शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निकालांना ‘डबल एंट्री’ बंदचा फटका!

By admin | Updated: March 30, 2015 00:12 IST

शिवाजी विद्यापीठ : समन्वयातील अभावाने गोंधळ : नव्या पद्धतीतील त्रुटींची दुरुस्ती आवश्यक

कोल्हापूर : निकाल लवकर लागावेत यासाठी यंदा शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उत्तरपत्रिकेवरून थेट संगणकावर गुण नोंदविण्याची (फीडिंग) प्रक्रिया राबविली. मात्र, त्यातील काही तांत्रिक त्रुटी, मनुष्यबळाच्या पातळीवरील अंमलबजावणीतील चुकांमुळे त्याचा उलट परिणाम झाला. शिवाय यापूर्वीची ‘डबल एंट्री सिस्टीम’ बंद केल्याचा फटका निकाल वेळेवर लावण्याच्या प्रक्रियेला बसला आहे. ते सध्याच्या परीक्षाविषयक गोंधळाचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते.निकाल लावण्याच्या प्रक्रियेत यापूर्वी डबल एंट्री सिस्टीम पद्धत कार्यान्वित होती. यामध्ये प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासल्यानंतर त्यांना दिलेल्या गुणपत्रिकेत सांकेतिक क्रमांकानुसार ते गुण लिहीत होते. तेथून संबंधित पत्रिका ‘कॅप’कडे गुणपत्रिकेतील फीडिंगसाठी जात होती. शिवाय त्याचे एकत्रित लेजर तयार केले जात होते. यामुळे निकालात चूक झाल्यास ती प्राध्यापकांच्या गुणपत्रिकेत झाली की फीडिंगमध्ये झाली, ते पटकन समजत होते. मात्र, यावर्षी पूर्वीची पद्धत बंद करण्यात आली. तसेच नव्या पद्धतीनुसार तपासलेल्या उत्तरपत्रिकेवरून थेट गुण फीडिंगसाठी पाठविले जातात. या प्रक्रियेत प्राध्यापकांकडील गुणपत्रिका समाविष्ट केली नाही. परीक्षा अर्ज भरताना काही तांत्रिक बाबींमुळे आॅड नंबरची संख्या वाढली. ‘नंबर मास्ंिकग’ केल्याने अशा विद्यार्थ्यांचे गुणांची नोंद करण्यासाठी उत्तरपत्रिकांची शोधाशोध करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे निकाल लागण्याची प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. नवी पद्धत वेळ वाचविणारी असली, तरी त्यातील काही त्रुटींमुळे, तिच्या अंमलबजावणीतील चुका टाळून ती कार्यन्वित करणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. (प्रतिनिधी) गोंधळाला हे घटक कारणीभूतमहाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून (एमकेसीएल) माहिती मिळविणे अथवा त्यांना पाठविण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी, महाविद्यालयांतील अर्ज भरताना, गुणांची नोंद करण्याच्या प्रक्रियेतील चुका, विद्यार्थ्यांनी केलेल्या विषयांच्या बदलाची नेमक्या यंत्रणेला माहिती नसणे, आदी घटक आणि एकूणच प्रक्रियेतील समन्वयाचा अभाव हे घटक विद्यापीठात सध्या निकालाबाबतच्या गोंधळाला कारणीभूत आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे.नेमक्या चुकांचा शोध घ्यावा‘एमकेसीएल’चे प्रतिनिधी, विद्यापीठातील संगणक विभाग आणि प्रत्यक्ष निकाल लावणाऱ्या प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित बैठक घ्यावी. नेमक्या चुकांचा शोध घ्यावा. अर्ज करणे ते गुणपत्रिकांच्या निर्मितीपर्यंतच्या कार्यवाहीचा पुन्हा आढावा घ्यावा. त्यातील आढळणाऱ्या त्रुटींची दुरुस्ती व्हावी.‘एक्झाम आॅटोमेशन’ बंद का?संगणक आणि परीक्षा विभाग सक्षम होण्यासाठी सहा वर्षांपूर्वी विद्यापीठाने लाखो रुपये खर्चून एक्झाम आॅटोमेशन सॉफ्टवेअर विकसित केले. त्याअंतर्गत काही परीक्षांच्या निकालाचे काम विद्यापीठ आणि अन्य ‘एमकेसीएल’द्वारे चालत होते. त्यातून निकाल वेळेत लागत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या सॉफ्टवेअरचा वापर होत नाही. ‘एमकेसीएल’समवेतचा करार संपल्यास विद्यापीठाला पुन्हा या सॉफ्टवेअरच्या वापराशिवाय पर्याय नसल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.