शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

घरात पाणी येईपर्यंत वाट पाहू नका, स्थलांतरित व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शहरातील काही सखाल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. पाऊस अजूनही सुरूच आहे. नागरिकांना आपल्या घरात ...

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शहरातील काही सखाल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. पाऊस अजूनही सुरूच आहे. नागरिकांना आपल्या घरात पाणी येण्याची वाट पाहू नका, त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली आहे.

शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्यानजीक व सखल भागाच्या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रशासक बलकवडे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शहरात फिरतीसाठी बाहेर पडल्या. त्यांनी पाणी आलेल्या रामानंदनगर, शाहुपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, जामदार क्लब, नागाळा पार्क व मुक्त सैनिक वसाहत येथे पाणी आलेल्या सखल भागाची पाहणी केली.

महापालिकेची सर्व यंत्रणा पूर परिस्थितीचा मुकाबला करण्याची सज्ज आहे. स्थलांतरितांसाठी राहण्यासाठी शाळा व मंगल कार्यालये महापालिकेने सज्ज ठेवली आहेत. रामानंदनगर येथील २३ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर शाहुपुरी कुंभार गल्ली येथील ८ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

या वेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, एन. एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे उपस्थित होते.

कृषी विभागाचा बंधारा काढण्याची मागणी -

रामानंद नगराजवळील जाधव पार्क येथे कृषी विभागाने पूर्वी बांधलेला बंधाऱ्यामुळे नाल्यातील पाणी आसपासच्या घरात शिरत असल्याने तो बंधारा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. त्यानुसार आमदार ऋतुराज पाटील यांनी हा बंधारा काढण्याचे नियोजन करण्याबाबत प्रशासकांना सूचना दिल्या. पाणी निचरा होण्यासाठी पावसापूर्वीच या बंधाऱ्याच्या बाजूस मोठी चर मारून पाणी बायपास केले असल्याचे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले. बंधारा काढण्याबाबत शहर अभियंत्यांशी चर्चा करू, असे सांगितले.