शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

उमेदवारीसाठी आग्रह नको, थांबावे लागले तर तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’ निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू आघाडी जम्बो झाली असून उमेदवारीबाबत सगळ्यांचे समाधान करू शकत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’ निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू आघाडी जम्बो झाली असून उमेदवारीबाबत सगळ्यांचे समाधान करू शकत नाही. त्यामुळे उमेदवारीसाठी आग्रह करू नको, थांबावे लागले तर तशी तयारी ठेवावी, अशा सूचना नेत्यांनी दिल्या.

‘गोकूळ’साठी विरोधी पॅनल बांधणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यादृष्टीने मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आ. राजेश पाटील व माजी आ. संध्यादेवी कुपेकर यांनी इच्छुकांशी संवाद साधला. ‘गोकूळ’साठी २ मे रोजी मतदान होत आहे, दिवस कमी राहिल्याने पॅनलची घोषणा लवकर करून उमेदवारांना प्रचारासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पॅनलला अंतिम स्वरूप द्यावे लागणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. शाहू आघाडी जम्बो झाली आहे, साहजिकच इच्छुकांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत सगळ्यांचे समाधान होऊ शकत नाही. त्यामुळे उमेदवारीसाठी आग्रह करू नको, थांबावे लागले तर तयारी ठेवा, अशी सूचना दोन्ही मंत्र्यांनी केल्या.

मुलाखतीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, संग्रामसिंह कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, मुकुंद देसाई, विष्णुपंत केसरकर, जयवंतराव शिंपी, अल्बर्ट डिसोझा, एम. के. देसाई, गोपाळराव पाटील, सचिन घोरपडे, सदाशिव चरापले, विजयसिंह मोरे, किरणसिंह पाटील, बयाजी शेळके, नितीन जांभळे, विद्याधर गुरबे आदी उपस्थित होते.

उमेदवारी निश्चित असणारे प्रचारात

ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्यांना मुलाखतीसाठी बोलावले नव्हते. यामध्ये ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, नवीद मुश्रीफ, रणजीतसिंह कृ. पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे उमेदवार आदी गैरहजर राहिले होते.

ठरावांच्या संख्येवरून दावे

मुलाखतीत आपण किती पक्षांशी एकनिष्ठ आहेत, हे पटवून देत असतानाच आपण किती ठराव गोळा केले, हेही सांगण्यात आले.