शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमध्ये पेयजल योजना वरदायी

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

३७ गावांना लाभ : नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर

संदीप बावचे - शिरोळ -प्रदूषणाबाबत भरपूर चर्चा केली जाते; मात्र आजवर ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. कृष्णेसह पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांना प्रदूषणाची लागण झाली आहे, अशा परिस्थितीत शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा शिरोळ तालुक्यातील ३७ गावांना झाला आहे. ५३ गावांपैकी ४९ गावांना सध्या नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. पेयजल योजना बहुतांशी गावांना वरदान ठरली आहे. शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर व कुरुंदवाड ही दोन नगरपालिका असलेली शहरे व ५३ खेडी आहेत. कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा व वारणा अशा चार नद्या लाभल्यामुळे सुजलाम्- सुफलाम् असा हा तालुका बनला आहे, असे असले तरी गटार गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीनंतर सर्वच नद्या प्रदूषित बनल्या आहेत. पंचगंगा नदीकाठावरील अकरा, तर कृष्णानदीकाठी असलेल्या २५ गावांना नदीचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध होते. तालुक्यातील अनेक गावांना शुद्धिकरणाशिवाय पाणीपुरवठा होत होता. गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात राज्य शासनाकडून अब्दुललाट, आलास, गणेशवाडी, औरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, शिवनाकवाडी, शिरदवाड, लाटवाडी, यड्राव, जांभळी, हरोली, आगर, नांदणी, दत्तवाड, कुटवाड, नृसिंहवाडी, हेरवाड, तेरवाड, कनवाड, अकिवाट, राजापूर, शिरोळ, टाकळीवाडी, शिरटी, उदगांव, चिंचवाड, अर्जुनवाड, घोसरवाड, टाकळी, तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर, संभाजीपूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, हसूर, आदी ३७ गावांत राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाल्यामुळे तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. यातील काही गावामध्ये योजना पूर्ण झाली असून, बहुतांशी योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. प्रदूषित पाण्याचा फटकाशिरोळ तालुक्याला चार नद्यांचे वरदान लाभले असले, तरी या नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. बेसुमार वाळू उपसा, तेलाचे तवंग, औद्योगिक वसाहतील सांडपाणी आणि राजापूर धरणातून बॅकवॉटरचे येणारे पंचगंगेचे मिसळलेले पाणी यामुळे बहुतांशी गावांना दूषित पाण्यावर अवलंबून राहावे लागते. याचाच फटका तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे.सर्वांना नदीचेच पाणीतालुक्यातील ५३ गावांपैकी ४९ गावांना सध्या नदीवरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कूपनलिका व विहिरीतील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर व संभाजीपूर या गावांतील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यालाच नदीचेच पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश कमळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली..चार गावे निविदेच्या प्रतीक्षेतशिरोळ तालुक्यातील तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर व संभाजीपूर या गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषद स्तरावरून या कामाच्या निविदा अद्याप निघालेल्या नाहीत. त्यामुळे या योजनेच्या कामास मुहूर्त केव्हा, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. ..