शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

‘मराठा स्वराज्य भवन’चे स्वप्न दोन वर्षांत साकारणार

By admin | Updated: February 7, 2015 01:04 IST

मदतीचे हात पुढे : आतापर्यंत १५ लाखांचा निधी जमा; दानशूरांनी पुढे येण्याची गरज

प्रवीण देसाई - कोल्हापूर राजर्षी शाहूंच्या नगरीत सर्व समाजाचे सांस्कृतिक हॉल तसेच भवन आहेत. त्याला अपवाद मराठा समाजाचा आहे. या समाजाचे भवनच कोल्हापुरात नाही. ते होण्यासाठी मराठा महासंघाच्या पुढाकाराने ‘मराठा स्वराज्य भवन’ उभारण्यासाठी प्रयत्न होत आहेत. दोन वर्षांत ते उभे करण्याचा चंगच कार्यकर्त्यांनी बांधला असून यासाठी मराठा समाजासह इतर समाजातूनही मदतीचा ओघ येत आहे.मराठा समाजबांधव एकत्र यावेत असे हक्काचे ठिकाण व्हावे, हे प्रत्येक मराठा बांधवाला वाटते. बहुतांश राज्यकर्ते हे मराठा समाजाचेच आहेत. परंतु आजतागायत मराठा समाजाचे स्वतंत्र भवन उभे राहू शकले नाही हे विशेष, परंतु बिगर राजकीय व मराठा समाजासाठी कार्य करणारी संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाने समाजाचे भवन व्हावे, या विचारांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याची सुरुवात म्हणून २०१२मध्ये जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या पुढाकाराने ‘मराठा स्वराज्य भवन’ या संस्थेची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर मराठा समाजासाठी भवनाची असलेली गरज याबाबत जनजागृतीही सुरू झाली. त्याला कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळाला, परंतु याला खऱ्या अर्थाने मूर्तरूप आले ते आॅगस्ट २०१४ मध्ये घेतलेल्या मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात. यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाच्या माध्यमातून सर्व ते सहकार्य करण्याचे जाहीर केले होते. त्याच दिवशी उपस्थित मान्यवरांनी मदतीची घोषणा केली होती. ही रक्कम जवळपास ४० लाख रुपयांची होती. त्यातील १५ लाख रुपये मदत आतापर्यंत जमा झाली आहे. त्यामध्ये मराठा समाजातील राजकीय नेते, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्य मराठाबांधवांचा समावेश आहे. ही मदत ११ हजारांपासून १ लाखांपर्यंतची आहे. याशिवाय इतर समाजानेही मदतीचा हात पुढे केला आहे. समाजामध्ये प्रबोधनासाठी जवळपास दीडशेहून अधिक रिक्षांवर याचे फलक लावण्यात आले आहेत. मदतीचा ओघ सुरू असला तरी अजूनही समाजातील सर्व स्तरांतील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज आहे.या भवनसाठी ५ एकर जागेची गरज असून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. काही जागाही सुचविण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडूक सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. गत सरकारकडून घोषणा झाली परंतु ते परत सत्तेवर न आल्याने याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते परंतु नव्या सरकारकडून त्याची पूर्तता होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे. कसे असेल मराठा स्वराज्य भवनया भवनासाठी ५ एकर जागा अपेक्षित आहे. ही वास्तू फक्त विवाह समारंभापुरती मर्यादित राहणार नाही तर या ठिकाणी अभ्यासिका, वसतिगृह, कुस्तीचा आखाडा, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर अकॅडमी, महिलांसाठी ‘विशेष कक्ष’ स्थापन केला जाणार आहे. येथे त्यांना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.जागेसाठी शासनपातळीवर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे. निश्चितच याला यश येईल व दोन वर्षांत मराठा समाजाचे स्वप्न असलेली ही वास्तू साकारेल. - वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघ