शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पराभवानंतर सख्ख्या भावावरही संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील पराभवाने वीरेंद्र मंडलिक यांची नाराजी ठीक आहे. त्याचे निरसन केले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील पराभवाने वीरेंद्र मंडलिक यांची नाराजी ठीक आहे. त्याचे निरसन केले आहे. राजकारणात पराभवानंतर सख्ख्या भावावरही संशय घेतला जातो, असे उत्तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंडलिक यांच्या नाराजीवर शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव झाल्यानंतर कागल तालुक्यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यात गुरुवारी वीरेंद्र मंडलिक यांनी ‘माझा पराभव झाला नाही, तर तो केला गेला’ अशी फेसबुक पोस्ट टाकून उघड नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांना विचारले असता, शुक्रवारी सकाळी पराभूत चौघांच्या घरी जाऊन आपण आलेलो आहे. चार उमेदवार पराभूत झाले. त्याची कारणमीमांसाही तपासू, असे त्यांनी सांगितले.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पराभवामुळे वीरेंद्र मंडलिक नाराज आहेत ठीक आहे, ते एकटेच पराभूत झाले नाहीत. इतरही तिघे आहेत. क्रॉस व्होटिंगचा फटका बसला, ही वस्तुस्थिती आहे. पराभवानंतर सख्ख्या भावावरही संशय व्यक्त केला जातो. मागील निवडणुकीतही विरोधी आघाडीतील दोघे विजयी झाले होते, असे स्पष्टीकरण मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

शपथा घेतल्या तरी क्रॉस व्होटिंग

नेत्यांसह ठरावधारकांच्या शपथा घेतल्या तरी क्रॉस व्होटिंग झाले. दुर्दैवाने शंभर-दीडशे मतांचा फरक पडला, क्रॉस व्होटिंग दरवेळी होते, यावेळी शपथा घेतल्या तरी ते थांबले नाही. यामध्ये गरीब कार्यकर्त्याचा बळी जातो. ‘मोडस ऑपरेंडी’ ही बदलावी लागेल. संचालकांनी चांगले काम करून आताच्या मताधिक्यात हजार, दीड हजार जादा मते घेण्याचा प्रयत्न करा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.