शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

महिला धोरण अंमलबजावणीत हयगय नको

By admin | Updated: July 8, 2016 00:56 IST

अमित सैनी : जिल्हास्तरीय समितीची बैठक; कामाबाबत उदासीनता दाखविणाऱ्या विभागांवर नाराजी

कोल्हापूर : महिला सबलीकरण व सर्वसमावेशक महिला धोरण राबविण्यात उदासीनता दाखविणाऱ्या शासकीय विभागांवर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी गुरुवारी नाराजी व्यक्त केली. तसेच या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये हयगय सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात महिला धोरणासंदर्भातील जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, समितीच्या अशासकीय सदस्या पल्लवी कोरगावकर, कालिंदा रानभरे, प्रमिला जरग, साधना झाडबुके, मंगला पाटील, शशिकला बोरा, डॉ. मंगला कुलकर्णी, डॉ. भारती पाटील, अ‍ॅड. गौरी पाटील हे प्रमुख उपस्थित होते. महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व कायद्यांची अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला. यावेळी जिल्हा उद्योग केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन, सहायक आयुक्त समाजकल्याण आणि जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय या विभागांनी समिती समोर कोणतीही माहिती सादर न केल्याने त्यांचा आढावा घेता आला नाही. यावर शासनाचे विभाग महिला सबलीकरण व महिला कल्याण, महिला धोरण सक्षमपणे राबविण्यात उदासीन असल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेकडील महिलाविषयक विविध योजना, महिला व बालविकास विभागाकडील योजना, गृहविभागाकडील योजना आदींबाबत आढावा घेतला.ंमहिलांसाठी १0९१ हेल्पलाईनमहिलांच्या मदतीसाठी ‘१०९१ ही हेल्पलाईन कार्यरत असून, पीडित महिलांनी त्याचा लाभ घ्यावा. त्यासाठी या हेल्पलाईनबाबतची प्रचार व प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण कायद्यांतर्गत सर्व आस्थापनांनी समिती स्थापन करून त्याचे फलक दर्शनी भागात लावण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली. अडचणींबाबत उपाय सुचविण्याची गरजकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, आदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्याची गरज आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी पीडित महिलांना योग्य मदत मिळवून देणे, त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करणे, त्यांच्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले.