शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

रंगपंचमीदिवशी राजाराम बंधाऱ्यावर येऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

कसबा बावडा : राजाराम बंधारा पंचगंगा नदीत मगरीचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कसबा बावडा, लाईन बझार व इतर ...

कसबा बावडा : राजाराम बंधारा पंचगंगा नदीत मगरीचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कसबा बावडा, लाईन बझार व इतर आजूबाजूच्या परिसरातील तरुणांनी रंगपंचमी दिवशी म्हणजेच ( दि.२ एप्रिल ) खेळ खेळल्यानंतर रंग धुण्यासाठी राजाराम बंधारा पंचगंगा नदीत आंघोळीसाठी फिरकू नये, असे आवाहन बावडा रेस्क्यू फोर्स व राजाराम बंधारा ग्रुप यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कसबा बावडा व लाईन बझार परिसरात परप्रांतीय आणि स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणात रंगपंचमी सण साजरा करतात. सकाळी नऊ वाजता सुरू झालेला हा खेळ सायंकाळी चारपर्यंत चालतो. त्यानंतर सर्वजण नदीला रंग धुण्यासाठी व आंघोळीला जातात. या दिवशी बंधार्‍यावर तरूणाईची प्रचंड गर्दी झालेली असते. पण गेले काही दिवस राजाराम बंधारा व परिसरात मगरीचा वावर असून अधून मधून मगरीचे सातत्याने दर्शन होत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बावडा रेस्क्यू फोर्स व राजाराम बंधारा ग्रुपने सावधानतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, बंधाऱ्यावर दुपारनंतर कोणीही आंघोळीसाठी येऊ नये म्हणून राजाराम बंधारा ग्रुपचे कार्यकर्ते याठिकाणी पहारा देणार आहेत, अशी माहिती ग्रुपचे सदस्य तानाजी चव्हाण यांनी दिली.