शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

डॉक्टर, वाहनचालकांकडे कसून चौकशी

By admin | Updated: September 12, 2016 01:04 IST

नार्कोटिकबाबत विचारणा : परिस्थितीजन्य पुरावे ‘एसआयटी’च्या हाती

 कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासात पनवेल येथील ‘सनातन’च्या आश्रमातून नार्कोटिक औषधांबाबत चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरासह वाहनचालकांकडे ‘एसआयटी’चे पथक कसून चौकशी करीत आहे. डॉ. वीरेंद्र तावडे याच्या सांगण्यावरून आपण प्रत्येक आश्रमात व ज्याठिकाणी साधक मेळावे घेतले जातात त्याठिकाणी ही औषधे पुरविण्याचे काम करीत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. ही औषधे कोठून आणली, ती बनवितो कोण? याची सखोल माहिती घेतली जात असल्याचे वरिष्ठांनी सांगितले. पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील संशयित सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्र तावडे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या सात दिवसांच्या चौकशीमध्ये पानसरे हत्याप्रकरणाचा मास्टर मार्इंड तावडे असल्याचे परिस्थितीजन्य पुरावे ‘एसआयटी’च्या हाती आले आहेत. पनवेल येथील आश्रमावर पथकाने छापा टाकला असता तेथून नार्कोटिक औषधांचा साठा जप्त केला. ही औषधे आश्रमात येणाऱ्या साधकांना दिली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचा वापर आजारासाठी की अन्य कोणत्या कारणांसाठी केला जातो, याबाबत कसून चौकशी सुरू आहे. आश्रमातील एका डॉक्टरासह वाहनचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी डॉ. तावडे यांच्या सांगण्यावरून आम्ही इतर आश्रमांत ही औषधे पुरवित असल्याची कबुली दिली आहे. भूमिगत विनय पवार हा साधक बेपत्ता आहे. त्याच्या वास्तव्याची माहिती तावडेला आहे; परंतु तो त्याच्याविषयी माहिती देत नाही. रविवारी पोलिसांनी तावडेकडे कसून चौकशी केली. येत्या दोन दिवसांत यापूर्वी त्याचे वास्तव्य असलेल्या गंगावेश, शिवाजी पार्क, वारणानगर, कर्नाटक व गोवा राज्यांत तपासासाठी फिरविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. रात्री उशिरा त्याची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली. (प्रतिनिधी) तावडेला कोठडीत मोकळीकता राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत जीवितास धोका असल्याची तक्रार डॉ. तावडे याने वकिलांकडे केली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी या कोठडीतील इतर गुन्ह्णांतील आरोपींची रवानगी करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत केली आहे. राजारामपुरीच्या कोठडीत तावडेला पूर्ण मोकळीकता दिली आहे. तसेच त्याच्या सुरक्षेमध्येही वाढ केली आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तावडेची भेट घेतली. यावेळी त्याच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्याने पोलिसांविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. जिवाच्या भीतीने रक्तदाब वाढला राजारामपुरीच्या कोठडीतील अन्य गुन्ह्यांतील आरोपींकडून आपल्या जीवितास धोका असल्याची भीती तावडेला होती. त्याची शनिवारी (दि. १०) रात्री सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केली असता रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सुमारे दोन तास त्याला याठिकाणी ठेवण्यात आले. रक्तदाब सुरळीत झाल्यानंतर त्याला तेथून हलविले.