शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आॅनलाईन नको -लॉकडाऊनमुळे टिंबर मार्केट ‘डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:02 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय संकटात आले आहेत. यामध्ये टिंबर मार्केटचाही समावेश आहे. गेल्या ४८ वर्षांत प्रथमच टिंबर मार्केट महिनाभर बंद आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा फटका : प्रथमच महिनाभर मार्केट बंद : साडेतीन हजार लोकांवर उपासमारीची वेळ

विनोद सावंत

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे टिंबर मार्केटलाही फटका बसला आहे. गेल्या महिन्यापासून येथील कामकाज ठप्प असून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यावर अवलंबून असणाऱ्या साडेतीन हजार लोकांसमोर आर्थिक संकट आहे. टिंबर मार्केटच्या स्थापनेपासून प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे.तत्कालीन आयुक्त द्वारकानाथ कपूर यांनी १९७२ च्या सुमारास स्वतंत्र जागा आरक्षित करून टिंबर मार्केट सुरू केले. माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, चंद्रकांत साळोखे आणि एन. डी. जाधव यांंच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय संकटात आले आहेत. यामध्ये टिंबर मार्केटचाही समावेश आहे. गेल्या ४८ वर्षांत प्रथमच टिंबर मार्केट महिनाभर बंद आहे.

सुतारकाम करणारे हवालदिलटिंबर मार्केट बंद असल्यामुळे येथील वखारींमध्ये तसेच घरगुती काम करणारे, सुतारकाम करणाºया शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकेतील शिल्लक रकमेवर तसेच मित्रमंडळींच्या सहकार्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू असून दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत करण्याची गरज आहे.

‘बांधकाम ठप्प’चाही परिणामबांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली म्हणजे टिंबर मार्केट येथे उपलब्ध होते. लॉकडाऊनमुळे बांधकाम थांबल्यामुळे टिंबर मार्केट येथील व्यवसायही ठप्प आहे.टिंबर मार्केटमध्ये एकूण कारखाने - १७०मोठे कारखाने - ५०टिंबर मार्केटवर आवलंबून नागरिक - ३५००हमाल - ५०टेम्पोचालक - १००-------------------------------------------------------------टिंबर मार्केटमध्ये विक्री- सेंट्रिंग साहित्य- लाकडी खिडकी, चौकट- स्लाइडिंग खिडकी- फरशी, सिमेंट सळी- प्लायवूड- फायबरच्या वस्तू- बांबू, पायाड- बॅटन, तट्टे, निलगिरी सर 

 

लॉकडाऊनमुळे बांबू विक्री ठप्प असून यावर अवलंबून असणाºया सुतार, सेंट्रिंग कामगारांनाही फटका बसला आहे. विक्रीच बंद असल्यामुळे उत्पन्न थांबले असून घरखर्च कसा करायचा, हा प्रश्न आहे.- महेश सूर्यवंशी, बांबू व्यापारी, टिंबर मार्केटटिंबर मार्केट महिनाभर बंद राहण्याचीही पहिलीच वेळ आहे. मार्केटवर अवलंबून असणारे व्यापारी, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा टिंबर असोसिएशन, कोल्हापूर टिंबर कॉर्पोरेशन (बांबू व्यवसाय) यांच्यामार्फत कामगारांना धान्य वाटप केले. सामाजिक बांधीलकी म्हणून पोलीस, डॉक्टरांनीही मदत केली.- लक्ष्मण पटेल, सहसचिव, कोल्हापूर जिल्हा टिंबर असोसिएशन 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस