शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

खचू नका, ऊठा... पुन्हा जिंकायचे आहे..!

By admin | Updated: May 21, 2014 17:35 IST

काँग्रेसच्या आढावा बैठकीत आवाहन : भाजपकडून महागाईबाबत खोटा प्रचार : पी. एन. पाटील

कोल्हापूर : ज्या ज्यावेळी कॉँग्रेस पक्षाचा पराभव झाला त्या त्यावेळी पुन्हा दीड-दोन वर्षांनंतर कॉँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यामुळे यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहा, जिंकायचे आहे, असे आवाहन मंगळवारी दुपारी कॉँग्रेस कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा मेळाव्यात करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील होते. देशात आणि महाराष्टÑात कॉँग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभवाची छाया आजच्या मेळाव्यावर होती. उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर नाराजी दिसत होती. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना धीर आणि आधार देण्याचे काम यावेळी करावे लागले. कोल्हापूरच्या इतिहासात कधी नाही ते दोन्ही कॉँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने निवडणुकीला सामोरे गेले. परंतु कॉँग्रेस पक्षाने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडलो, अशी प्रांजळ कबुली नेत्यांनी आपल्या भाषणात दिली. देशातील परिवर्तनाची लाट लक्षात घेता कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागण्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी दिला. निवडणुकीत सर्व कार्यकर्ते जिद्दीने काम करीत होते, तरीही आपला पराभव झाला. याबाबत कोणावर गैरविश्वास नाही की कोणाविषयी तक्रार नाही. विरोधकांनी निवडणूक काळात कॉँग्रेससंदर्भात गैरसमज पसरविले. लोकसभा निवडणुकीमुळे आता अंदाज आलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा, मतभेद बाजूला ठेऊन जागृतपणे लढायला पाहिजे, असे आवाहनही आवाडे यांनी केले. गेल्या पाच वर्षांत आघाडी सरकार चालविताना सहकारी पक्षाच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे व महागाईबाबत आरोप झाले. सर्व आरोप चुकीचे होते. तरीही त्याचा परिणाम कॉँग्रेसवर झाला, असे सांगत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचेही भाषण झाले. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी आमदार बजरंग देसाई, अनिल यादव, अंजना रेडेकर यांची भाषणे झाली. यावेळी प्रकाश आवाडे, दिनकरराव जाधव, संजिवनी गायकवाड, सदाशिव चरापले, बाळासाहेब सरनाईक, अमल महाडिक, संध्या घोटणे, बाबासाहेब भुयेकर, दीपा पाटील, वैशाली महाडिक, आदी उपस्थित होते.