शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आता कुणाला ढिलं सोडायचं नाही!: नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:21 IST

कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असताना, चोर समजून आमच्या बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. आता यापुढं कुणाला ढिलं सोडायचं नाही, असा आक्रमक इशारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने मोर्चाद्वारे दिला.राईनपाडा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा इशारा ...

कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असताना, चोर समजून आमच्या बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. आता यापुढं कुणाला ढिलं सोडायचं नाही, असा आक्रमक इशारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने मोर्चाद्वारे दिला.राईनपाडा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा इशारा देण्यात आला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.दसरा चौकातून घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. ‘नाथपंथी गोसावी समाजावर अन्याय करणाऱ्या राक्षसांना फाशी द्या,’ अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. व्हीनस कॉर्नरवर मोर्चेकºयांनी रस्त्यात ठिय्या मारल्याने वाहतूक ठप्प झाली. असेंब्ली रोडवर झालेल्या सभेत मोर्चाचे प्रमुख संयोजक अनिल शिंदे म्हणाले, मूळ गावापासून शेकडो किलोमीटरवर धुळे जिल्ह्यात आमचे बांधव गेले असताना त्यांना बेदम मारहाण झाली. ते स्वत:ची ओळख सांगत असताना ते ऐकून न घेता चोर समजून त्यांना मरेपर्यंत मारहाण केली. शासनाने संबंधितांच्या परिवाराला १0 लाख दिले, पोलिसांनी ३२ जणांना अटक केली. मात्र एवढ्यावर आमचे समाधान नाही. या दोषींवर कडक कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.दादा जगताप म्हणाले, गावा-गावांत आमच्याकडे वाकड्या नजरेने बघणाºयांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे एकजूट दाखविण्याची गरज आहे.जे. के. माळी म्हणाले, शेकडो वर्षे आम्ही पारंपरिक व्यवसाय करीत असताना आमची जात गुन्हेगारी नाही. ज्यांना मारण्यात आले, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणार आहोत. जनाबाई चौगुले (जयसिंगपूर) म्हणाल्या, कुत्र्याला मारतानासुद्धा त्याचा जीव जाण्याइतपत आपण मारत नाही. मात्र इथं तर आमच्या बांधवांना ठार मारलं. आता सरकारनं ज्यांनी मारलं त्यांना फाशी देण्याचा हुकूम द्यावा.यावेळी दादा जगताप, राम साळुंखे, अशोक शिंदे (शिराळा), ईश्वर शिंदे, गजाबाई शिंदे, अण्णा शिंदे, डॉ. माळी, रमेश रुकडीकर, बाजीराव नाईक यांची भाषणे झाली. जगन्नाथ माळवे, आदिनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, सखाराम चव्हाण, प्रा. डॉ. डी. आर. भोसले यांनी तहसीलदार गुरू बिराजदार यांना निवेदन दिले.