शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

दूध उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतू नका : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर उभे असून राजकीय द्वेषातून त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा उद्योग बंद करा.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या मैदानात येण्याचे सतेज पाटील यांना आव्हानमहाडिक म्हणाले, मौनी विद्यापीठास कुलूप लावून शिक्षक आणले,

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर उभे असून राजकीय द्वेषातून त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा उद्योग बंद करा. महाडिक कुटुंबीयांवर टीका करण्यासाठी निवडणुकीचे मैदान आहे, तिथे या, पण काबाड कष्ट करून उभा केलेल्या संघाची बदनामी यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

महाडिक म्हणाले, मौनी विद्यापीठास कुलूप लावून शिक्षक आणले, बावड्यातील पोरांना आणून परवा मोर्चा काढला. यामध्ये शंभरही दूध उत्पादक नव्हते. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला नेत्यांनी दिला होता, पण उत्पादकांसह कर्मचाºयांनी ‘जशास तसे उत्तर’ देण्यासाठी आग्रह केल्याने ७ डिसेंबरला दुपारी बारा वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढत आहोत. अनेक संस्था, संघ, कारखाने बंद पडले ते चालविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा चांगला चाललेल्या संघाची बदनामी सुरू आहे.

मोर्चाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असे किती आले आणि गेले, पण दहा दिवसाला उत्पादकांच्या हातात पैसे देणारा संघ मोडण्याचा घाट आहे, या प्रवृत्तीला विरोध आहे. येथे आलो म्हणून काय भडका उडायचा तो उडू दे, पंपांवर धाडी टाकण्याचे उद्योग केले, आता सहा लाख उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतले जात आहे. सुपरवायझरांना फोकलून काढण्याची भाषा केली जाते, हा काय बिहार आहे का? मतभेद असतील त्याचे व्यासपीठ वेगळे आहे. निवडणुकीच्या मैदानात येऊन आरोप करा, असेही महाडिक यांनी सांगितले. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण नरके, सुरेखा शेगुंनशी, सुजाता जरग, लीला येणेचवंडी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक उपस्थित होते.‘कलम ७८’ची कारवाई मागेगाय दूध खरेदी दरात कपात केल्याबद्दल सरकारने २५ दूध संघांच्या संचालकांना ‘कलम ७८’च्या नोटिसा काढल्या होत्या; पण सरकारला आपली चूक कळली असून, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नोटिसा मागे घेण्याचे आश्वासन दिल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.उसाच्या दराचीही तुलना करा‘गोकुळ’ राज्यात सर्वाधिक दर देते, तरीही मोर्चा काढता. त्यांच्या कारखान्यात किती दर देता, ‘राजाराम’, ‘बिद्री’त तीन हजार उचल देते आणि यांचा कारखाना २६५० रुपये देतो. शेतकºयांचा एवढाच कळवळा आहे तर तीन हजार रुपये उचल द्यावी, असे महाडिक यांनी सांगितले.