शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

दूध उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतू नका : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर उभे असून राजकीय द्वेषातून त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा उद्योग बंद करा.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या मैदानात येण्याचे सतेज पाटील यांना आव्हानमहाडिक म्हणाले, मौनी विद्यापीठास कुलूप लावून शिक्षक आणले,

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर उभे असून राजकीय द्वेषातून त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा उद्योग बंद करा. महाडिक कुटुंबीयांवर टीका करण्यासाठी निवडणुकीचे मैदान आहे, तिथे या, पण काबाड कष्ट करून उभा केलेल्या संघाची बदनामी यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

महाडिक म्हणाले, मौनी विद्यापीठास कुलूप लावून शिक्षक आणले, बावड्यातील पोरांना आणून परवा मोर्चा काढला. यामध्ये शंभरही दूध उत्पादक नव्हते. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला नेत्यांनी दिला होता, पण उत्पादकांसह कर्मचाºयांनी ‘जशास तसे उत्तर’ देण्यासाठी आग्रह केल्याने ७ डिसेंबरला दुपारी बारा वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढत आहोत. अनेक संस्था, संघ, कारखाने बंद पडले ते चालविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा चांगला चाललेल्या संघाची बदनामी सुरू आहे.

मोर्चाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असे किती आले आणि गेले, पण दहा दिवसाला उत्पादकांच्या हातात पैसे देणारा संघ मोडण्याचा घाट आहे, या प्रवृत्तीला विरोध आहे. येथे आलो म्हणून काय भडका उडायचा तो उडू दे, पंपांवर धाडी टाकण्याचे उद्योग केले, आता सहा लाख उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतले जात आहे. सुपरवायझरांना फोकलून काढण्याची भाषा केली जाते, हा काय बिहार आहे का? मतभेद असतील त्याचे व्यासपीठ वेगळे आहे. निवडणुकीच्या मैदानात येऊन आरोप करा, असेही महाडिक यांनी सांगितले. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण नरके, सुरेखा शेगुंनशी, सुजाता जरग, लीला येणेचवंडी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक उपस्थित होते.‘कलम ७८’ची कारवाई मागेगाय दूध खरेदी दरात कपात केल्याबद्दल सरकारने २५ दूध संघांच्या संचालकांना ‘कलम ७८’च्या नोटिसा काढल्या होत्या; पण सरकारला आपली चूक कळली असून, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नोटिसा मागे घेण्याचे आश्वासन दिल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.उसाच्या दराचीही तुलना करा‘गोकुळ’ राज्यात सर्वाधिक दर देते, तरीही मोर्चा काढता. त्यांच्या कारखान्यात किती दर देता, ‘राजाराम’, ‘बिद्री’त तीन हजार उचल देते आणि यांचा कारखाना २६५० रुपये देतो. शेतकºयांचा एवढाच कळवळा आहे तर तीन हजार रुपये उचल द्यावी, असे महाडिक यांनी सांगितले.