शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

टोलवर तोडगा काढू-मुख्यमंत्री चव्हाण

By admin | Updated: August 27, 2014 00:38 IST

थेट पाईपलाईन योजनेचे भूमिपूजन थाटात

कोल्हापूर : कोल्हापूरचा टोल प्रश्न हा जटिल बनविला गेला आहे. टोलमुक्तीबाबत काही पर्याय समोर आहेत. येथील निर्णयाचा राज्यातील सर्वच बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरित करा) प्रकल्पांवर परिणाम होणार आहे. मूल्यांकन समितीच्या अहवालाचा सचिव स्तरावर अभ्यास सुरू असून, लवकरच टोलमधून सकारात्मक तोडगा काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज, मंगळवारी कोल्हापूरकरांना दिली.रस्ते प्रकल्पाचा करार डोळे उघडे ठेवून महापालिकेने केला होता. आता यातून संपूर्ण जबाबदारी झटकता येणार नाही, असा सूचक इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.पुईखडी येथे काळम्मावाडी पाईपलाईन योजनेचा भूमिपूजन व कोनशिला अनावरण समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज होते. यावेळी महापौर तृप्ती माळवी, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एम.एच.०९ गाड्यांना टोलमधून मुक्त करण्याची मागणी भाषणात केली. हाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी टोल व ‘बीओटी’बाबतचे राज्याचे धोरण स्पष्ट केले.मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, टोलचे पैसे भागवा म्हणणे सोपे आहे. याचा इतर अनेक शहरांत सुरळीतपणे सुरू असलेल्या टोलवर परिणाम होणार आहे. टोलमधून आता महापालिका जबाबदारी झटकत आहे, हे बरोबर नाही. कोल्हापूरच्या वाहनांना टोलमधून मुक्त करण्याचा निर्णय घेतला, तरीही विकासाचे आर्थिक नुकसान होणार आहे. याचाही निर्णय घेताना विचार करावा लागेल. एम.एच.०९ किंवा सर्व हलक्या वाहनांना टोलमधून मुक्ती, पेट्रोल व डिझेलवर कर, महापालिकेच्या काही जागा विकून किंवा त्यावर कर्ज काढून टोेलचे पैसे भागविणे, असे काही पर्याय समोर आहेत. मूल्यांकन समितीच्या अहवालाचा सर्वांगीण अभ्यास करून लवकरच टोलबाबत निर्णय घेण्यात येईल.भविष्यात कोरडवाहू शेतीला शाश्वती देण्यावर भर राहील. राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यानेच दुष्काळाचा सामना करू शकलो. भविष्यातही अशा प्रकारचा सामना करण्यासाठी अभिनव योजना हाती घेण्यात येतील, असे आश्वासनही मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी) शहरवासीयांना पाच कोटींची भेट राज्य शासनाच्या अभिनव उपक्रम योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली. या निधीतून राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळ सुशोभीकरण, गांधी मैदान, राजर्षी शाहू ब्लड बॅँक, माजी सैनिक कल्याण उपक्रम, वर्किंग वुमेन्स होस्टेल आदींसाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे. राजर्षी शाहू महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकाचा १५९ कोटींचा आराखडा प्राप्त झाला असून याबाबतही लवकरच निधीची उपलब्धता करून देण्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली.