शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

दूध उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतू नका : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 1:22 AM

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर उभे असून राजकीय द्वेषातून त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा उद्योग बंद करा.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या मैदानात येण्याचे सतेज पाटील यांना आव्हानमहाडिक म्हणाले, मौनी विद्यापीठास कुलूप लावून शिक्षक आणले,

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर उभे असून राजकीय द्वेषातून त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा उद्योग बंद करा. महाडिक कुटुंबीयांवर टीका करण्यासाठी निवडणुकीचे मैदान आहे, तिथे या, पण काबाड कष्ट करून उभा केलेल्या संघाची बदनामी यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

महाडिक म्हणाले, मौनी विद्यापीठास कुलूप लावून शिक्षक आणले, बावड्यातील पोरांना आणून परवा मोर्चा काढला. यामध्ये शंभरही दूध उत्पादक नव्हते. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला नेत्यांनी दिला होता, पण उत्पादकांसह कर्मचाºयांनी ‘जशास तसे उत्तर’ देण्यासाठी आग्रह केल्याने ७ डिसेंबरला दुपारी बारा वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढत आहोत. अनेक संस्था, संघ, कारखाने बंद पडले ते चालविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा चांगला चाललेल्या संघाची बदनामी सुरू आहे.

मोर्चाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असे किती आले आणि गेले, पण दहा दिवसाला उत्पादकांच्या हातात पैसे देणारा संघ मोडण्याचा घाट आहे, या प्रवृत्तीला विरोध आहे. येथे आलो म्हणून काय भडका उडायचा तो उडू दे, पंपांवर धाडी टाकण्याचे उद्योग केले, आता सहा लाख उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतले जात आहे. सुपरवायझरांना फोकलून काढण्याची भाषा केली जाते, हा काय बिहार आहे का? मतभेद असतील त्याचे व्यासपीठ वेगळे आहे. निवडणुकीच्या मैदानात येऊन आरोप करा, असेही महाडिक यांनी सांगितले. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण नरके, सुरेखा शेगुंनशी, सुजाता जरग, लीला येणेचवंडी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक उपस्थित होते.‘कलम ७८’ची कारवाई मागेगाय दूध खरेदी दरात कपात केल्याबद्दल सरकारने २५ दूध संघांच्या संचालकांना ‘कलम ७८’च्या नोटिसा काढल्या होत्या; पण सरकारला आपली चूक कळली असून, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नोटिसा मागे घेण्याचे आश्वासन दिल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.उसाच्या दराचीही तुलना करा‘गोकुळ’ राज्यात सर्वाधिक दर देते, तरीही मोर्चा काढता. त्यांच्या कारखान्यात किती दर देता, ‘राजाराम’, ‘बिद्री’त तीन हजार उचल देते आणि यांचा कारखाना २६५० रुपये देतो. शेतकºयांचा एवढाच कळवळा आहे तर तीन हजार रुपये उचल द्यावी, असे महाडिक यांनी सांगितले.