शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महामार्गावर भराव नको; अन्यथा गावे बुडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

शिरोली : पंचगंगा नदीकाठावर बांधकामे झाली आहेत. पाण्याला फूग लागते आणि परत सहापदरी रुंदीकरणावेळी महामार्गावर भराव टाकला तर ...

शिरोली : पंचगंगा नदीकाठावर बांधकामे झाली आहेत. पाण्याला फूग लागते आणि परत सहापदरी रुंदीकरणावेळी महामार्गावर भराव टाकला तर नदीकिनारी असणारी गावे पाण्याखाली जाऊन बुडतील; त्यामुळे महामार्गावर भराव नको, अशी मागणी शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पुणे-बंगलोर महामार्गावरील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पवार आले असता खवरे यांनी पूरस्थितीची समस्या त्यांच्यासमोर मांडली. खवरे यांनी सांगली फाटा येथे पिलरचा उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी केली. त्याला अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा नदीकिनारी असणारी बांधकामे महापुरास कारणीभूत आहेत. गावे पाण्याखाली जात आहेत. अशीच बांधकामे होत राहिली तर एकवेळ संपूर्ण कोल्हापूर पाण्याखाली जाईल.

भविष्यात सहापदरी रस्ता रुंदीकरणावेळी पुन्हा महामार्गावर १० फूट भराव टाकून उंची वाढविली जाणार आहे. असे झाले तर पंचगंगा नदीकिनारी असणारी गावे पुन्हा पाण्याखाली जातील. त्यामुळे या महामार्गावर भराव न टाकता शिरोली सांगली फाटा ते तावडे हाॅटेलपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करावा; अशी मागणी खवरे यांनी केली. यावेळी पंचायत समितीचे सदस्य उत्तम सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कदम, मुन्ना सनदे, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, सरदार मुल्ला, जोतिराम पोर्लेकर, दीपक खवरे, राहुल खवरे, सतीश पाटील उपस्थित होते.

फोटो : ३१ शिरोली खवरे

कोल्हापूर येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भराव टाकू नका, अशी मागणी शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.