शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

महामार्गावर भराव नको; अन्यथा गावे बुडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

शिरोली : पंचगंगा नदीकाठावर बांधकामे झाली आहेत. पाण्याला फूग लागते आणि परत सहापदरी रुंदीकरणावेळी महामार्गावर भराव टाकला तर ...

शिरोली : पंचगंगा नदीकाठावर बांधकामे झाली आहेत. पाण्याला फूग लागते आणि परत सहापदरी रुंदीकरणावेळी महामार्गावर भराव टाकला तर नदीकिनारी असणारी गावे पाण्याखाली जाऊन बुडतील; त्यामुळे महामार्गावर भराव नको, अशी मागणी शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पुणे-बंगलोर महामार्गावरील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पवार आले असता खवरे यांनी पूरस्थितीची समस्या त्यांच्यासमोर मांडली. खवरे यांनी सांगली फाटा येथे पिलरचा उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी केली. त्याला अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा नदीकिनारी असणारी बांधकामे महापुरास कारणीभूत आहेत. गावे पाण्याखाली जात आहेत. अशीच बांधकामे होत राहिली तर एकवेळ संपूर्ण कोल्हापूर पाण्याखाली जाईल.

भविष्यात सहापदरी रस्ता रुंदीकरणावेळी पुन्हा महामार्गावर १० फूट भराव टाकून उंची वाढविली जाणार आहे. असे झाले तर पंचगंगा नदीकिनारी असणारी गावे पुन्हा पाण्याखाली जातील. त्यामुळे या महामार्गावर भराव न टाकता शिरोली सांगली फाटा ते तावडे हाॅटेलपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करावा; अशी मागणी खवरे यांनी केली. यावेळी पंचायत समितीचे सदस्य उत्तम सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कदम, मुन्ना सनदे, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, सरदार मुल्ला, जोतिराम पोर्लेकर, दीपक खवरे, राहुल खवरे, सतीश पाटील उपस्थित होते.

फोटो : ३१ शिरोली खवरे

कोल्हापूर येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भराव टाकू नका, अशी मागणी शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.