शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

एफआरपी रद्दला पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीचा डोलोरा कोसळेल -राजू शेट्टी यांचा घणाघात : सर्वच संघटना निर्णयाच्या विरोधात आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : केंद्र शासन एकरकमी एफआरपी रद्द करू पाहत आहे. या धोरणाला राज्य सरकारने पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीचा डोलारा ...

कोल्हापूर : केंद्र शासन एकरकमी एफआरपी रद्द करू पाहत आहे. या धोरणाला राज्य सरकारने पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीचा डोलारा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा घणाघाती इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे दिला. या निर्णयावर सर्वच संघटनांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिल्या असून सर्व संघटनांची एकत्रित वज्रमूठ करून त्याविरोधात संघर्ष उभा करू, असा इशारा दिला आहे.

‘लोकमत’मध्ये शनिवारी त्यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक वगळता इतर शेतकऱ्यांना तीन कृषी कायदे करून अदानी-अंबानीच्या दावणीला बांधण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. आता ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या दावणीला बांधण्यासाठीच एकरकमी एफआरपीचा कायदा रद्द करू पाहत आहे. शेतकऱ्यांनी अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर एकरकमी एफआरपी मिळाली आहे. ती रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास केंद्र व राज्य सरकारला सळो की पळो करून सोडू.

कारखान्यांचे सगळे भागल्यानंतर उरलेले पैसे शेतकऱ्याला देण्याचे धोरण यापूर्वी होते. ते आम्ही चळवळीच्या जोरावर बदलायला भाग पाडले व आधी शेतकऱ्यांचे पैसे द्या, असा आग्रह धरला. आता त्यालाच छेद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. केंद्र शासनाला उत्तर प्रदेशमधील खासगी साखर कारखान्यांच्या हितासाठी हा निर्णय घ्यायचा आहे. त्याला भाजपने व राज्यातील सत्ताधारी पक्षांनी साटेलोटे करून पाठिंबा दिल्यास शेतकऱ्याला पुन्हा बंड करावे लागेल. एकरकमी एफआरपी नको म्हणजे साखरेच्या दरानुसार आम्ही उपलब्ध होतील एवढे पैसे व उपलब्ध होतील तसे पैसे शेतकऱ्याला देऊ असे हे धोरण आहे. यावर्षी साखरेचा भाव ३३०० रुपये क्विंटल असा होता. त्यातील ७० टक्के शेतकऱ्याला द्यायचे झाल्यास शेतकऱ्याला १८५० रुपयेच मिळू शकतात. म्हणजे सातत्यपूर्ण संघर्षानंतर जो दर टनास ३ हजारांपर्यंत गेला आहे तो मागे नेण्याचा हा डाव आहे.

जयशिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने म्हणाले, हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या कायद्याचा बडगा असतानाही एकाही कारखान्याने उशिरा एफआरपी दिली म्हणून व्याज दिलेले नाही. त्याबद्दल आंदोलन अंकुश व जय शिवराय संघटनेने उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. असे असताना एकरकमी एफआरपीपासून कारखानदारांना मुक्त केल्यास पुन्हा शेतकऱ्यांची पिळवणूक होईल. आम्ही या निर्णयाविरोधात सर्वोच्च् न्यायालयापर्यंत जावू. सर्व संघटनांनी एकत्रित येवून या निर्णय मागे घ्यायला भाग पाडू.

जयशिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने म्हणाले, हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या कायद्याचा बडगा असतानाही एकाही कारखान्याने उशिरा एफआरपी दिली म्हणून व्याज दिलेले नाही. त्याबद्दल आंदोलन अंकुश व जय शिवराय संघटनेने उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. असे असताना एकरकमी एफआरपीपासून कारखानदारांना मुक्त केल्यास पुन्हा शेतकऱ्यांची पिळवणूक होईल. आम्ही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ. सर्व संघटनांनी एकत्रित येऊन हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू.