शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
2
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
3
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
4
कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
5
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
6
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
7
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
8
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
9
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
10
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
11
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
12
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
13
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
14
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
15
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
16
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
17
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
18
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
20
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

निकालांना ‘डबल एंट्री’ बंदचा फटका!

By admin | Updated: March 30, 2015 00:12 IST

शिवाजी विद्यापीठ : समन्वयातील अभावाने गोंधळ : नव्या पद्धतीतील त्रुटींची दुरुस्ती आवश्यक

कोल्हापूर : निकाल लवकर लागावेत यासाठी यंदा शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उत्तरपत्रिकेवरून थेट संगणकावर गुण नोंदविण्याची (फीडिंग) प्रक्रिया राबविली. मात्र, त्यातील काही तांत्रिक त्रुटी, मनुष्यबळाच्या पातळीवरील अंमलबजावणीतील चुकांमुळे त्याचा उलट परिणाम झाला. शिवाय यापूर्वीची ‘डबल एंट्री सिस्टीम’ बंद केल्याचा फटका निकाल वेळेवर लावण्याच्या प्रक्रियेला बसला आहे. ते सध्याच्या परीक्षाविषयक गोंधळाचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते.निकाल लावण्याच्या प्रक्रियेत यापूर्वी डबल एंट्री सिस्टीम पद्धत कार्यान्वित होती. यामध्ये प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासल्यानंतर त्यांना दिलेल्या गुणपत्रिकेत सांकेतिक क्रमांकानुसार ते गुण लिहीत होते. तेथून संबंधित पत्रिका ‘कॅप’कडे गुणपत्रिकेतील फीडिंगसाठी जात होती. शिवाय त्याचे एकत्रित लेजर तयार केले जात होते. यामुळे निकालात चूक झाल्यास ती प्राध्यापकांच्या गुणपत्रिकेत झाली की फीडिंगमध्ये झाली, ते पटकन समजत होते. मात्र, यावर्षी पूर्वीची पद्धत बंद करण्यात आली. तसेच नव्या पद्धतीनुसार तपासलेल्या उत्तरपत्रिकेवरून थेट गुण फीडिंगसाठी पाठविले जातात. या प्रक्रियेत प्राध्यापकांकडील गुणपत्रिका समाविष्ट केली नाही. परीक्षा अर्ज भरताना काही तांत्रिक बाबींमुळे आॅड नंबरची संख्या वाढली. ‘नंबर मास्ंिकग’ केल्याने अशा विद्यार्थ्यांचे गुणांची नोंद करण्यासाठी उत्तरपत्रिकांची शोधाशोध करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे निकाल लागण्याची प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. नवी पद्धत वेळ वाचविणारी असली, तरी त्यातील काही त्रुटींमुळे, तिच्या अंमलबजावणीतील चुका टाळून ती कार्यन्वित करणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. (प्रतिनिधी) गोंधळाला हे घटक कारणीभूतमहाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून (एमकेसीएल) माहिती मिळविणे अथवा त्यांना पाठविण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी, महाविद्यालयांतील अर्ज भरताना, गुणांची नोंद करण्याच्या प्रक्रियेतील चुका, विद्यार्थ्यांनी केलेल्या विषयांच्या बदलाची नेमक्या यंत्रणेला माहिती नसणे, आदी घटक आणि एकूणच प्रक्रियेतील समन्वयाचा अभाव हे घटक विद्यापीठात सध्या निकालाबाबतच्या गोंधळाला कारणीभूत आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे.नेमक्या चुकांचा शोध घ्यावा‘एमकेसीएल’चे प्रतिनिधी, विद्यापीठातील संगणक विभाग आणि प्रत्यक्ष निकाल लावणाऱ्या प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित बैठक घ्यावी. नेमक्या चुकांचा शोध घ्यावा. अर्ज करणे ते गुणपत्रिकांच्या निर्मितीपर्यंतच्या कार्यवाहीचा पुन्हा आढावा घ्यावा. त्यातील आढळणाऱ्या त्रुटींची दुरुस्ती व्हावी.‘एक्झाम आॅटोमेशन’ बंद का?संगणक आणि परीक्षा विभाग सक्षम होण्यासाठी सहा वर्षांपूर्वी विद्यापीठाने लाखो रुपये खर्चून एक्झाम आॅटोमेशन सॉफ्टवेअर विकसित केले. त्याअंतर्गत काही परीक्षांच्या निकालाचे काम विद्यापीठ आणि अन्य ‘एमकेसीएल’द्वारे चालत होते. त्यातून निकाल वेळेत लागत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या सॉफ्टवेअरचा वापर होत नाही. ‘एमकेसीएल’समवेतचा करार संपल्यास विद्यापीठाला पुन्हा या सॉफ्टवेअरच्या वापराशिवाय पर्याय नसल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.