शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

दुहेरी निर्बंधामुळे साखर कारखानदारी मोडेल

By admin | Updated: September 28, 2016 00:25 IST

संजय मंडलिक : साखरसाठ्यावरील निर्बंध मागे घ्या; शेतकऱ्यासाठी कारखाने तोट्यात

म्हाकवे : साखर केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची बलस्थाने असणारी साखर कारखानदारी मोडीत निघणार आहे. शासनाच्या दुहेरी भूमिकेमुळे साखर कारखानदारी आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना फटका बसणार असल्याचा इशारा देत, शासनाने हे निर्बंध घालताना फेरविचार करावा, असे आवाहन सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी केले आहे.शासनाने सप्टेंबर २0१६ अखेर एकूण साखरेच्या ३७ टक्के आणि ३१ आॅक्टोंबरपर्यंत २४ टक्केच साखरसाठा शिल्लक असावा, असे आदेश कारखान्यांना दिले आहेत. यापेक्षा अधिक साखरसाठा करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे संकेत शासनाने दिले आहेत.शासनाच्या या निर्बंधामुळे बाजारात साखर मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्याने साखर दरात घसरण होणार आहे. याचा थेट आर्थिक फटका कारखानदार आणि त्या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाने तोट्यात चालविले जात असताना शासन सर्व निर्बंध आणि कर या उद्योगावरच लावत आहे. ही दुर्दैवाची बाब असल्याचेही प्रा. मंडलिक यांनी पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)२0१४-१५ व २0१५-१६ या हंगामात कारखानदारी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आली होती. शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी शासनाने दिलेल्या कर्जाचे हप्तेही कारखान्यांना अदा करावे लागणार आहेत. अशावेळी साखर दराची थोडीफार मदत होती. साखर कारखानदारीच्या उभारीमुळेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक सक्षम झाला आहे; परंतु शेतकऱ्यांची बलस्थाने असणारी साखर कारखानदारी केंद्राच्या दुहेरी धोरणामुळे मोडीत निघणार आहे. एका बाजूला एफआरपीप्रमाणे उस दर देण्याचे आदेश व दुसऱ्या बाजूला साखरसाठ्यावर निर्बंध, यामुळे बाजारातील साखरेच्या दराचा विचार न करता ती विकावी लागणार आहे.