शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

दुहेरी निर्बंधामुळे साखर कारखानदारी मोडेल

By admin | Updated: September 28, 2016 00:25 IST

संजय मंडलिक : साखरसाठ्यावरील निर्बंध मागे घ्या; शेतकऱ्यासाठी कारखाने तोट्यात

म्हाकवे : साखर केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची बलस्थाने असणारी साखर कारखानदारी मोडीत निघणार आहे. शासनाच्या दुहेरी भूमिकेमुळे साखर कारखानदारी आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना फटका बसणार असल्याचा इशारा देत, शासनाने हे निर्बंध घालताना फेरविचार करावा, असे आवाहन सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी केले आहे.शासनाने सप्टेंबर २0१६ अखेर एकूण साखरेच्या ३७ टक्के आणि ३१ आॅक्टोंबरपर्यंत २४ टक्केच साखरसाठा शिल्लक असावा, असे आदेश कारखान्यांना दिले आहेत. यापेक्षा अधिक साखरसाठा करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे संकेत शासनाने दिले आहेत.शासनाच्या या निर्बंधामुळे बाजारात साखर मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्याने साखर दरात घसरण होणार आहे. याचा थेट आर्थिक फटका कारखानदार आणि त्या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाने तोट्यात चालविले जात असताना शासन सर्व निर्बंध आणि कर या उद्योगावरच लावत आहे. ही दुर्दैवाची बाब असल्याचेही प्रा. मंडलिक यांनी पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)२0१४-१५ व २0१५-१६ या हंगामात कारखानदारी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आली होती. शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी शासनाने दिलेल्या कर्जाचे हप्तेही कारखान्यांना अदा करावे लागणार आहेत. अशावेळी साखर दराची थोडीफार मदत होती. साखर कारखानदारीच्या उभारीमुळेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक सक्षम झाला आहे; परंतु शेतकऱ्यांची बलस्थाने असणारी साखर कारखानदारी केंद्राच्या दुहेरी धोरणामुळे मोडीत निघणार आहे. एका बाजूला एफआरपीप्रमाणे उस दर देण्याचे आदेश व दुसऱ्या बाजूला साखरसाठ्यावर निर्बंध, यामुळे बाजारातील साखरेच्या दराचा विचार न करता ती विकावी लागणार आहे.