शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुत्रे चावलेल्या रुग्णास पोलिसांकडून मारहाण

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

जुना राजवाडा पोलिसांचे कृत्य : नागरिकांतून तीव्र संताप

कोल्हापूर : भवानी मंडप परिसरात हाताला कुत्र्याने चावा घेतल्याने भीतीने पोलीस ठाण्यात पळत आलेल्या रुग्णालाच पोलिसांनी बेदम मारहाण करून हाकलून लावले. काशीम खाजासाब शेख (वय ३३) असे त्याचे नाव आहे. जखमी रुग्णाला मदत करण्याऐवजी त्यालाच मारहाण करणाऱ्या पोलिसांबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. जखमी शेख याच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, काशीम शेख हा हातगाडीवर केळीविक्रीचा व्यवसाय करतो. तो भवानी मंडप ते शिवाजी चौक परिसरात केळी विक्रीसाठी फिरत असतो. आज, गुरुवारी दुपारी अकराच्या सुमारास तो भवानी मंडप परिसरात फिरत असताना कुत्र्याने त्याचा पाठलाग केला. कुत्र्याने त्याच्या हाताचा चावा घेतल्याने तो भीतीने पळत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गेला.याठिकाणी तो वेदनेने रडू लागला. त्यावर पोलिसांनी त्याची विचारपूस न करता त्याला उलट मारहाण करून तेथून हाकलून लावले. हातातून रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत तो ‘सीपीआर’मध्ये आला. याठिकाणी त्याने डॉक्टरांना आपल्याला कुत्रे चावले असून, जुना राजवाडा पोलिसांनी आपल्याला विनाकारण मारहाण केल्याचे सांगितले. या ठिकाणीही तो वेदनेने मोठमोठ्याने रडू लागला. अंगातील टी-शर्ट वर करून पोलिसांनी मारहाण केल्याचे दाखवू लागला. अखेर डॉक्टरांनी त्याची समजूत काढत उपचार करून घरी पाठवून दिले. संकटकाळी मदत करणारे पोलीसच वैरी बनल्याने ‘सीपीआर’मध्ये डॉक्टरांसह इतर रुग्ण व नातेवाईक ‘रुग्णाला कुत्रं चावले ते चावलं; पोलिसांनापण आता कुत्रं चावलंय की काय?’ अशी चर्चा करीत होते. जबाबदारी झटकण्यासाठी रुग्णाला मारहाण करणाऱ्या पोलिसांना वरिष्ठ अधिकारी लगाम घालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)