शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी रद्दला पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीचा डोलोरा कोसळेल -राजू शेट्टी यांचा घणाघात : सर्वच संघटना निर्णयाच्या विरोधात आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : केंद्र शासन एकरकमी एफआरपी रद्द करू पाहत आहे. या धोरणाला राज्य सरकारने पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीचा डोलारा ...

कोल्हापूर : केंद्र शासन एकरकमी एफआरपी रद्द करू पाहत आहे. या धोरणाला राज्य सरकारने पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीचा डोलारा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा घणाघाती इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे दिला. या निर्णयावर सर्वच संघटनांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिल्या असून सर्व संघटनांची एकत्रित वज्रमूठ करून त्याविरोधात संघर्ष उभा करू, असा इशारा दिला आहे.

‘लोकमत’मध्ये शनिवारी त्यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक वगळता इतर शेतकऱ्यांना तीन कृषी कायदे करून अदानी-अंबानीच्या दावणीला बांधण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. आता ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या दावणीला बांधण्यासाठीच एकरकमी एफआरपीचा कायदा रद्द करू पाहत आहे. शेतकऱ्यांनी अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर एकरकमी एफआरपी मिळाली आहे. ती रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास केंद्र व राज्य सरकारला सळो की पळो करून सोडू.

कारखान्यांचे सगळे भागल्यानंतर उरलेले पैसे शेतकऱ्याला देण्याचे धोरण यापूर्वी होते. ते आम्ही चळवळीच्या जोरावर बदलायला भाग पाडले व आधी शेतकऱ्यांचे पैसे द्या, असा आग्रह धरला. आता त्यालाच छेद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. केंद्र शासनाला उत्तर प्रदेशमधील खासगी साखर कारखान्यांच्या हितासाठी हा निर्णय घ्यायचा आहे. त्याला भाजपने व राज्यातील सत्ताधारी पक्षांनी साटेलोटे करून पाठिंबा दिल्यास शेतकऱ्याला पुन्हा बंड करावे लागेल. एकरकमी एफआरपी नको म्हणजे साखरेच्या दरानुसार आम्ही उपलब्ध होतील एवढे पैसे व उपलब्ध होतील तसे पैसे शेतकऱ्याला देऊ असे हे धोरण आहे. यावर्षी साखरेचा भाव ३३०० रुपये क्विंटल असा होता. त्यातील ७० टक्के शेतकऱ्याला द्यायचे झाल्यास शेतकऱ्याला १८५० रुपयेच मिळू शकतात. म्हणजे सातत्यपूर्ण संघर्षानंतर जो दर टनास ३ हजारांपर्यंत गेला आहे तो मागे नेण्याचा हा डाव आहे.

जयशिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने म्हणाले, हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या कायद्याचा बडगा असतानाही एकाही कारखान्याने उशिरा एफआरपी दिली म्हणून व्याज दिलेले नाही. त्याबद्दल आंदोलन अंकुश व जय शिवराय संघटनेने उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. असे असताना एकरकमी एफआरपीपासून कारखानदारांना मुक्त केल्यास पुन्हा शेतकऱ्यांची पिळवणूक होईल. आम्ही या निर्णयाविरोधात सर्वोच्च् न्यायालयापर्यंत जावू. सर्व संघटनांनी एकत्रित येवून या निर्णय मागे घ्यायला भाग पाडू.

जयशिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने म्हणाले, हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या कायद्याचा बडगा असतानाही एकाही कारखान्याने उशिरा एफआरपी दिली म्हणून व्याज दिलेले नाही. त्याबद्दल आंदोलन अंकुश व जय शिवराय संघटनेने उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. असे असताना एकरकमी एफआरपीपासून कारखानदारांना मुक्त केल्यास पुन्हा शेतकऱ्यांची पिळवणूक होईल. आम्ही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ. सर्व संघटनांनी एकत्रित येऊन हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू.