शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

प्रबोधनामुळे कोल्हापूरकरांची ‘फटाकेमुक्ती’कडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 20:17 IST

कोल्हापूर : निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देफटाके वाजविणे टाळणाºयांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे

कोल्हापूर : निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यावर्षी फटाके वाजविणे टाळणाºयांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. पर्यावरणपूरक दिवाळीला कोल्हापूरकरांचा वर्षागणिक प्रतिसाद वाढत आहे.

हवा आणि ध्वनी प्रदूषणात फटाक्यांमुळे भर पडते. त्यामुळे आरोग्य बिघडते. ते टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरमध्ये फटाके टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी व्हावी, यासाठी विविध संस्था प्रबोधन करीत आहेत. यातील निसर्गमित्र संस्था फटाके न वाजविणाºया मुलांसाठी निसर्गसहल काढते. त्यासह या संस्थेमार्फत विद्यार्थी हे व्यापाºयांना ‘दीपावली पाडवा व लक्ष्मीपूजनाचा आनंद फटाके न वाजवता मिठाई वाटून साजरा करूया,’ अशा आशयाची पत्रे पाठवितात. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती शालेय विद्यार्थ्यांना संकल्पपत्र पुरवून ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करण्याची शपथ देण्याचा उपक्रम राबविते.

शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थी हे फटाके वाजविणे टाळून त्यातून बचत होणाºया पैशांमधून त्यांच्या शाळेतील गरीब मित्र-मैत्रिणीला दिवाळीची कपडे भेट देतात. या संस्थांतर्फे गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. काही व्यक्ती या वैयक्तिकपणे फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करतात. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फटाके वाजविणाºयांचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवत आहे.

पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कोल्हापूरकरांचे एक चांगले पाऊल या माध्यमातून पडत आहे. शहरातील विविध भागांत दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची निरीक्षणे नोंदविण्याचे काम आमच्या विभागाकडून सुरू आहे. येत्या चार दिवसांत त्याचा अहवाल तयार केला जाईल.- डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरण विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ.

 

टॅग्स :diwaliदिवाळीpollutionप्रदूषण