शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

आता कुणाला ढिलं सोडायचं नाही!: नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:21 IST

कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असताना, चोर समजून आमच्या बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. आता यापुढं कुणाला ढिलं सोडायचं नाही, असा आक्रमक इशारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने मोर्चाद्वारे दिला.राईनपाडा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा इशारा ...

कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असताना, चोर समजून आमच्या बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. आता यापुढं कुणाला ढिलं सोडायचं नाही, असा आक्रमक इशारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने मोर्चाद्वारे दिला.राईनपाडा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा इशारा देण्यात आला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.दसरा चौकातून घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. ‘नाथपंथी गोसावी समाजावर अन्याय करणाऱ्या राक्षसांना फाशी द्या,’ अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. व्हीनस कॉर्नरवर मोर्चेकºयांनी रस्त्यात ठिय्या मारल्याने वाहतूक ठप्प झाली. असेंब्ली रोडवर झालेल्या सभेत मोर्चाचे प्रमुख संयोजक अनिल शिंदे म्हणाले, मूळ गावापासून शेकडो किलोमीटरवर धुळे जिल्ह्यात आमचे बांधव गेले असताना त्यांना बेदम मारहाण झाली. ते स्वत:ची ओळख सांगत असताना ते ऐकून न घेता चोर समजून त्यांना मरेपर्यंत मारहाण केली. शासनाने संबंधितांच्या परिवाराला १0 लाख दिले, पोलिसांनी ३२ जणांना अटक केली. मात्र एवढ्यावर आमचे समाधान नाही. या दोषींवर कडक कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.दादा जगताप म्हणाले, गावा-गावांत आमच्याकडे वाकड्या नजरेने बघणाºयांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे एकजूट दाखविण्याची गरज आहे.जे. के. माळी म्हणाले, शेकडो वर्षे आम्ही पारंपरिक व्यवसाय करीत असताना आमची जात गुन्हेगारी नाही. ज्यांना मारण्यात आले, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणार आहोत. जनाबाई चौगुले (जयसिंगपूर) म्हणाल्या, कुत्र्याला मारतानासुद्धा त्याचा जीव जाण्याइतपत आपण मारत नाही. मात्र इथं तर आमच्या बांधवांना ठार मारलं. आता सरकारनं ज्यांनी मारलं त्यांना फाशी देण्याचा हुकूम द्यावा.यावेळी दादा जगताप, राम साळुंखे, अशोक शिंदे (शिराळा), ईश्वर शिंदे, गजाबाई शिंदे, अण्णा शिंदे, डॉ. माळी, रमेश रुकडीकर, बाजीराव नाईक यांची भाषणे झाली. जगन्नाथ माळवे, आदिनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, सखाराम चव्हाण, प्रा. डॉ. डी. आर. भोसले यांनी तहसीलदार गुरू बिराजदार यांना निवेदन दिले.