शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शिरोळमध्ये पेयजल योजना वरदायी

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

३७ गावांना लाभ : नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर

संदीप बावचे - शिरोळ -प्रदूषणाबाबत भरपूर चर्चा केली जाते; मात्र आजवर ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. कृष्णेसह पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांना प्रदूषणाची लागण झाली आहे, अशा परिस्थितीत शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा शिरोळ तालुक्यातील ३७ गावांना झाला आहे. ५३ गावांपैकी ४९ गावांना सध्या नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. पेयजल योजना बहुतांशी गावांना वरदान ठरली आहे. शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर व कुरुंदवाड ही दोन नगरपालिका असलेली शहरे व ५३ खेडी आहेत. कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा व वारणा अशा चार नद्या लाभल्यामुळे सुजलाम्- सुफलाम् असा हा तालुका बनला आहे, असे असले तरी गटार गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीनंतर सर्वच नद्या प्रदूषित बनल्या आहेत. पंचगंगा नदीकाठावरील अकरा, तर कृष्णानदीकाठी असलेल्या २५ गावांना नदीचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध होते. तालुक्यातील अनेक गावांना शुद्धिकरणाशिवाय पाणीपुरवठा होत होता. गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात राज्य शासनाकडून अब्दुललाट, आलास, गणेशवाडी, औरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, शिवनाकवाडी, शिरदवाड, लाटवाडी, यड्राव, जांभळी, हरोली, आगर, नांदणी, दत्तवाड, कुटवाड, नृसिंहवाडी, हेरवाड, तेरवाड, कनवाड, अकिवाट, राजापूर, शिरोळ, टाकळीवाडी, शिरटी, उदगांव, चिंचवाड, अर्जुनवाड, घोसरवाड, टाकळी, तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर, संभाजीपूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, हसूर, आदी ३७ गावांत राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाल्यामुळे तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. यातील काही गावामध्ये योजना पूर्ण झाली असून, बहुतांशी योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. प्रदूषित पाण्याचा फटकाशिरोळ तालुक्याला चार नद्यांचे वरदान लाभले असले, तरी या नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. बेसुमार वाळू उपसा, तेलाचे तवंग, औद्योगिक वसाहतील सांडपाणी आणि राजापूर धरणातून बॅकवॉटरचे येणारे पंचगंगेचे मिसळलेले पाणी यामुळे बहुतांशी गावांना दूषित पाण्यावर अवलंबून राहावे लागते. याचाच फटका तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे.सर्वांना नदीचेच पाणीतालुक्यातील ५३ गावांपैकी ४९ गावांना सध्या नदीवरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कूपनलिका व विहिरीतील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर व संभाजीपूर या गावांतील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यालाच नदीचेच पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश कमळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली..चार गावे निविदेच्या प्रतीक्षेतशिरोळ तालुक्यातील तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर व संभाजीपूर या गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषद स्तरावरून या कामाच्या निविदा अद्याप निघालेल्या नाहीत. त्यामुळे या योजनेच्या कामास मुहूर्त केव्हा, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. ..