शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

आता कुणाला ढिलं सोडायचं नाही!: नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:21 IST

कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असताना, चोर समजून आमच्या बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. आता यापुढं कुणाला ढिलं सोडायचं नाही, असा आक्रमक इशारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने मोर्चाद्वारे दिला.राईनपाडा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा इशारा ...

कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असताना, चोर समजून आमच्या बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. आता यापुढं कुणाला ढिलं सोडायचं नाही, असा आक्रमक इशारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने मोर्चाद्वारे दिला.राईनपाडा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा इशारा देण्यात आला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.दसरा चौकातून घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. ‘नाथपंथी गोसावी समाजावर अन्याय करणाऱ्या राक्षसांना फाशी द्या,’ अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. व्हीनस कॉर्नरवर मोर्चेकºयांनी रस्त्यात ठिय्या मारल्याने वाहतूक ठप्प झाली. असेंब्ली रोडवर झालेल्या सभेत मोर्चाचे प्रमुख संयोजक अनिल शिंदे म्हणाले, मूळ गावापासून शेकडो किलोमीटरवर धुळे जिल्ह्यात आमचे बांधव गेले असताना त्यांना बेदम मारहाण झाली. ते स्वत:ची ओळख सांगत असताना ते ऐकून न घेता चोर समजून त्यांना मरेपर्यंत मारहाण केली. शासनाने संबंधितांच्या परिवाराला १0 लाख दिले, पोलिसांनी ३२ जणांना अटक केली. मात्र एवढ्यावर आमचे समाधान नाही. या दोषींवर कडक कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.दादा जगताप म्हणाले, गावा-गावांत आमच्याकडे वाकड्या नजरेने बघणाºयांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे एकजूट दाखविण्याची गरज आहे.जे. के. माळी म्हणाले, शेकडो वर्षे आम्ही पारंपरिक व्यवसाय करीत असताना आमची जात गुन्हेगारी नाही. ज्यांना मारण्यात आले, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणार आहोत. जनाबाई चौगुले (जयसिंगपूर) म्हणाल्या, कुत्र्याला मारतानासुद्धा त्याचा जीव जाण्याइतपत आपण मारत नाही. मात्र इथं तर आमच्या बांधवांना ठार मारलं. आता सरकारनं ज्यांनी मारलं त्यांना फाशी देण्याचा हुकूम द्यावा.यावेळी दादा जगताप, राम साळुंखे, अशोक शिंदे (शिराळा), ईश्वर शिंदे, गजाबाई शिंदे, अण्णा शिंदे, डॉ. माळी, रमेश रुकडीकर, बाजीराव नाईक यांची भाषणे झाली. जगन्नाथ माळवे, आदिनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, सखाराम चव्हाण, प्रा. डॉ. डी. आर. भोसले यांनी तहसीलदार गुरू बिराजदार यांना निवेदन दिले.