक्का रस्ता नसल्याने या रस्त्याचा वापर कमी होतो.राधानगरी कडील बाजूने पूर्वी दुर्गमानवड पर्यंतच कच्च्या रस्त्याने वाहतूक व्हायची.या परिसरातून हिंडाल्कोची बॉक्साइड खाण सुरु झाल्यावर या रस्त्याचे भाग्य उजळले रस्ता पुढे पडसाळी फाट्या पर्यंत पक्का झाला. तेथून गगनबावड्याकडे गेलेला रस्ताही धामणी प्रकल्प सुरु झाल्यावर गेल्या काही वर्षात पक्का झाला आहे.

मात्र येथून दीड किलोमीटर अंतरावर वन विभागाची हद्द सुरु होते. येथील डांबरीकरण करण्यास या विभागाने प्रतिबंध केल्याने हा भाग तसाच कच्च्या स्वरुपात राहिला आहे.तेथून पुढे तेवढाच भाग राधानगरी तालुक्यात येतो हि जमीन खाजगी मालकीची असल्याने या भागाचे पक्के झाले आहे.येथून गगनबावडा तालुक्याची हद्द सुरु होते.हा भाग अवजड वळणाचा,मोठ्या उताराचा व डोंगरी स्वरूपाचा होता. हे अंतर साडेतीन किलोमीटर आहे. या भागाचेकाम नुकतेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरु झाले आहे.या साठी दीड कोटी निधी मंजूर झाला आहे. आता या मागार्तील मोठी वअवजड वळणे काढण्यात आली असून मोठे उतारही खोदुन कमी कारण्यात आले आहेत. रस्ता रुंद व प्रशस्त झाला आहे. त्याचे खडीकरण सुरु असून कदाचित डांबरीकरण पुढील वर्षी पूर्ण होईल. त्यानंतर हारस्ता वाहतुकीला सोयीस्कर होणार आहे.पाठपुराव्याची गरजवन विभागाने नियमाच्या आडून विरोध केल्याने काम थांबले आहे. तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर पर्यायी जमीन देऊन ही जागा हस्तांतर करण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, नंतर त्याचा पाठपुरावा झाला नाही. हे सर्व केंद्र सरकारच्या पातळीवर करावे लागणार असल्याने खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर