शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

बाजार समितीची कोट्यवधीची गुंतवणूक : धान्य व्यापाऱ्यांना ‘लक्ष्मीपुरी’ सोडवेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 10:55 IST

लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजाराचा ताण कोल्हापूर शहरातील वाहतुकीला बसत असल्याने बाजार समितीने टेंबलाईवाडी येथील मोकळ्या जागेत धान्य बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. येथील २२ एकर जागेवर २००७ ला समितीने २१३ प्लॉट पाडून ते धान्य व्यापाºयांना दिले; पण त्यानंतर सुरक्षिततेच्या कारणावरून तिथे जाण्यास व्यापारी तयार नव्हते.

ठळक मुद्देप्लॉट परत घेण्याच्या हालचाली

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा टेंबलाईवाडी धान्य बाजार स्थलांतराचा कार्यक्रम व्यापाऱ्यांनी मोठ्या धूमधडाक्यात केला. मात्र, अद्याप त्यांना लक्ष्मीपुरी सोडवेना झाली आहे. समिती प्रशासनाने कोट्यवधी रुपये गुंतवणूक करूनही व्यापारी तिथे न गेल्याने समितीला सुरक्षा, वीज व पाण्यावर महिन्याला अडीच लाख रुपयांचा भुर्दंड बसत आहे. व्यापाºयांना त्या जागेवर व्यवसायच करायचा नसेल, तर त्यांचे प्लॉट परत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजाराचा ताण कोल्हापूर शहरातील वाहतुकीला बसत असल्याने बाजार समितीने टेंबलाईवाडी येथील मोकळ्या जागेत धान्य बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. येथील २२ एकर जागेवर २००७ ला समितीने २१३ प्लॉट पाडून ते धान्य व्यापाºयांना दिले; पण त्यानंतर सुरक्षिततेच्या कारणावरून तिथे जाण्यास व्यापारी तयार नव्हते. अकरा वर्षे जागा तशीच पडून राहिली आणि बाजार लक्ष्मीपुरीतच सुरू राहिला. मात्र, दिवसेंदिवस वाहतूक वाढत गेल्याने धान्य बाजार स्थलांतराचा विषय पोलीस अधिकाºयांनीच हातात घेतला. मार्च २०१८ मध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यापारी, समिती प्रशासनाची बैठक घेऊन बाजार स्थलांतरित करण्यासाठी ज्या सोयी-सुविधा लागतात त्याची पूर्तता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डिसेंबर २०१८ मध्ये सर्व सोयींची पूर्तता झाली, यासाठी समितीला सव्वा कोटीचा खर्च आला. तिथे २४ तास खासगी सुरक्षा तैनात केली. वीज व पाण्याची व्यवस्था करून तिथे पोलीस चौकीही सुरू केली. त्यानंतर काही व्यापाºयांनी मोठा गाजावाजा करीत समितीची वाट न पाहता पोलीस अधिकाºयांच्या हस्ते स्थलांतर केले. मात्र, वर्ष झाले, एकही व्यापारी तिथे गेला नाही.

ज्या काही चार-पाच व्यापाºयांनी बांधकामे केली आहेत, त्यांचाही केवळ गोडावून म्हणूनच वापर होतो. बाजार स्थलांतरित झालाच नाही. मात्र, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत आणि महिन्याला अडीच लाख रुपये खर्च होत आहेत. व्यापा-यांना स्थलांतरित व्हायचे नसेल, तर त्यांच्याकडून प्लॉट घेऊन तिथे व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने काही करता येते का? हे बघावे, असा विचार समिती प्रशासनाचा आहे. 

  • संचालकांची अनास्था!

मुळात समितीच्या संचालक मंडळालाच हा बाजार स्थलांतरित व्हावा, असे वाटत नाही. त्यांची अनास्था असल्यानेच बारा वर्षे भिजत घोंगडे राहिले आहे.

  • २५ हून अधिक प्लॉट नेत्यांच्या नावाने

येथे २१३ प्लॉट आहेत. त्यापैकी १६० प्लॉट हे धान्य व्यापाºयांचे आहेत. उर्वरित ५३ पैकी २५ हून अधिक प्लॉट हे जिल्ह्याचे नेतृत्व करणाºया नेत्यांच्या नावावर आहेत. 

  • दृष्टिक्षेपात टेंबलाईवाडी बाजार :

जागा : २२ एकरप्लॉट : २१३प्लॉटचे क्षेत्रफळ : ८६३ ते १४८० चौरस फूटसुविधांसाठी आलेला खर्च : १.२५ कोटीमहिन्याला येणारा खर्च : सुरक्षा - १.६७ लाख, वीज -३० हजार, पाणी व देखभाल दुरुस्ती - २५ हजार .

 

धान्य बाजार स्थलांतरित करण्यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आता संबंधितांना नोटिसा देऊन ते स्थलांतरित होणार नसतील तर प्लॉट समितीच्या ताब्यात घेतले जातील.- दशरथ माने, सभापती, बाजार समिती. 

 

टॅग्स :MarketबाजारMONEYपैसा