शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुहेरी निर्बंधामुळे साखर कारखानदारी मोडेल

By admin | Updated: September 28, 2016 00:25 IST

संजय मंडलिक : साखरसाठ्यावरील निर्बंध मागे घ्या; शेतकऱ्यासाठी कारखाने तोट्यात

म्हाकवे : साखर केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची बलस्थाने असणारी साखर कारखानदारी मोडीत निघणार आहे. शासनाच्या दुहेरी भूमिकेमुळे साखर कारखानदारी आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना फटका बसणार असल्याचा इशारा देत, शासनाने हे निर्बंध घालताना फेरविचार करावा, असे आवाहन सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी केले आहे.शासनाने सप्टेंबर २0१६ अखेर एकूण साखरेच्या ३७ टक्के आणि ३१ आॅक्टोंबरपर्यंत २४ टक्केच साखरसाठा शिल्लक असावा, असे आदेश कारखान्यांना दिले आहेत. यापेक्षा अधिक साखरसाठा करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे संकेत शासनाने दिले आहेत.शासनाच्या या निर्बंधामुळे बाजारात साखर मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्याने साखर दरात घसरण होणार आहे. याचा थेट आर्थिक फटका कारखानदार आणि त्या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाने तोट्यात चालविले जात असताना शासन सर्व निर्बंध आणि कर या उद्योगावरच लावत आहे. ही दुर्दैवाची बाब असल्याचेही प्रा. मंडलिक यांनी पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)२0१४-१५ व २0१५-१६ या हंगामात कारखानदारी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आली होती. शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी शासनाने दिलेल्या कर्जाचे हप्तेही कारखान्यांना अदा करावे लागणार आहेत. अशावेळी साखर दराची थोडीफार मदत होती. साखर कारखानदारीच्या उभारीमुळेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक सक्षम झाला आहे; परंतु शेतकऱ्यांची बलस्थाने असणारी साखर कारखानदारी केंद्राच्या दुहेरी धोरणामुळे मोडीत निघणार आहे. एका बाजूला एफआरपीप्रमाणे उस दर देण्याचे आदेश व दुसऱ्या बाजूला साखरसाठ्यावर निर्बंध, यामुळे बाजारातील साखरेच्या दराचा विचार न करता ती विकावी लागणार आहे.